पेण (देवा पेरवी/प्रदीप मोकल) ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या पुढाकाराने पेण येथे शुक्रवारी (22 जानेवारी) मोफत चिकन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला पेण तालुक्यातील अधिकारी, पोल्ट्री व्यावसायिक परिवार व नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (23 जानेवारी) कोरोनाच्या 2 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एका रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबई । मला जेलमध्ये जायचे आहे असे सांगणारा या जगात भेटणार नाही. जेल म्हणजे गुन्हेगारांना शिक्षेसाठी ठेवण्यात येणारे ठिकाण असे आपण माणतो. मात्र याच जेलमधून स्वातंत्र्यपुर्व काळामध्ये आपले स्वातंत्र सेनानी, महापुरुषांना इंग्रजांनी डांबून ठेवले होते. हि ठिकाणं सामान्यांना पाहता यावीत यासाठी राज्य सरकार तुरूंग पर्यटन नावाची संकल्पना राबवणार आहे.
अलिबाग । यावर्षीची पहिली हापूस आंब्याची पेटी अलिबाग येथून शुक्रवारी (22 जानेवारी) वाशी येथील एमपीएमसी फ्रूट मार्केटमध्ये रवाना झाली आहे. खराब हवामान, अवकाळी पाऊस यामुळे यंदा थोडा उशिरानेच हापूस बाजारात आला आहे. तरी अलिबागचा आबा पहिला आला आहे.
पनवेल । भारतीय डाक विभागाचे बोगस किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र तयार करुन त्याद्वारे बँकेतून कर्ज घेणार्या टोळीतील चौघांना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. एचडीएफसी बँक पनवेल येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून बनावट किसान पत्र, राष्ट्रीय बचत पत्र, रबरी स्टॅम्पसह सुमारे 6 कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे चौघांपैकी एक जण भारतीय डाक विभागातातील निलंबित पोस्ट मास्तर आहे.
कोर्लई । मुरुड तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण ठरविण्यासाठी पंचायत समिती सभागृहात शुक्रवार (दि.22) जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांनी सभेचे आयोजन केले होते. यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पाली/बेणसे । सुधागड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण शुक्रवारी (दि.22) पालीतील भक्तनिवास क्रमांक 1 येथे जाहीर करण्यात आले. यामध्ये तब्बल 16 ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. परिणामी जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींवर महिलांचे अधिराज्य गाजणार आहेत. महिलराज येणार असल्याने महिला वर्गात आनंदाची लाट उसळली आहे.
मुंबई : कोकणासह राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदाजाप्रमाणे खरंच पाऊस पडला तर बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
धम्मशील सावंत/पाली-बेणसे । सुधागड तालुक्यातील कानसळ गावातील फार्महाऊसमध्ये झालेल्या घरफोडीप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच खालापूरातील गुन्हेही उघडकीस आले आहेत.
कर्जत : तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आल्या. पंरतु सरपंच पदाचे आरक्षण आरक्षण जाहीर करण्यात आले नव्हते. गुरुवार दि. 21 जानेवारी रोजी निवडणूक झालेल्या 9 ग्रामपंचायती व अन्य अशा कर्जत तालुक्यातील सुमारे 52 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत पार पडली.
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडतीत ‘कही खुशी कही गम’ असे चित्र पहावयास मिळाले. तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीमधील सन २०२० ते २०२५ या कालावधीत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात गुरुवारी ता. 21 रोजी पार पडली. यात अनेक ठिकाणी फेरबदल झाल्याने ‘कही खुशी कही गम’ असे चित्र पाहायला मिळाले.
माणगाव । माणगाव तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींच्या सन 2021 ते 2025 करिता सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत गुरुवार दि.21 जानेवारी रोजी तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी जाहीर केली.
21.1k
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (22 जानेवारी) दिवसभरात 12 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर पिंपळभाट येथे एका नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.
अलिबाग । अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळे परिसरात अचानक 13 कोंबड्या दगावल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी 4 कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तपासणीच्या अहवालानंतरच या कोंबड्या ‘बर्ड फ्लू’ने दगावल्या की आणखी कशाने? हे निष्पन्न होणार आहे.
धक्काबुक्कीतून एकाचा समुद्राच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना मुरुड तालुक्यातील आगरदांडा जेटी येथे घडली. याप्रकरणी एकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना थर्टी फर्स्टच्या रात्री घडली.
कोर्लई । अलिबाग-मुरुड रस्त्यावर दांडा ते सर्वे दरम्यान रस्त्यावर फणसाड अभयारण्य क्षेत्रात असलेल्या सर्वे डोंगराचा धस ढासळण्याची शक्यता लक्षात घेऊन याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जाळी किंवा संरक्षक भिंत बांधण्यात यावी. अशी मागणी वाहनचालक, पर्यटक व नागरिकांतून जोर धरीत आहे.
माणगाव (सलीम शेख) । माणगाव तिलोरे येथील एका शेततळ्यात मगर शिरल्याने गोंधळ उडाला होता. माणगाव वन विभागाच्या अधिकार्यांनी सर्पमित्र तुषार साळवी यांच्या मदतीने या मगरीला सुरक्षितरित्या पकडले. तब्बल चार तास हे रेस्न्यू ऑपरेशन चालले. या मगरीला गोरेगावच्या खाडीत सोडण्यात आले आहे.
सलीम शेख/माणगाव । माणगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण अशा लोणेरे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर उमेदवार निवडून आणत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आणि आपला बालेकिल्ला राखला. राष्ट्रवादी काँग्रेसला येथे केवळ एक जागा मिळवला आली आहे.
रोहा/मिलिंद अष्टीवकर । नुकत्याच पार पडलेल्या रोहा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसह 64 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत गुरुवारी (21 जानेवारी) पार पडली. चिठ्ठ्यांद्वारे काढलेल्या आरक्षण सोडतीत निवडणूक झालेल्या 21 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 12 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद महिलांसाठी राखीव झाले आहे. या आरक्षण सोडतीनंतर अनेक स्थानिक नेत्यांच्या स्वप्नांवर पाणी पडले.
अलिबाग । गिर्हाईक बनून सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या दोन चोरांपैकी एकाला पकडण्यात दुकान मालकाला यश आले. मात्र दुसरा सोन सोन्याच्या चैनी खेचून पसार झाला. रोहा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बोर्लीपंचतन (अभय पाटील) । श्रीवर्धन तालुक्यातील बहुचर्चित असणार्या व दिघी पोर्टमुळे प्रसिद्धीस असलेल्या दिघी ग्रुप ग्रामपंचायतीवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. सोमवारी (18 जानेवारी) जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निकालामध्ये 13 पैकी 9 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादीने 4 जागांवर विजय मिळवला आहे.
श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्यात मुदत पुर्ण झालेल्याचार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामध्ये दिघी, कारिवणे, गालसुरे, कोलमांडला ग्रामपंचायतींचा समावेश आसून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर पर्यंत होती त्यानुसार दिघी ग्रुप ग्रामपंचायत 13 जागा करीता 51 उमेदवारी अर्ज कारिवणे ग्रुप ग्रामपंचायत 7 जागांकरीता 7 अर्ज गालसुरे ग्रुप ग्रामपंचायत 9 जागांकरीता 18 तर कोलमांडला ग्रुप ग्रामपंचायत 7 जागांकरीता, 21 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
म्हसळा । रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अद्यापन करित असलेले आणि म्हसळा तालुक्यातील विविध गावांतील प्राथमिक शाळेत सेवा केलेले गुरुजन वर्गाने आर.झेड.शिक्षक मंडळ स्थापण करून गेल्या 12 वर्षांपासून म्हसळा तालुक्यातील गावा गावात शैक्षणिक आणि सामाजिक सेवेचा उपक्रम करून आगळ्या वेगळ्या पद्धतीचा समाजपयोगी काम कार्यान्वित ठेवला आहे.मंडळाचे हे उपकृत कार्य मौलिक आसुन गोरगरीब मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणादायी आहे.
म्हसळा । राज्यातील वनपाल, वनरक्षक यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ व ‘समान काम, समान वेतन’ लागू करावे आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवृत्त वनक्षेत्रपाल एस.जी.धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्य वनसचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पेण । पेण तालुक्यातही ‘बर्ड फ्लू’ने शिरकाव केला आहे. अंतोरे फाट्यापुढे असणार्या पशुसंवर्धन विभागातील 562 बंदीस्त कोंबड्यांपैकी काही मोजक्या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे 5 कोंबड्या तपासणीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. त्यांचे अहवाल बर्ड फ्लू पॉझिटीव्ह आले. त्यामुळे येथील सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
पेण (देवा पेरवी/प्रदीप मोकल) । आगरी समाजाचे नामोनिशाण मिटविणार्या, त्यांना देशोधडीला लावणार्या, त्यांना उद्ध्वस्त करणार्या प्रवृत्तींविरुध्द आपण आजच संघटीत झालो नाही तर भविष्यात समाजाला फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा धोका दाखविणारा एक सूर पेण येथे झालेल्या आगरी वकील-डॉक्टरांच्या परिषदेत उमटला आहे.
पनवेल । तळोजा परिसरातील दुकानात घरफोडी करणार्या 2 चोरांना तळोजा पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून घरफोडीचा ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे.
पनवेल । खारघरसह, कामोठे, रबाळे आदी भागात चेन स्नॅचिंग करुन मोटारसायकलवरुन पसार होणार्या दोन लुटारुंपैकी एकाला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा कक्ष-3 च्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून 62 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह मोटारसायकल असा एकूण 3 लाख 15 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
गौसखान पठाण/सुधागड-पाली । पुणे-रोहा एसटी आज (21 जानेवारी) सकाळी टायर पंक्चर झाल्याने पाली बस स्थानकाच्या अलिकडे भर रस्त्यात बंद पडली. त्यानंतर टायर बदलण्यास तब्बल अडीच तास लागल्याने गाडीतील प्रवासी वैतागले होते. तर दुसरीकडे या मार्गावरील वाहतूकदेखील ठप्प झाली होती.
सुधागड-पाली (गौसखान पठाण) नायलॉन मांजामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन सुधागड तालुक्यातील रा.जि.प.शाळा कोंडी धनगरवाडी येथे ‘चला पक्षी वाचवूया’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिक्षक राजेंद्र खैरे यांनी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांकडून पतंग उडवितांना नायलॉन मांजा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली.
कर्जत । कर्जत तालुक्यात 9 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज पर्यंत 89 जागांसाठी 297 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
कर्जत । 2 किलो सोन्याचे मणी विकत देण्याचे आमिष दाखवत व्यापार्याला 7 लाखांचा गंडा घालून फरार झालेल्या भामट्याला कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 4 महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर पुण्यातील लोणी काळभोर येथून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
खोपोली । शेतकर्यांच्या अशिक्षित आणि गरीबीचा फायदा घेवून जमिनी विकत घेवून एमआयडीसी प्रकल्प उभारणीत मलीदा खाऊ पाहणार्या दलाल जमिनी घेतलेल्यांंच्या पैशाचा मूळ सोत्र काय त्यांच्याकडे पैसे आले तसेच उत्पन्न काय याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शेकापक्षाचे चिटणीस तथा आ. जयंत पाटील यांनी करीत खरीवली, गोठीवली, नंदनपाडा आजूबाजूच्या गावांच्या जागा संदर्भात राज्यशासनाने तहसिलदार यांकडे जनसुनावणी ठेवली असून ती रद्द करण्याचे प्रांताधिकारी यांना सांगितले आहे.
संदीप ओव्हाळ/खोपोली । स्मशानात थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गेलेल्या मद्यपींनी टाकलेल्या जळत्या सिगारेटमुळे वणवासदृश्य आग भडकल्याची घटना खालापूरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच, अपघातग्रस्त मदत पथकाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी कित्येक झाडे होरपळली आहेत.
चिरनेर । जेएनपीटी महामार्ग कधीच खचला नसून त्या रस्त्यावर फक्त लहान तडे गेले होते असा अजब दावा नॅशनल हाय वे अथोरिटीचे अधिकारी प्रशांत फेंगडे यांनी केला आहे. नुकताच द्रोणागिरी विभागाजवळ खचलेल्या जेएनपीटी हाय वे संदर्भात काय उपाययोजना केल्या संदर्भात विचारल्यावर त्यांनी हे तर्कट उत्तर दिले.
जेएनपीटी । न्हावा-शिवडी सागरी सेतू बाधित मच्छिमारबांधवांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी न्हावा, गव्हाण, घारापुरी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांच्यावतीने 29 जानेवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वपक्षीय संघर्ष समितीने हा निर्णय घेतला आहे.
अलिबाग । रायगडात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज (30 डिसेंबर) 82 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 2 रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 59 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
महाड । गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार केला...इतकेच नव्हे तर त्याचे चित्रीकरण करुन ते व्हायरल करण्याची धमकी देऊन 2 वर्षे तो नराधम तिच्यावर अत्याचार करत होता. अखेर या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महाड शहर पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलादपूर । नगरपंचायत पोलादपूर आणि पोलादपूर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापन व प्रशासनातील सामंजस्याअभावी स्थानकाच्या आवारात निर्माण झालेल्या सांडपाण्याचा प्रश्न सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धसास लावण्याचा निर्धार केला असून शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी या पार्श्वभूमीवर आजपासून स्थानक परिसरामध्ये स्वाक्षरी आंदोलन सुरू केले आहे.
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात विरार मुंबई ते कणकवली जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्स ची खाजगी लक्झरी बस कशेडी घाटात सुमारे 25 फूट खोल दरीत कोसळली हा अपघात गुरुवार रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास भोगाव गावची हद्दीत घडला. या अपघातात एक जण ठार तर १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
तळा । इंदापूर-मांदाड रस्त्यावर तळा शहरानजीक उनाड गुरांमुळे वारंवार अपघात होत आहे. सोमवारी (4 जानेवारी) रात्री अशाच एका अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे. रात्रीच्या अंधारात गुरे न दिसल्याने दुचाकी त्यांच्यावर धडकून हा अपघात झाला.
तळा/विराज टिळक । तळा तालुक्यातील गिरणे ग्रामपंचायतीतून मृत्यू दाखल्यांचे पूर्ण कोरे पुस्तकच गायब झाले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यालयाच्या दप्तरातून महत्वाची वस्तू अशी गायब झाल्याने अनेक शंकाही उपस्थित केल्या जात असून, चौकशीची मागणी जोर धरत आहे.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी येथील ऐतिहासिक राजपथावर होणा-या पथ संचलनासाठी ‘महाराष्ट्राच्या संतपरंपरे’ वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पथ संचलनाची पूर्वतयारी म्हणून होणाऱ्या रंगीत तालीमीसाठी चित्ररथ बांधणीच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे.
मुंबई : नागरीकरणामुळे नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती काळात इमारत कोसळणे, रस्त्यावरील अपघात, कारखान्यांमधील अपघात या घटनांचा मुकाबला करण्यासाठी शीघ्र प्रतिसाद वाहने आवश्यक असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत 18 वाहने जनतेच्या सेवेत देण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. यामध्ये एक वाहन पनवेल महापालिकेलाही मंजूर करण्यात आले आहे.
मुंबई : कोविडच्या काळात नवीन वर्षानिमित्त होणारी गर्दी रोखण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांवर होती. एकीकडे सर्व नागरिक आपल्या कुटूंबासोबत नवीन वर्ष साजरे करीत होते, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे डोळ्यात तेल घालून रस्त्यावर पहारा देत होते. यामुळेच नवीन वर्षाच्या कार्यक्रमांस महाराष्ट्रात कोठेही गालबोट लागले नाही. महाराष्ट्र पोलीस दलाच्या या कार्याचे कुटुंब प्रमुख म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
पोलादपूर (शैलेश पालकर) पोलादपूरातील पैठण येथे शेतात राब जाळण्यासाठी झाडाच्या फांद्या तोडताना वीज वाहक तारेला स्पर्श झाल्याने शेतकर्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (18 जानेवारी) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
नवी मुंबई । केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे शनिवारी कोकण विभागात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ विभागातील सामान्य रुग्णालयांमध्ये करण्यात आला. कोकण विभागात विविध ठिकाणी कार्यरत असलेले आरोग्य अधिकारी तसेच मान्यवरांनी पहिली लस टोचून घेऊन या मोहिमेची सुरुवात केली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी विविध केंद्रांवर 2 हजार 765 आरोग्य सेवकांचे लसीकरण करण्यात आले.
कोकणच्या सर्वांगीण विकासाचे उद्दीष्ट ठेऊन ’ग्लोबल कोकण , समृध्द कोकण ’ चळवळीतर्फे ’ कोकण फर्स्ट ’ अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. अभियानाचे प्रमुख संजय यादवराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पनवेल । कळंबोली वसाहतीत सिडकोच्या घरांना मलमिश्रित पाणीपुरवठा केला जात आहे. दूषित पाणी येत असताना सिडकोने पाणीपट्टीमध्ये प्रति युनिट 20 रुपये इतकी वाढ केली आहे. त्यामुळे आता कळंबोलीकरांना चढ्या दराने दूषित पाणी प्यावे लागणार आहे. याविरोधात राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सतिश पाटील यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. सडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना पत्र देत वाढीव पाणीपट्टी कमी करण्याची मागणी केली आहे.