श्रीवर्धन । राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि मंत्री अदिती तटकरे यांचा होमग्राऊंड समजल्या जाणार्या श्रीवर्धन नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदी शिवसेना ठाकरे गटाचे अॅड.अतुल चौगुले विजयी झाले आहेत. त्यांनी अक्षरशः ‘एकटा टायगर’सारखी निवडणूक लढवली. त्यांनी माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांचा 219 मतांनी पराभव केला.
पनवेल । पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पोर्शभूमीवर संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असली, तरी प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर होण्याआधीच अंतर्गत राजकारण, नाराजी, दबाव तंत्र आणि समीकरणे अधिक तीव्र होत चालली आहेत.
महाड । रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित, शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महाड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिंदे शिवसेनेचे सुनील कविस्कर हे विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपद जरी शिवसेनेकडे गेले असले तरी राष्ट्रवादी-भाजप युतीने नगरसेवकपदाच्या 12 जागा जिंकून आणल्या आहेत.
अलिबाग । अलिबाग नगरपरिषदेवर पुन्हा एकदा लाल बावटा फडकला असून, शेकापने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. थेट नगराध्यक्षपदी अक्षया नमिता प्रशांत नाईक यांनी दणदणीत विजय मिळवत, महायुतीच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांचा पराभव केला.
महाड । महाड नगरपालिकेवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीने नेते सुनील तटकरे या दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात होती. महाड शहराने यापूर्वी कायम माणिक जगताप यांची साथ दिली होती.
मुरुड । मुरुड नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या आराधना दांडेकर नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगराध्यक्ष कल्पना पाटील यांचा पराभव केला.
उरण । उरण नगरपालिकेवर याआधी भाजपची म्हणजेच आमदार महेश बालदी यांची सत्ता होती. मात्र या निवडणुकीत उरणकरांनी बालदी यांना जोरदार झटका दिला आहे. भाजपकडून दिलेल्या उमेदवार शोभा कोळी-शाह यांचा महाआघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी पराभव केला आहे.
अलिबाग । शेकापच्या अक्षया नाईक या सर्वांत कमी वयाच्या नगराध्यक्ष ठरल्या आहेत. अक्षया यांचे वय अवघे 22 आहे. त्या अलिबाग नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत.
रोहा । रोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार वनश्री समीर शेडगे नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांचे नऊ वर्षांपूर्वी अवघ्या सहा मतांनी पराभव झाला होता.
अलिबाग । रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल रविवारी (21 डिसेंबर) जाहीर झाले. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली होती. दोन पक्षांमधील हा राजकीय सामना ‘टाय’ झाल्याचे दिसत आहे.
अलिबाग | अलिबाग तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. नागाव येथे सहा जणांना जखमी केल्यानंतर फसार झालेल्या बिबट्याने शुक्रवारी (१२ डिसेंबर) सकाळी आक्षी येथील साखर परिसरात दोन जणांवर हल्ला चढवला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागपूर | राज्यात पापलेट (सिल्वर पॉम्फ्रेट) मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार ५५ मेट्रिक टनांची वाढ झाली असून, हे संवर्धनात्मक उपाययोजनांचे यश असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. शुक्रवारी (१२ डिसेंबर) विधानसभेत निवेदन करताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, शाश्वत मासेमारीसाठी लहान माशांची पकड रोखण्याच्या उद्देशाने २ नोव्हेंबर २०२३ रोजी ५४ प्रजातींसाठी किमान कायदेशीर आक्रमण निश्चित केले आहे.
मुरुड जंजिरा । मुरूड जंजिरा नगरपरिषद निवडणूकी दाखल अर्जांपैकी 1 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदासाठी दाखल 12 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी 5 तर 74 नगरसेवक पदासाठी करिता अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार-आदेश डफल यांच्या कडे सुपुर्त करण्यात आले होते.
ताम्हणी | माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात गुरुवारी (३० ऑक्टोबर) दुपारी झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना माणगाव तालुक्यातील कोंडेथर गावाजवळ घडली असून, कारच्या सनरुफवर दगड कोसळल्याने हा दुर्दैवी अपघात झाला.
गोरेगाव | राज्यभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच रायगड जिल्ह्यातील गोरेगावात राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विकास दादा गायकवाड यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
रोहा । रोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्षपदी वनश्री समीर शेडगे यांनी 4 हजार 695 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांचे नऊ वर्षांपूर्वी अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केले.
रोहा | पाहुणा म्हणून आलेल्या तरुणाने घरातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रोह्यात घडली आहे. १ एप्रिल ते ६ नोव्हेंबर या काळात घरातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
म्हसळा | म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड येथील वृध्द दाम्पत्याची त्यांच्या दोन मुलांनीच गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. म्हसळा पोलिसांनी या खूनाचा उलगडा पोलिसांना केला असून दोघांना अटक केली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
म्हसळा | तालुक्यातील खरसई गावातील भावेश जनार्दन म्हसकर यांनी शिक्षण क्षेत्रात एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास आता देशातील सर्वोच्च व्यवस्थापन संस्थांपैकी एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) उदयपूर येथे पोहोचला आहे.
पेण | पेणखोपोली मार्गावरील अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नसून रविवारी (२ डिसेंबर) रात्री पुन्हा एकदा भीषण अपघाताने परिसर हादरला. रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास आंबेघर पेट्रोल पंपाजवळील हॉटेल टिक्का समोर वेगाने धावणार्या अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
बेणसे । केंद्रात आणि राज्य भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची गट्टी असली तरी रायगडात मात्र कट्टीचे चित्र कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मंत्री भरत गोगावले यांनी दिलेला युतीचा फॉर्म्युला खासदार सुनील तटकरे यांनी फेटाळून लावल्यानंतर मंत्री गोगावले यांनी तटकरेंना आमनेसामने लढण्याचे आव्हानच देऊन टाकले आहे.
पनवेल | खारघर शहरातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेद्वारे चालणारी इलेट्रिक बस सेवा गेल्या काही दिवसांपासून अपुर्या चार्जिंग सुविधांमुळे वारंवार ठप्प होत असून नागरिकांना गंभीर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बस वेळेवर चार्ज न झाल्याने निर्धारित वेळापत्रकानुसार फेर्या राबवल्या जात नसल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि कामगार वर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे.
सुधागड-पाली । सुधागड तालुक्यातील खेमवाडी येथील भगवान खताळ यांचे वारस झोरे कुटुंबियांनी आपल्या पूर्वजांचे घर खेमजाई नवतरुण मित्रमंडळ, खेमवाडी या सार्वजनिक मंडळाला दान करून अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. या उपक्रमामुळे गावकर्यांना विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे.
वाघोशी । सुधागड तालुक्यातील पाली पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत मेढ्यांच्या झुंजीच्या नावाखाली चालणारा अवैध सट्टा उधळून लावला. या प्रकरणात पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 75 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेजण फरार झाले आहेत.
कर्जत | आरपीआय आठवले गटाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यामुळे खळबळ उडाली असून याबाबची तक्रार डाळींबकर यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे केली आहे.
कर्जत । साधी कच्ची घरे, मजुरी आणि शेतीवर चालणारं आयुष्य...नयन वाघ हा तरुणदेखील हेच आयुष्य जगत होता....दहावीत तो सलग तीन वेळा नापास झाला...अपघातामुळे पोलीस भरतीत उतरण्याची संधी हुकली होती.
खोपोली । खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांच्या छाननी प्रक्रिया चांगलीच रखडल्याचे पहायला मिळाले. या नगरपालिकेत प्रमुख राजकीय पक्षांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आला.
वावोशी | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) पहाटे खालापूर टोल नाका परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
उरण । माहितीचा अधिकार अंतर्गत दाखल अपील आणि माहिती आयोगाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करणे रायगड जिल्हाधिकार्यांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी माहिती आयोगाचे कोकण आयुक्त शेखर चन्ने यांनी, लभार्थीला 25 हजार रुपये नुकसान भरपाई तसेच पुढील सुनावणीस प्रत्यक्ष हजर राहण्याचा समन्स जिल्हाधिकार्यांना बजावला आहे.
पोलादपूर । पोलादपूर तालुक्यातील सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक ज्ञानू हजारे (वय 66, रा. अंकलखोप, ता. पलुस, जि. सांगली) यांच्याविरोधात आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा 2003-06 या कालावधीत झालेल्या ठेव व्यवहारांसंदर्भात 2018- 2023 च्या लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे येथे २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ निष्पाप जीवांचा बळी गेला. यामध्ये साखर सुतारवाडी येथे भूस्खलन होऊन सुतारवाडीतील घरेही जमीनदोस्त झाली होती. तेव्हापासून या दरडग्रस्तांची घरासाठी वणण सुरु आहे.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नागपूर | राज्याच्या वाळू निर्गती धोरणानुसार वाळू गटातील १० टक्के वाळू घरकुलांसाठी राखीव ठेवण्यात येत आहे. तथापि, कृत्रिम वाळूचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर असल्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य कृपाल तुमाने यांनी कमी दरात वाळू उपलब्ध होत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
नागपूर | राज्यातील महिला स्वयंसाहाय्यता गटांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘उमेद मॉल’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याचे लक्ष्य असून, त्यासाठी सरकारने २०० कोटींची तरतूद केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
नवी मुंबई | नवी मुंबई प्रकल्पासाठी सिडको मंडळाने अधिसूचित केलेल्या रायगड जिल्ह्यातील सुमारे ६० हेक्टर ९५ गुंठे जमिनीच्या मालकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने सखोल चौकशीचा निर्णय घेतला आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई | नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांवर आक्षेपांची मालिका सुरू झाली असून आतापर्यंत ३५० पेक्षा अधिक हरकती दाखल झाल्या आहेत. हरकती नोंदविण्याची मुदत २७ नोव्हेंबरपर्यंत होती; मात्र ती वाढवून ३ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे.
मुंबई । पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हफ्त्याचे वितरण बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या हप्त्यामुळे राज्यातील शेतकर्यांना लागवड, बियाणे, उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी आवश्यक असे तातडीचे आर्थिक बळ मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.