कर्जत | दहा पाझर तलावांनी गाठला तळ,पिण्याच्या पाण्याच्या समस्या वाढल्या; ५ टक्के पाणीसाठा

By Raigad Times    05-Jun-2024
Total Views |
 karjat
 
कर्जत | कर्जत तालुयात पाणी जमिनीत मुरावे आणि पाण्याची भूजल क्षमता वाढावी यासाठी पाझर तलाव बांधण्यात आले आहेत. तालुयात १९७८ ते १९८५ या काळात बांधण्यात आलेल्या सर्व दहा पाझर तलावांमधील पाण्याने तळ गाठले आहे. तालुयातील पाणी टंचाई वाढली असून शासनाचे टँकर वाडी वस्त्यांवर जाऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहेत.
 
दरम्यान, कर्जत तालुयाची पाण्याची भूक मिटवण्यासाठी शासनाने कामतपाडा, ओलमन, देवपाडा, वारे येथील साईट वर पाझर तलाव यांची उभारणी करावी अशी मागणी पुढे येत आहे.कर्जत तालुयात रायगड जिल्हा परिषदेचे लघुपाटबंधारे विभागाचे वतीने पाण्याची क्षमता वाढविण्यासाठी पाझर तलावांची निर्मिती करण्यास सुरुवात झाली.
 
त्यानंतर १९७८ पासून ११९५ पर्यंत दहा ठिकाणी पाझर तलावांची निर्मिती झाली. त्यानंतर शासन कडून मागील ३० वर्षात एकही नवीन पाझर तलाव बांधला नाही. त्यात नऊ तलावांपैकी दोन तलावांची दुरुस्ती यापूर्वी झाली होती आणि आता आणखी दोन तलावांची दुरुस्ती सुरु आहे. त्यामुळे अनेक वर्षे दुरुस्ती न झाल्याने कर्जत तालुयातील पाझर तलाव हे गाळाने भरले आहेत.
 
karjat
 
त्यामुळे तेथील पाण्याची साठवण क्षमता देखील कमी झाली आहे. डोंगरपाडा पाझर तलाव फुटला होता तर खांडस, आर्डे आणि कशेळे येथील पाझर तलाव मातीने भरले असल्याने त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे.यावर्षी तालुयातील गावंडवाडी आणि अंभेरपाडा येथील पाझर तलावांची दुरुस्ती कामे सुरु असल्याने सध्या त्या पाझर तलावात पाणी आता शून्यावर गेला आहे.
 
सध्या तालुयातील खंडापे येथील पाझर तलाव मध्ये २० टक्के पाणी साथ आहे. तर बळीवारे, वरई, डोंगरपाडा, येथील पाझर तलावांमध्ये जेमतेम १० टक्के पाणी साठा आहे. तर आर्डे, खांडस आणि कशेळे येथील पाझर तलावात जेमतेम ५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुयातील पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे.
 
या सर्व पाझर तलावातील पाणी पाझरून हे खालील भागात जाते. मात्र पाझर तलाव आटल्याने त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या खालील भागातील नळपाणी योजना यांचा पाण्याचा पुरवठा बंद झाले आहे. त्यामुळे पाण्याच्या पाण्याची टंचाई वाढली. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने कर्जत तालुयातील विविध भागात पाण्यासाठी पाझर तलाव यांची निर्मिती करावी अशी मागणी होऊ लागली आहे. तालुयात १९९५ नंतर एकही पाझर तलाव यांची निर्मिती झाली नाही. त्यामुळे तालुयात कामतपाडा, वारे, देवपाडा, ओलमन, बेडीसगाव आदी ठिकाणी पाझर तलाव नव्याने पाझर तलाव बांधण्याची कार्यवाही व्हावी अशी मागणी होत आहे.