रेवदंडा । थेरोंडा येथे खंडोबा मंदिरातील देव मुर्ती चोरी, तसेच मुंबईकर कुटूंबीयांच्या कुलदैवत मुर्त्यांची चोरी करणार्या चोरट्याला थेरोंडा आगलेची वाडी येथून रेवदंडा पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे. लग्न व धंद्यासाठी घेतलेले कर्ज परत फेड करता येत नव्हती...पैसे मागणार्यांच्या फेर्या वाढल्या होत्या. त्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलीसांनी केलेल्या चौकशीत सांगितले आहे.
अलिबाग | अलिबाग-मुरूड - रोहा या तीन तालुक्यांना जोडणाऱा दुवा साळाव पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या पुलावरून पाच टनांवरील वाहनांना यापूर्वीच बंदी घातलेली आहे.
रोहा | धाटाव एमआयडीसीतील खाद्य पदार्थांसाठी रंग तयार करणाऱ्या रोहा डाय केम या कंपनीतील गोडाऊनमध्ये बुधवारी दुपारी १ वा. सुमारास आगीची भीषण घटना घडली.
अलिबाग । भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असून पाकिस्तानला धडक देण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला धोका नसल्याचा निर्वाळा देण्यात आल्यामुळे कोकणवासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. चक्रिवादळाचा परिणाम केरळात धडकणार्या मान्सूनवर होणार आहे. परिणामी कोकणाच्या दिशेने सरकत येणारा मान्सूनही उशिरा होणार आहे.
अलिबाग । रायगड जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.28 टक्के लागला असून, या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे
अलिबाग | मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन एक सहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दिनांक 27 मे रोजी दुपारच्या सुमारास महाड तालुक्यातील आंबीवली गावात घडली.
अलिबाग । मुंबई विभागात रायगड प्रथम आला असून रायगडचा निकाल 91.94 टक्के लागला आहे.
अलिबाग | रायगड पोलीस दलात भरती पात्र झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी तपासणी प्रक्रिया सुरू असताना उमेदवाराकडून जिल्हा सामान्य रुग्णालयात पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कर्जत । कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायतमधील नेवाळी गावात कोवळा चारा खाल्ल्याने एका शेतकर्याची 19 जनावरे बाधित झाली आहेत
अलिबाग । अलिबाग भुमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करण्यासाठी ठेकेदाराने पैसे बचाव भुमीका घेतली आहे.
अलिबाग | महामार्गावर होणारे अपघात 24 तास वायूवेग पथके राहणार कार्यरत टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना सुरु केल्या आहेत.
पनवेल | पनवेल तालुक्यातील शेडुंग टोल नाक्याच्या पुढे कायदेशीर कर्तव्य पार पाडीत असलेल्या एका लोकसेवकाच्या अंगावर चार चाकी वाहन चालकाने गाडी घातल्या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात सदर गाडी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
21.1k
अलिबाग : अलिबाग बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. प्रसाद पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी अॅड. प्रवीण ठाकूर यांचा पराभव केला. उपाध्यक्षपदी अनंत पाटील निवडून आले. त्यांनी अॅड. मानसी म्हात्रे यांचा पराभव केला. यावेळी बार असोसिएशनची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज (८ फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली.
कोर्लई : मुरूड तालुक्यातील एकदरा गावात एका दिवसात पिसाळलेल्या गाईच्या हल्यात पाच जण जखमी झाले आहेत. गेले तिन दिवस ही गाय दिसेल त्या पुरुष, स्त्रीयांवर, मुलांवर हल्ले करत आहे. तिन दिवसांत १२ जणांवर या गाईने हल्ला केला आहे. या वाढलेल्या प्रकारानंतर गावकऱ्यांनी जोखीम घेऊन या गाईला जेरबंद केले.
मुरुड । मुरुड बाजारपेठ मधील डॉ.दिलिप बागडे यांच्या मालकीच्या जागेत १०२ वर्षे जुनी असलेली इमारत सद्यस्थितीत मोडकळीस आलेल्या अवस्थेत असल्याने या जागेत असलेल्या परस्पर पतपेढीला मुरुड नगरपरिषदेने इमारत खाली करण्याचे आदेश देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने डॉ.दिलिप बागडे यांनी रायगड जिल्हाधिकारी, मुरुड तहसीलदार आणि नगरपषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून मागणी केली आहे.
माणगाव । माणगाव तालुक्यातील म्हसेवाडी येथे वृद्ध महिलेला लुटून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली होती. या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे तिघेही मारेकरी हे गावातीलच आहेत.
माणगाव : माणगाव-पुणे रस्त्यावर मोर्बा घाटात सुर्ले गावच्या हद्दीत एसटी बस व मोटार सायकल(दुचाकी) यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला.सदरचा अपघात बुधवार दि.२३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडला.या घटनेची फिर्याद बसचालक सुभाष रामराव वाघमारे(वय-४२) रा.बागन टाकली जि.नांदेड सध्या रा.श्रीवर्धन बस डेपो यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
रोहा । चौपदरीकरणाचे काम रखडल्याने आणि दुरावस्था झालेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नाका येथे मानवी साखळी आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधून घेतले. मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त, ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन करण्यात आले. मंजुरीनंतर 11 वर्षे रखडलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी व्हावी आणि दोषी ठेकेदार, अधिकारी व संबंधितांवर कडक कारवाई करण्
पनवेल | पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर गत गुरुवारी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आलेल्या प्रियंका रावत या 29 वर्षीय महिलेच्या प्रकरणाचा छडा लावण्यात खान्देश्वर पोलिसांना यश आले आहे, ही हत्या प्रियंकाचा पती व त्याच्या प्रेयसीने सुपारी देऊन घडवून आणल्याचे तासात उघडकीस आले आहे.
श्रीवर्धन : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका जाहीर कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून सर्वत्र त्यांचा जाहीर निषेध व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावामध्ये एक परप्रांतीय कुटुंब राहत होते. यामधील एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार होण्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर पीडित मुलीचे कुटुंब वाळवटी येथील एका चाळीमध्ये राहत होते. याच चाळीमध्ये राहणाऱ्या एका स्त्रीने सदर मुलीला तुला कामासाठी बाहेरगावी घेऊन जाते, अशी फूस लावून श्रीवर्धन या ठिकाणाहून माणगाव या ठिकाणी घेऊन गेली. सदर स्त्रीने तिला माणगाव येथे आपल्या बहिणीच्या घरी पाच सहा दिवस ठेवून घेतले. सदर मुलगी 24 ऑक्टोबर रोजी वाळवटी गावातून बेप
म्हसळा । म्हसळा तालुक्यात आज पर्यंत १०९४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चालू खरीपाच्या हंगामात पाऊस उशीरा सुरू झाला आसला तरी त्यानी मागील वर्षाची सरासरी गाठली आहे. गेल्या आठवड्यात ६११ मि.मि.पावसामुळे खरीप पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. नद्या, ओढे, नाले पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाऊस आधूम-मधून उघाडी देत असल्यामुळे बळीराजा लावणीच्या, तालुक्यातील फळबागायतदार आंबा-काजूच्या आणि अन्य बागायतींच्या मशागतीच्या कामात गुंतला आहे.
म्हसळा । ऑनलाइन वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्या समद कौचाली रा.तोराडी बंडवाडी या ग्राहकाने कस्टमर केअरच्या माध्यमांतून डीलेव्हरी ट्रॅक करताना कुरीअरचा शोध घेता घेता फोन केला असता कौचाली यांना तब्बल ५४ हजार ९९७ रुपयांचा गंडा बसल्याची घटना घडली आहे.
पेण : पेण येथील गतिमंद मुलांची शाळा म्हणून ओळख असलेल्या सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा पाटील यांना महासंस्कृती व्हेंचर्स आयोजित महासंस्कृती कोकण सन्मान 2022 या पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.
अलिबाग | मुंबई-गोवा महामार्गावर नदीपात्रात सापडलेली स्फोटके खोटी असल्याचं निष्पन्न झालं आहे. यामुळे पेणकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गुरुवारी सांयकाळी पेण पोलिसांना मुंबई- गोवा महामार्गावर भोगावती पुलाखाली बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचा फोन आला होता. या घटनेची तातडीने दखल घेत पोलिसांनी बॉम्बशोधक पथकांना पाचारण केलं होतं. अलिबाग आणि नवी मुंबईची बिडीडीएस पथके घटनास्थळी दाखल झाली होती. नवी मुंबईचे दहशतवाद विरोधी पथकही रात्री उशीरा दाखल झालं होतं.
नवी मुंबई । पामबीच मार्गावरून थेट सायन-पनवेल महामार्गावर प्रवेश करणे आता सोपे आणि जलद होणार आहे. सायन-पनवेल महामार्गाला पनवेलच्या दिशेने जोडण्यासाठी पाम बीच मार्गावर वाशी, सेक्टर-17 पासून एका आर्म ब्रिजचे काम नवी मुंबई महापालिकेतर्फे लवकरच सुरू होणार आहे. या पुलासाठी सुमार साडेनऊ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
पोलादपुर । राजकिय वर्चस्ववाद एकाच्या जीवावर बेतला तर 9 जणांचे कुटूंब उध्वदस्त करुन गेला आहे. पोलादपूर तालुक्यातील एका गावात शेकाप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमधील वादातून शिवसेना कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. या प्रकरणी 9 जणांना माणगाव अति.सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. हे सर्व कार्यकर्ते शेकापचे कार्यकर्ते आहेत.
पाली//बेणसे | नववर्षातील पहिल्या अंगारक संकष्टी चतुर्थीला मंगळवारी अष्टविनायकांपैकी एक प्रख्यात तीर्थक्षेत्र व आय एस ओ मानांकन प्राप्त म्हणून मान मिळवलेल्या पाली नगरीत भाविकांनी दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती.
उरण | उरण शहराकडून नवीमुंबई शहराकडे जाणार्या एन एम एम टी बस व वँगनर गाडीची समोरा समोर धडक झाल्याने सदर अपघातात वँगनर गाडीचा चालक जखमी झाला आहे.सदर अपघात हा गुरुवार दि22 सप्टेंबर रोजी सकाळी 6-15च्या सुमारास घडला आहे.
कर्जत । 1990च्या दशकात उदयास येऊ लागलेली शेतघराची क्रेझ आज कर्जत तालुक्याला जगाच्या पाठीवर नेऊन ठेवणारी आणि कर्जत या नावात असलेली जादू यामुळे फार्म हाऊस म्हटले की कर्जत असे सहज उदगार येतात. त्या कर्जतमध्ये आपला देखील टुमदार बंगला असावा अशी फर्माईश धनिकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, या संधीचा फायदा उठविण्यासाठी कर्जतचा एकही कोपरा बांधकाम व्यावसायिकांनी शिल्लक ठेवला नाही आणि त्यामुळे कर्जतचे प्रेम सर्वांना असून त्याचाच एक भाग आता भारताला क्रिकेट विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार कपिल देव निखंज यांनी कर्जत मध
कर्जत : राजकीय गैसमजातुन कर्जत येथील रिलायन्स पेट्रोल पंप येथे तांबस येथील चार तरुणांना मध्यरात्री मारहाण करण्यात आली. त्यावेळी एका व्यक्तीकडून लोखंडी हत्यार देखील वापरण्यात आले असून या हल्ल्यात तीन तरुण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेत रायगड जिल्ह्यातील मोठ्या राजकीय नेत्यावर तसेच अन्य एक आणि २५ अनोळखी यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई । खालापूर पोलीस ठाण्यांतर्गत दरोडा प्रतिबंधक पथकात कर्तव्यावर कार्यरत गृहरक्षक दलाचे जवान लक्ष्मण विठ्ठल आखाडे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर 5 सप्टेंबर 2022 रोजी रात्री दीड वाजता अपघात झाला होता. या अपघातात त्यांना कायमस्वरुपी अपंगत्व प्राप्त झाले. त्यांना एचडीएफसी बँकेतर्फे विमा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या 25 लाख रुपये रकमेचा धनादेश गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
वावोशी । खालापूर तालुक्यातील बीड खुर्द गाव हे डोंगराळ भागात वसले असून हा भाग दरडग्रस्त प्रवण म्हणून ओळखला जातो. या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे दरड कोसळून कोणतीही जीवितहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून बीड गावातील लोकांची पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांना समाज मंदीर अथवा रायगड जिल्हा परिषद शाळेत वास्तव्यास स्थलांतरित होण्याची नोटीस खालापूर तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
उरण : उरण तालुक्यातील एकूण १८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक जण दिवसाचा रात्रं व रात्रीचा दिवस करून मेहनत घेत आहे. उरण तालुक्यात एकूण १८ ग्रामपंचायतच्या निवडणुका असून या १८ ग्रामपंचायतच्या निवडणुका मध्ये पिरकोन , भेंडखळ , पागोटे , सारडे , जसखार , नवीन शेवा या ग्रामपंचायती मध्ये स्व बळावर लढत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका घेतलेली आहे.
उरण : जिद्द, चिकाटी, मेहनत व दृढ आत्मविश्वास असेल तर नक्कीच यश आपल्या पायाशी लोळण घालते. याचा प्रत्यय अविरत चित्रपटला आला आहे. कलाकारांच्या आयुष्यातल्या पहिल्या चित्रपटाने त्यांना मानसन्मान मिळवून दिला दिला. तो चित्रपट म्हणजे अविरत या चित्रपटाचे निर्माते मिलिंद म्हात्रे यांना आयडियल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2022 मध्ये सिल्लोड संभाजीनगर येथे झालेल्या या भव्य दिव्य सोहळ्यात बेस्ट फिल्म डायरेक्टर या अवॉर्डने महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार अब्दुलजी सत्तार यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
महाड । सोन्याचे दागिने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने एका महिलेला पावणेदोन लाखांचा गंडा घातल्याची घटना महाड शहरात घडली आहे. याप्रकरणी दोन अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड : राज्य शासनाच्या नवीन शिक्षण धोरणानुसार कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळा थेट बंद न करता याठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या अन्य शाळेत समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महाड तालुक्यातील १ ते ५ पट संख्या असलेल्या ६३ शाळांवर गदा आली आहे. एकीकडे येथील भौगोलिक स्थिती पाहता विद्यार्थी समायोजन शक्य नसल्याचे दिसून येत असले तरी या निर्णयाने कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट होत आहे.
अलिबाग । बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष असून त्यांचं नाव वापरण्याचा अधिकार सर्वांना आहे. बाळासाहेबांचा छायाचित्र लावू नका म्हणणार्यांनी हिम्मत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून काढून निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
मुरुड | मोकाट जनावरांना वेसन घालणार कोण ? असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. सर्वत्र फिरणार्या या मोकाट जनावरांमुळे वाहनचालक व पादचारी यांना जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
तळा | तळा तालुक्यातील तारणे येथील बस स्टँडवर उभ्या असलेल्या २२ वर्षीय मुलीचा अज्ञात इसमाने विनयभंग केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
पुणे | राज्यात तिसरीपासून पुन्हा परीक्षा होणार असल्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जात होते. ती ढकलगाडी आता बंद होण्याची शक्यता आहे.
मुंबई | मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकर भरतीसाठीच्या मुलाखती चेन्नईमध्ये होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली.
अलिबाग । आठवड्यात पैसे दुप्पट मिळण्याचे आमिष दाखवून कंपनीने अलिबाग तालुक्यातील शेकडो तरुणांना करोडोचा चुना लावला आहे. त्यामुळे या तरुणावर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. याबाबत सायबर पोलिसांकडे फसवणूक झालेल्या तरुणांनी धाव घेतली आहे.
अलिबाग | ठाकरे कुटुंबियांविरोधात वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत बंडखोर नेते रामदास कदम यांच्या विरोधात आज शिवसेनेने अलिबागेत जोडेमारो आंदोलन केले.यावेळी कदम यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते.
पनवेल | पोलीस कर्मचाऱ्यांची इच्छित स्थळी बदली करण्यासाठी 1लाख रुपयाची लाच मागणारे, महामार्ग सुरक्षा पथक पनवेल विभागाचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नारायण वारे याना 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांच्या पथकाने रांगेहात अटक केली आहे.