12 वी ची 21 फेब्रुवारी तर दहावीची 1 मार्च पासून परीक्षा

By Raigad Times    08-Feb-2024
Total Views |
 ratnagiri
 
रत्नागिरी । माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी )ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च रोजी होत आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) ची परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधित होत आहे. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
 
या परीक्षा संदर्भांत आज बैठक झाली.बैठकीस मुख्य कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी,शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, योजना शिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते आदी उपस्थित होते.या परीक्षांसाठी 10 वी साठी 13 परिरक्षक तर, 12 वी साठी 12 परिरक्षक कार्यालये आहेत.
 
10 वी साठी एकूण 426 शाळा मुख्य परिक्षा केंद्रे 73 आणि 18 हजार 323 विद्यार्थी संख्या आहे. 12 वी साठी 154 कनिष्ठ महाविद्यालये 38 मुख्य परीक्षा केंद्रे,17 हजार 489 विद्यार्थी संख्या आहे.जिल्ह्यात मागील 5 वर्षांमध्ये एकही संवेदनशील व उपद्रवी परीक्षा केंद्र आढळून आले नाही.
 
एकूण सहा भरारी पथके जिल्ह्यात असणार आहेत.जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले,कोठेही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलीस विभागाने विशेष सुरक्षा विशेषत: पेपर्ससंदर्भात ठेवावी. राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी अर्धा तास आधी एस टी पोहचेल, अशी सुविधा ठेवावी. वीज वितरण कंपनीने वीज सुरळीत राहील, याची
जबाबदारी पूर्ण करावी.