अलिबाग | ‘गुजरातला त्यांच्या हक्काचं मीदेखील देईल; पण तुम्ही महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळवून गुजरातला नेला. इंडिया आघाडीचे सरकार आले तर मी महाराष्ट्राचे गेलेले वैभव पुन्हा आणल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही शिवसेना (ठाकरे
गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ रविवारी (५ मे) अलिबाग येथे झालेल्या सभेत ते बोलत होते उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मोदी-शहांवरही निशाणा साधला.ज्यांना गुजरातमधे प्रकल्प न्यायचे असतील त्यांनी बारसूची रिफायनरी घेऊन जा, जैतापूर प्रकल्प गुजरातला न्या, पण विनाशकारी प्रकल्प कोकणावर लादू नका. मोदी शहांना आता पराभवाचं भूत दिसतंय म्हणून ते सगळीकडे राम-राम बोलत फिरत आहेत.
मोदी आणि शहा तुम्ही आज आहात, उद्या नसाल.पण ‘जय भवानी, जय शिवाजी ८ अनंत काळापर्यंत असणार आहे.भगव्याला डाग लावणार्यांसोबत हा शिवसेनाप्रमुखांचा पुत्र कधीही जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली निवडणूक आल्यावर पाकिस्तान आठवतोय.
काल परवाकडे पूँछला हल्ला झाला, तिथे आपले सैनिक शहीद झाले,पण तिथे गृहमंत्री गेले नाहीत. ते फक्त ‘उद्धव ठाकरे संपला पाहिजे’ याकडेच लक्ष देत आहेत. अरे उद्धव ठाकरे मोठा की देश मोठा? असा सवाल करीत,उद्धव ठाकरेंना खतम करण्यासाठी नव्हे तर पाकिस्तानला खतम करण्यासाठी लोकांनी तुम्हाला मतं दिली आहेत,याची त्यांनी आठवण करुन दिली.
तुमच्या पराभवामुळे माझ्या हिंदुस्थानात फटाके फुटणार आहेत.तुमच्या धोतरात चीन घुसलाय, तरी तुम्ही नेभळटासारखं काही करत नाही.तुम्ही आम्हाला कसली पाकिस्तानची भीती दाखवताय? तुमच्या दिल्लीच्या आसनाखाली लोकशाहीचा बॉम्ब आता फुटणार आहे, त्याचं बघा काय करताय ते. तुम्ही सर्वांना सर्वकाळ फसवता येत नाही.
आता रायगडालाच नव्हे तर देशालाही जाग आलेली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांना ठणकावले.‘आपली जी घोषणा आहे, कोण आला रे कोण आला? ४ जूनला दिल्लीकरांना कळलं पाहिजे की, शिवसेनेचा वाघ आला. नाहीतर या घोषणेत काहीही अर्थ नाही.
आता मोदी आणि शहा सगळीकड़े फिरताहेत, मी मुख्यमंत्री होतो,तेव्हा रायगडकरांनी दोन चक्रीवादळाचा सामना केला होता, मग रायगडकर या फडफडणार्या पंख्यांचा सामना करू शकत नाही का? ती दोन चक्रीवादळं होती, ही दोन महाराष्ट्रावर आदळणारी वक्रीवादळं आहेत.चक्रीवादळाचा सामना करणारा रायगडकर या वक्रीवादळाचा सामना केल्याशिवाय राहणार नाही. हा माझा आत्मविेशास आहे.
आज मोदी आणि शहा महाराष्ट्रात खेटे घालताहेत. हीच वेळ आहे. यांना दोन वेळा महाराष्ट्रने भरभरून दिलं, कारण शिवसेना सोबत होती. इतकं करूनही तुम्ही महाराष्ट्राचा घात केलात. आता अफवा पसरवताहेत. मध्येच त्यांना माझ्याविषयी बोलायचं
असतं.
उद्धव ठाकरेंवर संकट आलं तर म्हणतात...पण माझं सुरक्षा कवच माइयासोबत आहे. मोदीजी मला तुमच्या सुरक्षेची गरज नाही. माझ्या आईवडिलांच्या आणि आई जगदंबेच्या कृपेचे कवच माझ्याभोवती आहे. उलट मोदी, तुम्ही संकट म्हणून माझ्यावर आला आहात, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकं एवढी चिडून उठली आहेत की, ती वाट बघताहेत, ७ मे, १३ मे, २० मे, ४ जून कधी येतोय.तारीख येतेय कधी आणि ठोकतोय कधी? याची लोकं वाट बघताहेत. कारण मोदी शहा आणि भाजपने खोटं बोलण्याचं काम केलं आहे, असा आरोपही त्यांनी केला.पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, ते माझी चौकशी करत होते.
मग तुमच्या चेल्या चपाट्यांना माहीत नब्हतं का की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? मी रुग्णालयात असंताना रात्री अपरात्री
माझ्या गद्दारांशी हुडी घालून चर्चा कोण करत होते? तुम्हाला माहीत नव्हतं? माझं सरकार गद्दारी करून खाली ख़ेचताय, शिवसेना प्रमुखांचे आपल्यावर खूप कर्ज आहे म्हणता,हे कर्ज आता महाराष्ट्रची जनता व्याजासह फेडल्याशिवाय राहणार नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.