अलिबाग । रेवस येथे तरंगत्या जेट्टीचे काम करताना रविवारी संध्याकाळच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये अबू बखर शेख हा कामगार जखमी झाला आहे. या कामगारावर अलिबाग येथे रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
रेवस आणि करंजा दरम्यान रो रो सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 19 कोटी रुपये खर्चाची करंजा तर रेवस बंदरात 25 कोटी रुपये खर्च करुन जेटटीचे काम सुरु आहे. हे काम मार्च 2019 पर्यंत पुर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र ते सुमारे दिड वर्ष रखडले आहे.
रविवारी काम सुरु असताना तरंगते प्लॅटफॉर्म सरकले आणि अपघात झाला असे मेरीटाइम बोर्डाकडून सांगण्यात आले. या अपघात एक कामगार जखमी झाला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.