"पक्ष संघटनेत कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमांचा वापर करणे गरजेचे": आदिती तटकरे

By Raigad Times    13-Aug-2022
Total Views |
aditi tatkare
म्हसळा | समाजकारण आणि राजकारण हे सामाजिक विकासाची दोन चाके आहेत. सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात जनेतला अपेक्षीत विकासकामे करताना पक्ष संघटनेतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी लोकाभिमुख काम करीत असताना केलेल्या कामांसाठी प्रसार माध्यमांचा वापर करणे गरजेचे असल्याचे मत माजी पालकमंत्री आमदार आदिती तटकरे यांनी म्हसळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी संघटनेच्या पदाधिाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमात व्यक्त केले.
 
म्हसळा वि.शहर संघटना अध्यक्ष शाहनावाज शाहिद उकये यांनी जिल्हा विद्यार्थी संघटना अध्यक्ष यांचे शिफारसीनुसार गठीत केलेल्या म्हसळा शहरातील विस्तारीत 25 सदस्य कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष जिब्रान घराडे, सिध्देश कर्णिक, सचिव- हसनमिया चोगले, खजिनदार शिवतेज म्हशिलकर, संघटक आनस हासपाटेल, सुरज कुडतुडकर, सुफियान दामाद, इरफान जामदार, झैद पठाण, शब्बीर शेख, उरसमान कोठोवले, मुस्तकिम वस्त्ता आदी कार्यकर्त्यांची नियक्ती करण्यात आली आहे.
 
नवनियुक्त कार्यकर्त्यांना आमदार आदिती तटकरे यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले. आमदार तटकरे यांनी संघटना अध्यक्ष शाहनावाज उकये यांच्या नेतृत्वाखाली गठीत करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी पक्ष संघटनेला काम करण्यास चांगले यश प्राप्त व्हावेत अशा शुभेच्छा दिल्या.
 
कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष समीर बनकर, नगराध्यक्ष असहल कादिरी, नगरसेवक संजय दिवेकर, शाहिद उकये, मधुकर गायकर, संदिप चाचले, अनिल बसवत, नईम दळवी, चंद्रकांत पवार, समीर काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.