वणवे रोखण्यास वनविभाग मात्र अयशस्वी
पोलादपूर : सर्वत्र आता उन्हाची झळ सुरू झाली असून सुकलेला पालापाचोळा सुकलेले गवत याला वणवा लागून अनेक ठिकाणी वनसंपत्ती धोक्यात येत आहे व याचा फटका वन्यजीव व स्थानिक नागरिकांना देखील होत आहे. रविवारी रात्री पोलादपूर तालुक्यातील वाकण धामणेची वाडी येथे वनव्यामध्ये गुरांचा गोठा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या वाकण धामणेचीवाडी येथे रविवारी रात्रीच्या सुमारास वनवा लागला होता व वनवा इतका भीषण इतकी होती की तेथील रहिवासी तुकाराम सखाराम गावडे यांचा गुरांचा गोठा वणव्यामध्ये जळून खाक झाला आहे.यामध्ये 1500 कौले, उपयोगी वस्तू ,शेतीसाठी लागणारी अवजारे यासह इतर छोट्या-मोठ्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्याची साधने स्पष्ट झाल्याने शेतकरी उघड्यावर पडला आहे.
या घटनेनंतर वाकण येथील तलाठी बनसोडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व जवळपास 95 हजारांचे नुकसान या वणव्यांमुळे गोठ्याचे झालेले आहे. यावेळी पोलीस पाटील साने, ग्रामपंचायत लेखनिक पांडुरंग साने, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद साने, सुंदर गावडे, निवृत्ती कदम उपस्थित होते.