कोवळा चारा खाल्याने 19 जनावरांना विषबाधा

चार दुभत्या म्हशी दगावल्या ;कर्जतमधील नेवाळी गावातील घटना

By Raigad Times    08-May-2023
Total Views |
Janvarana vishabadha
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायतमधील नेवाळी गावात कोवळा चारा खाल्ल्याने एका शेतकर्‍याची 19 जनावरे बाधित झाली आहेत. यशवंत भागित शेतकर्‍याने आपल्या शेतात हिरव्या चार्‍याची लागवड केली आहे. 5 मे रोजी हा हिरवा चारा खाल्ल्याने त्यांच्या 19 जनावरांना विषबाधा झाली. दरम्यान, विषबाधा झालेल्या चार दुभत्या म्हशींचा मृत्यू झाला आहे.
 
नेवाळी गावातील यशवंत भाऊ भागीत हे शेतकरी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दुभती जनावरे असून त्या जनावरांसाठी हिरवा चारा मिळावा म्हणून भागित यांनी शेतात मका, बाजरी तसेच अन्य प्रकारचा चारा यांची लागवड केली होती. नेहमीप्रमाणे आपल्याकडील 19 जनावरांना शेतीकडे घेऊन जात असतात. 5 मे रोजी त्यांच्या जनावरांनी शेतातील चारा खाल्ला आणि काही मिनिटांत त्या पैकी काही जनावरे जमिनीवर कोसळली.= 16 म्हशी आणि 3 जर्सी गायी यांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करणार्‍या यशवंत भागित यांच्या शेतात चारा खात असलेल्या म्हशी कोसळलेल्या बघून भागित यांनी वाकस येथून पशुवैद्यकिय अधिकारी यांना बोलावून घेतले.
 
मात्र एकावेळी 19 जनावरांना विषारी चारा खाल्ल्याने विषबाधा झाल्याने पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत थोरात यांनी तालुक्यातील अन्य दवाखान्यात काम करणारे पशूवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेतले. डॉ. थोरात यांच्या मदतीला डॉ.सागर कसबे, पशुधन विभागाचे चेतन लांघी आणि झगडे यांनी नेवाळी गावात धाव घेवून यशवंत भागित यांच्या शेतात कोसळलेल्या जनावरांची तपासणी सुरू केली. पशूवैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने सर्व जनावरांवर औषध उपचार सुरू केले आणि त्यामुळे अनेक जनावरांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.
 
मात्र हिरव्या चार्‍यामधून विषबाधा झालेल्या चार म्हशींचा मृत्यू झाला. त्यामुळे
दुग्ध
शेतकरी यशवंत भागित यांचे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांनी शेतात ज्वारी टाकली होती. त्या हिरव्या चार्‍यात विषारी द्रव्य तयार असते. ते विषारी द्रव्य ज्वारीच्या हिरव्या चार्‍याबरोबर खाल्याने 19 जनावरांना विषबाधा झाली आहे. शेतातील कोवळी ज्वारी खाल्ल्याने पशुधन यास मोठा धोका होऊ शकतो.
शेतकर्‍यांनी हिरवा चारा हा जनावरांना खायला देताना तो कोवळा चारा खाण्यास घालू नये अशी सूचना शेतकर्‍यांना केली आहे. शेतकर्‍यांनी संतुलित आहार आणि चारा पाणी देताना काळजी घ्यावी. - डॉ.डी.आर. जाधव, तालुका पशुधन अधिकारी, कर्जत