लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा; निवडणूक आयुक्तांची नियुक्ती

By Raigad Times    15-Mar-2024
Total Views |
 mumbai
 
मुंबई । लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू या दोन अधिकार्‍यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन दास यांच्या समितीने या नावांना संमती दिल्याची माहिती आहे.
 
अरूण गोयल यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्यानंतर एकून रिक्त पदांची संख्या दोन झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलून या निवडी केल्या आहेत.
 
यासंबंधीची माहिती देताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्जुन राम मेघवाल आणि माझ्या समितीने या नियुक्त्या केल्या आहेत.