अलिबाग | खंडाळे गावातील वहिवाटीच्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे केलेले बांधकाम काढले न गेल्याने, ते प्रशासनाने लवकरात लवकर काढावे यासाठी वैभव काशिनाथ म्हात्रे आणि ग्रामस्थ यांनी बुधवारपासून (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.
खंडाळे गावातील विनायक हरिश्चंद्र म्हात्रे ता. अलिबाग, जि. रायगड यांनी प्राथमिक शाळा खंडाळे ते पाचकळशी आळीपर्यंतच्या १४ फूट रूंदीच्या डांबरी रस्त्यात २०२१ मध्ये डबर, सिमेंटचे अनधिकृत बांधकाम केले आहे. हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
खंडाळे गावातील शेतकरी वर्गाला वहिवाटीच्या रस्त्यास अडथळा होत असल्याने या अनधिकृत बांधकामाविरूद्ध आपण उपोषणास बसलो असल्याचे जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.