अलिबाग । मुंबईकडून अलिबागला स्पिडबोटने येताना आज रायगडचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे बालंबाल बचावले. काही क्षणासाठी स्पिडबोट चालकांचे नियंत्रण सुटले होते. सुदैवाने त्यांने वेळीच नियंत्रण मिळवले आणि पुढचा दुदैवी अनर्थ टळला.
350 वा शिवराज्याभिषक सोहळ्याच्या तयारीची बैठक आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात होती. या बैठकीला रायगडचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि संभाजीराजे स्पिडबोटने अलिबाग येथे येत होते. त्यांची बोट मांडवा जेटटीजवळ आली असताना, बोटीचा स्पिड वाढला. काही क्षणासाठी चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोटी जेटटीच्या दोन खांबांना घासली गेली.
थोडावेळ या दोघांनाही काय घडतंय समजले नाही. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आ.महेंद्र दळवी हेदेखील मांडवा जेटटीवर होते. समोरचा प्रसंग पाहून त्यांचा हद्ययाचा ठोका चुकला. सुदैवाने तत्परता दाखवून बोट चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवले आणि पुढील अनर्थ टळला. ही घटना त्यांनी पत्रकारांना सांगितली.
यापुर्वीदेखील एकदा पालकमंत्री उदयसामंत यांची बोट भर समुद्रात बंद पडली होती. त्यावेळी दुसर्या बोटीचा आधार घेत त्यांनी किनारा गाठला होता.