मुंबई । यंदा लांबलेल्या आणि जाता जाता थैमान घालणार्या परतीच्या पावसाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख दत्तात्रय होसाळीकर यांनी तशी माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
रविवारी दसर्यालाही रायगडात रात्री पावसाने हजेरी लावून शेतकर्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. आज सकाळपासून ढगाळ वातावरण पहायला मिळत होते. अशा वातावरणात कोकणासह राज्यातील इतर भागातून आजपासून पावसाने माघार घेतली आहे. परतीच्या पावसाचा हा प्रवास डहाणू, नाशिक, नांदेड आणि नलगोंडा (तेलंगाणा) आणि इतर भागातून होत आहे.
पावसाचा परतीच्या प्रवासात काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. या बातमीनंतर जा बाबा अशी प्रतिक्रीया शेतकर्यांची आल्याशिवाय राहणार नाही.