कर्जत | जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये पर्यावरण पूरक ई रिक्षा चालवल्या जात आहेत. हात रिक्षा ओढणार्या रिक्षाचालक यांची अमानवी प्रथा बंद करण्यासाठी सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने ई-रिक्षा चालवल्या जात आहेत. दरम्यान, या पर्यावरण पूरक वाहनातून मागील वर्षभरात तब्बल दोन लाख पर्यटक आणि स्थानिक नागरिक तसेच शालेय विद्यार्थी यांनी प्रवास केला आहे.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
पनवेल | एसीला शॉर्ट सर्किट मुळे आग लागून सेल्स ऑफिस आगीच्या भक्षस्थानी गेल्याची घटना पळस्पे फाटा येथील साई वर्ल्ड सिटी इमारतीच्या आवारात घडली आहे. पळस्पे फाटा येथे साई वर्ल्ड सिटी ही मोठी इमारत आहे. या इमारतीच्या आवारात सेल्स ऑफिस आहे.
पनवेल | उलवे परिसरातील असलेल्या तलावातील पाण्यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिच्या नातेवाईकांचा शोध उलवा पोलीस करीत आहेत.
अलिबाग | अलिबागच्या विकासासाठी नेहमीच झटणारे आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणारे आपले लाडके माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून हेच सिद्ध केले आहे. अलिबागरेवदंडा बायपास जंक्शन येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्यांच्या स्वतःच्या खर्चाने सुरू केले आहे.
मुंबई | इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासाठी आवश्यक असणारा १५ कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
अलिबाग | १६ जूनपासून नवीण शैक्षणिक वर्ष सुरु होत असून, शिक्षण विभागाची जय्यत तयारी सुरु आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून, शाळांचा परिसर सजविण्यासोबत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी पुस्तके तसेच गणवेश वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
अलिबाग | वटपौर्णिमेचे औचित्य साधून अलिबाग परिसरातील सत्यवानांनी प्रशासनाचे लक्षवेधी अनोखे आंदोलन केले. अलिबाग बायपास येथे पेण अलिबाग रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्यासाठी साकडे या सत्यवानांनी घातले.
मुंबई | तळीरामांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. महाराष्ट्रात दारू महागली आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दिड टक्याने वाढ झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत १४ हजार कोटींचा महसूल वाढणार आहे.
उरण | दिवगंत लोकनेत दि.बा. पाटील याचें शिष्य तथा जऐ नपीटीचे माजी विेशस्त, कामगार नते म्हणनू सवार्नां सपु रिचित असलले भषूण पाटील हे नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसचूना (नोटीफिकेशन) ताबडताबे काढून सदर विमानतळाचे लोकनेत े दि.बा. पाटील असे नामकरण करावे या प्रमखु मागणीसाठी दि. २४ जनू (लोकनेते दि.बा. पाटील याचां १२ वा स्मृंती दिन) पासनू जासई यथे आमरण उपोषण करणार आहते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
कर्जत | कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे सवंग प्रसिद्धीसाठी राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करतात. वास्तवात कर्जत पोलिसांच्या स्टेशन डायरी पाहिल्या की, कर्जतमध्ये वाल्मिक कराडसारखे काम आमदार करीत असल्याची टिका सुधाकर घारे यांनी केली आहे. पोलीस अधिकारी यांनी दबाव टाकल्याच्या नोंदी आपल्याकडे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
21.1k
मुरुड-जंजिरा | मुरुड शहरातील सिद्धी मोहल्ला भागात गाडी पार्किंग करण्याच्या वाद विकोपाला गेला आणि या वादातून शाहीदा आदम मजगावकर यांना मारहाण केल्याप्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, मुरुड शहरातील सिध्दीमोहल्ला येथे गाडीच्या पार्किंगवरून ही वादाची घटना घडली.
अलिबाग | रविवारी पावसाने रात्रभर झोप उठविल्याने सोमवारी सकाळी पोलादपूर तहसिल कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये गेल्या चोवीस तासांत पावसाची ९४ मि.मी. नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली. रविवारी दिवसभरामध्ये दोन घरांचे नुकसान झाल्याचे तसेच तालुयातील पोलादपूर महाबळेेशर वाई सुरूर रस्त्यावर सुरू असलेल्या रस्तारूंदीकरणावर झाडं कोसळल्याच्या घटना झाल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
माणगांव | माणगाव तालुयातील भाले ग्रामपंचायत हद्दीत येणार्या चांदेवाडी व बोंडशेत गावच्या मध्यात २१ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह झालेल्या वादळं पावसामुळे कांदळगाव ते कोलाड अशी जाणारी महावितरणची हायटेन्शन लाईन कंडटर तुटून विद्युत प्रवाहित लाईन खाली माळरानावर पडल्याने चरणार्या चार गुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
माणगाव | तालुयातील बोरघर आदिवासीवाडी येथे मानेवर कोयत्याने वार करून वृद्धाची हत्या केल्याची घटना १८ मे रोजी रात्री ८.४० वाजताच्या सुमारास राहत्या घरासमोर घडली. या घटनेची फिर्याद नातू चंद्रकांत दौलत मुकणे (वय १९, रा. बोरघर आदिवासीवाडी ता.माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने तालुयात एकच खळबळ उडाली आहे.
रोहा | रोहा तालुक्यातील रोहा बस स्थानक ते चणेरा मार्गावर भरदिवसा एका शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. या धाडसी मुलीने प्रसंगावधान दाखवत, चालत्या गाडीवरुन उडी मारली आणि थेट रोहा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी अलीम आयुब कर्जीकर (वय ६०, रा.मोर्बा) याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या घटनेने रोहा तालुक्यात खळबळ उडाली आहे.चणेरा येथील एक शाळकरी मुलगी शाळेतून घरी जाण्यासाठी रोहा बस स्थानकात उभी होती.
धाटाव | रोहा तालुयातील तांबडी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. हा खटला माणगाव कोर्टात चालला, ८ मे रोजी निकाल जाहीर झाला, मात्र सर्व आरोपी निर्दोष सुटले. कोर्टाने दिलेला निर्णय दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त करत रोह्यातील शेकडो महिलांसह नागरिकांनी मंगळवारी (१३ मे) पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी राम मारुती चौक ते तहसीलदार कार्यालय असा जनआक्रोश मोर्चा काढत संतापाला वाट करुन दिली.
श्रीवर्धन/दिघी | पर्यटनासाठी मामाच्या गावी आलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (७ जून) सायंकाळी श्रीवर्धन तालुक्यातील खानलोशी येथील दगड खाणीतील खोल पाण्यात घडली. तेजस सुनील निगुडकर (वय २४, मूळगाव काळींजे, श्रीवर्धन) सध्या वास्तव्यास दिवा, ठाणे) असे मृत युवकाचे नाव आहे.
श्रीवर्धन | सतत बदलत असलेले हवामान, कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. वास्तविक पाहता श्रीवर्धन मधील तापमान ३२ किंवा ३३ अंश सेल्सिअस इतकेच असते. परंतु हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढल्यामुळे हे तापमान ३८ ते ४० सेल्सिअस असल्याचे जाणवते. प्रचंड उष्म्यामुळे या ठिकाणचे स्थानिक नागरिक हैराण झाले असून, घामाने अक्षरशः अंघोळ होत आहे.
म्हसळा | रायगड जिल्ह्यात होत आहे कौतुक. न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज म्हसळा चा एक प्रामाणिक शिपाई देवा घावट यांचा मुलगा स्वप्नील देवा घावट याने नेव्ही मध्ये रँक वन, बेस्ट शिप मेट, बेस्ट कॅडेट इन मराईन प्रात्यक्षिक हे तीनही मानाचे सन्मान पटकावत न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा, आपले कुटुंबीय आणि आपल्या संपूर्ण रायगड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
म्हसळा | म्हसळा शहरातील पाणी पुरवठा योजनेसाठी आणलेले २३० पाईप चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या जलवाहिन्यांची किंमत २५ लाख आहे. याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हसळा शहरात ४२ कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम सुरु आहे.
पेण | पेण नगरपालिका प्रशासन व कर्मचारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात व यंत्रसामुग्रीसह विक्रम स्टँडवर कारवाई करण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र खासदार धैर्यशील पाटील व आमदार रविंद्र पाटील यांच्या मध्यस्तीमुळे पेण विक्रम मिनीडोअरचा स्टॅँड हलविण्यास तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
कोर्लई | पावसाळा सुरु होतो तोच मुरुड मधील शासकिय कार्यालयांत होणार्या गळतीला उपाय म्हणून छतावर प्लॅस्टिकचा वापर केला जातो आहे. नेमेची येतो मग पावसाळा या प्रमाणे गेल्या काही वर्षांपासून पावसाळा सुरू होतो न होतो तोच मुरुड मधील तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालयात गळती सुरू होते आणि या गळतीला उपाय म्हणून कार्यालयांच्या छतावर प्लॅस्टिकचा वापर केला जात असल्याचे मागील वर्षापासून दिसून येत आहे.
पाली/बेणसे | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात २०२५ या वर्षी अतिशय महत्वपूर्ण असा वेतनवाढ करार झाला. या करारात कामगारांना पुरेपूर न्याय देताना त्यांचे चहूबाजुनी हित जोपासले असून कामगारांच्या हितार्थ कामगारांना भरीव पगारवाढ तसेच सर्वाधिक सेवा सुविधा मिळवून देणारा आजवरच्या इतिहासातील २०२५ वर्षीचा सर्वोत्तम वेतनवाढ करार असल्याचा दावा व स्पष्ट मत रिलायन्स नागोठणे कंपनीतील कामगार नेते व विविध कामगार संघटनांच्या पदाधिकार्यांनी रिलायन्स टाऊनशीप वृंदावन येथे बुधवार, ४ जू
पाली/ वाघोशी | येथील रामआळीजवळ ब्रिटीशकालीन ऐतिहासिक वास्तू आहे. सध्या या वास्तूची पूर्णपणे वाताहत झाली आहे. पावसामुळे या वास्तूच्या रस्त्याच्या बाजूकडील भिंत ढासळली आहे. छत कोसळले आहे. तसेच येथील सर्व भिंती व छत कमकुवत झाले आहे. काही ठिकाणच्या दगड व विटा निखळलेदेखील आहेत.
माथेरान | माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई-रिक्षा चालविण्यात येत आहेत. मात्र अद्याप माथेरान मधील ७४ हातरिक्षा चालकांना ई रिक्षा चालविण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे हातरिक्षा चालकांनी माथेरान शहरातील श्रीराम चौक येथे उपोषण सुरू केले आहे. माथेरानमध्ये सध्या २० ई रिक्षा चालवल्या जात असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हातरिक्षा चालकांना अमानवी प्रथेतून मुक्त करण्यासाठी ई-रिक्षा चालविण्याचे धोरण न्यायालयाचे आहे.
खोपोली | मुंबई-पुणे एक्सप्रेसवर जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती गोरक्षकांनी खालापूर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून खालापूर टोल नाका हद्दीत केलेल्या कारवाईत म्हशींना कोंबून भरलेले चार टेम्पो पकडले आहेत. प्रत्येक टेम्पोत २० म्हशी अशा चार टेम्पोमध्ये एकूण ८० म्हशींना निर्दयीपणे कोंबून कल्याण येथे नेले जात असताना ही कारवाई करण्यात आली.
खोपोली | मुंबई-पुणे एस्प्रेस मार्गावर शनिवारी (२४ मे) सायकाळच्या सुारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव ट्रेलरने सात वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. तर, चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. खोपोलीनजीकचा बोरघाट हा सातत्याने ’मृत्यूचा- घाट’ ठरत आहे.
उरण | कोकण समुद्र किनारी वसलेल्या उरण, रायगड, मुंबई समुद्र परिसरातील ठिकठिकाणी पावसाळी बंदी काळातही मागील सात दिवसांत अवैधरित्या मासेमारी करणार्या पाच मच्छीमार बोटी ताब्यात घेऊन काही बोटींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
महाड | गेल्या सात पिढ्यांपासून हिंदवी स्वराज्याची राजधानी असणार्या किल्ले रायगडावर वास्तव्य करणार्या व गडावर येणार्या शिवभक्तांना न्याहरी भोजनाची व्यवस्था करणार्या ५६ कुटुंबांना केंद्रीय पुरातत्त्व विभागाने अतिक्रमणाचा ठपका ठेवत नोटीसा देत किल्ल्यावरून खाली जाण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे.
महाड | ३५२ वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर शिवरायांचा झालेला राज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान असून या रायगडच्या पवित्र भूमीत शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याने आपण सर्व भाग्यवान आहोत, असे प्रतिपादन करीत पाचाड येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला निधीची कमतरता भासणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
पोलादपूर | पोलादपूर शहरातील आनंदनगर येथे राहणार्या वैभव पालकर यांचा ४ मे रोजी कामावरून घरी येत असताना सकाळी पावणेआठच्या सुमारास लोहारे गावच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. अज्ञात आयशर ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मात्र या अपघातानंतर आयशर चालक हा पसार झाला होता. त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातून एक वीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. अक्षरा शुभम पवार असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून ती सध्या गोकुळधाम सोसायटीच्या मागे राहत होती.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता एक महिना पूर्ण होऊन गेला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
पुणे | भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेस घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नुकतंच एसटी प्रशासनाने नव्या ३ हजार बसची खरेदी केली.
नवी दिल्ली। न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपला. त्यांच्यानंतर न्यायमर्ती गवई यांचे नाव ज्येष्ठता यादीत होते. न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यामुळे त्यांचे नाव पुढे केले.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
मुंबई | राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमारबांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.