अलिबाग । भारत पूर्वी मागणारा देश होता, आता भारत देणारा देश बनला आहे. अनेक देश आता भारताकडे आशेने पाहात असतात. आपला देश आता बदलतोय. भारत एक शेी म्हणून जागात पुढे येत आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच घडले आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे हिमाचल प्रदेश प्रभारी संजय टंडंन यांनी केले.
मोदी 9 अभियानातंर्गत भारतीय जनता पार्टी, दक्षिण रायगड जिल्ह्यातर्फे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थींचा भव्य मेळावा गुरूवारी (दि. 8) अलिबाग जवळील वरसोली येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष आमादार प्रशांत ठाकूर, भाजपा महाराष्ट ्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार धैर्यशील पाटील, राजेश मपारा, अॅड. महेश मोहिते, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी विविध योजनांमधील लाभाथारना प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थी कार्डचे वाटप करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या पतंप्रधानपदाच्या काकिर्दीला 9 वर्ष पूर्ण झाली. या कालावधीत अनेक चांगल्या योजना राबवण्यात आल्या. कोवीडची लस सवारना मोफत देण्यात आली. भारतातील 18 हजार 476 गावांमध्ये वीजेचा खांब नव्हता.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या सर्व गावांमध्ये 980 दिवसात वीज पोहोचवली. ज्या गावांमध्ये रस्ते नव्हते तेथे रस्ते केले. पाणी दिले. पूर्वी काम करण्यासाठी चिठ्ठी महात्वाची असायची ही चिठ्ठीपध्दत बंद केली. या पुढे देखील मोदीचेच नेतृत्व भारताला हवे आहे.
मोदींचे हात बळकट करायचे आहे. त्यामुळे येत्या विधानसभा व लोकसभा निवडणूकीत कोण हिरा आहे हे ओळखून मतदान करा. समाजासाठी, देशासाठी काम करणायारना मतदान करा, असे आवाहन संजय टंडन यांनी केले. यावेळी आ. प्रशांत ठाकूर, माजी आ. धैर्यशिल पाटील, अॅड. महेश मोहीते यांनीदेखील आपले मनोगत व्य3त केले.