नवी मुंबई । कळंबोली इथे आलेल्या खासगी ट्रॅव्हल बसमधून एक जण उतरताच, त्याच्यावर 2 ते 4 चोरांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला. नंतर त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्याजवळील बॅग हिसकावून पळ काढला. या बॅगेत काही लाख रुपये रोकड असण्याची शक्यता आहे. दरम्यान ही व्यक्ती जखमी असून उपचार सुरु आहेत.
बीडवरुन आलेली खासगी ट्रॅव्हलची एक बस आली होती. ही बस सायन पनवेल महामार्गावर कंळबोलीला येऊन थांबली. बसमधून प्रवासी उतरताच त्याच्यावर चोरट्यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून प्रवाशाची बॅग हिसकावून पोबारा केला.
बॅगेत 30 लाख रुपये असल्याचं सांगितले जात आहे. हा सर्व कट या व्यक्तीच्या निकटवर्तीयाकडून केल्याचा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासातून वर्तवला आहे. दरम्यान कामोठे पोलीस सदर घटनेचा सखोल तपास करत आहेत.