कोर्लई | गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये अनंत गीतेेना मत म्हणजे मोदीना मत सांगत फिरणारे तेच आता मोदींच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यामुळे आता कोणासाठी मत लोकांकडे मागणार? असा सवाल शिवसेना इडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी केली आहे. गेल्यावेळी शेकाप-कॉगे्रसमुळे वाचले यावेळी तटकरेंची हद्दपार करा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुरुड तालुयातील बोर्ली येथे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंत गीते यांची जनसंवाद सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी त्यांनी जोरदार टिका केली. गेल्या निवडणुकीमध्ये आमचे शिवसैनिक नौशाद दळवी माझा प्रचार करत होते, ते मुस्लिम बांधवांना सांगत होते. असा निष्कलंक नेता सापडणार नाही, गीतेंनाच मतदान करा परंतु विरोधकांनी त्याच ठिकाणी जाऊन सांगितले गीतेंना मत म्हणजेच मोदींना मत. पण आज काय झाले आहे, जे हे सांगत होते तेच मोदींच्या मांडीवर जाऊन बसले.
ज्याची हद्दपारी मधुशेठ ठाकूर यांनी वाचवली त्या आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या पाठीत खंजीर खुपसला जे अंतुले साहेबांचे, जे मधुशेठ ठाकूर, जे पवार साहेबांचे, जे जयंत भाई पाटलांचे नाही झाले ते तुमचे काय होतील. अशी तोफ डागत अनंत गीते यांनी आगामी होणार्या लोकसभा निवडणुकीत ७ मे ला इंडिया आघाडीच्या मशाल चिन्हा समोरील बटन दाबून निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले.
अनंत गीते यांच्यासारखा चारित्र्यावर एकही डाग नसलेला नेता संपूर्ण देशात नसेल. गेल्या निवडणुकीला आमच्याकडून चूक झाली ती चूक आम्ही या लोकसभा निवडणूकीत सुधरणार आहोत असे प्रतिपादन अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील यांनी केले. शेकापच्या मतदारांनी अनंत गीतेंनाच मतदान करा असे आवाहन केले.
यावेळी असगर दळवी, विजय गिद्दी, वामन चुनेकर, चित्राताई पाटील, अॅड. श्रद्धा ठाकूर, अॅड. प्रवीण ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करुन इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले.यावेळी काँग्रेसचे राजा ठाकूर, शेकापनेत्या चित्रलेखा पाटील, सुभाष महाडिक, वासंती उंमरोटकर, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, प्रशांत मिसाळ, तालुका प्रमुख नौशाद दळवी, राजेश्री मिसाळ, प्रमोद भायदे, शहर प्रमुख आदेश दांडेकर, यांच्यासह विष्णू पाटील, संजय कदम, विजय गिदी, मनोहर बैले, अजगर दळवी, नौशाद शाबान, मुकरीब खतीब, वामन चुनेकर, अस्लम हलडे, नाना गुरव, इस्माईल शेख, आशिष दिवेकर, आसिफ कोर्लईकर आदी उपस्थित होते.