अलिबाग । मुंबई विभागात रायगड प्रथम आला असून रायगडचा निकाल 91.94 टक्के लागला आहे. यातही मुलींनी बाजी मारली आहे. मुली पास होण्याची टक्केवारी 94.48 इतकी तर 89.57 टक्के मुले पास झाली आहेत.
रायगड जिल्ह्यातुन 31 हजार 602 विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. यापैकी28 हजार 121 विद्यार्थी पास झाले आहेत. सर्वाधिक निकाल तळा तालुका 97.30 लागला असून दोन नंबरवर पनवले आहे. पनवेलचा 96.53 इतका निकाल लागला आहे. सर्वांत कमी निकाल मुरुड तालुक्याच 81.28 इतका लागला आहे.
जिल्ह्यातील तालुका निहाय निकाल
पनवेल 96.53
उरण 93.24
कर्जत 86.38
खालापूर 82.93
सुधागड 82.42
पेण 89.67
अलिबाग 91.41
मुरुड 81.28
रोहा 92.65
माणगाव 94.62
तळा 97.30
श्रीवर्धन 94.53
म्हसळा 94.75
महाड 87.51
पोलादपूर 88.21