अलिबाग | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पॅकेज १ ते पॅकेज १० च्या सद्यकामाची स्थिती व प्रगतीचा आढावा तसेच पावसाळ्यात केलेल्या उपाययोजनांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला. ऐन पावसाळ्यात महामार्गावर कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.
पनवेल | बनाबट सोने तारण ठेवून पनवेल येथील महिलेने चक्क सहा बँका, एक पतसंस्था आणि सोने सराफाला ७२ लाख रुपयांना गंडवल्याचे प्रकरण पुढे आले आहे.
खोपोली । कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावरून जाणारी ट्रेन केळवली स्थानकावर आली असता या ट्रेनचा ब्रेकच लागला नाही आणि ट्रेनचे दोन डब्बे पुढे गेले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. काहींनी चालू ट्रेनमधून झटापट उतरण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हे प्रवासी सुखरुप वाचले आणि प्रत्यक्षदर्शींनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मुंबई । समुद्री सुरक्षेसाठी तैनात असलेली ‘आयएनएस ब्रह्मपुत्रा’ या युद्धनौकेला आग लागल्याची घटना घडली. यानंतर ही नौका समुद्रात कलंडायला लागली असून तिला पूर्ववत करण्यासाठी बचाव पथक व संबंधित यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर या युद्धनौकेवरील एक अधिकारी बेपत्ता झाल्याची माहिती असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
रेवस जेट्टीवर अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्या बोटींवर कारवाई केली आहे. या कारवाईत चारजणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३६ लाख ४० हजार रुपये किमतीचा ३३ हजार लिटर डिझेल व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कशेडी घाटात दुर्घटना! भरधाव टँकर घुसला ढाब्यात; चालकाचा मृत्यू
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहे.
पनवेल । नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर बुधवारी (17 जुलै) विमान उतरताना...उड्डाण घेताना कोणता अडथळा येत नाही ना, याची प्रथम चाचणी घेण्यात आली. विमानतळ प्राधिकरणाने ही चाचणी घेतली. ही चाचणी पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती. एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या विशेष विमानाने बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतली.
अलिबाग | रायगड जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४ २५ च्या रुपये ४३२ कोटी, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत २८ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ४१ कोटी ६१ लक्ष अशा एकूण ५०१कोटी६१ लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक मंगळवारी (१६ जुलै) पार पडली.
संपूर्ण महाराष्ट्राला ज्या परंपरेने एकत्र बांधून आषाढी एकादशी मोठ्या प्रमाणात साजरी करत असतात.पंढरपुरात आषाढी वारीचा सोहळा आज बुधवार ( १७ जुलै ) पार पडणार आहे
अलिबाग | रायगड पोलीस दलातील कर्मचारी राहुल कडू याने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुधागड पाली तालुयातील घोटवडे या आपल्या गावी गेला असताना त्याने तिथेच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
नवी मुंबई : डोंबिवली येथील घेसरगाव येथून पंढरपूरकडे खासगी बसने निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कळंबोली येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली
21.1k
विधानसभा निवडणुकीपयरत राज्यात महायुती राहील, असे वाटत नाही, असे भाकीत शेकाप नेते जयंत पाटील यांनी केले आहे. सध्या जे महायुतीमध्ये चालले आहे, ते पाहता युतीचे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसर्या बाजूला महाविकास आघाडी कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्य३त केला आहे.
कोर्लई । महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभासाठी मुरुड तहसील कार्यालय व सेतू कार्यालय विविध कागदपत्र व ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.
कोर्लई | पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या काशिद किनार्यावर पावसाळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बंदी घोषित करण्यात आली आहे. मात्र याकडे पर्यटकांकडून दुर्लक्ष होत असून, या विकेंडला पर्यटकांची पावले या किनार्यावर वळल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांनी त्यांना परतीचा मार्ग दाखवला.
सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्धी मिळवण्याची अनेकांना लालसा असते. हे रिल्स जीवघेणे ठरत असतानाही अनेकजण रिल्स किंवा फोटोसाठी नको तितके धाडस करतात आणि जीव गमावतात
दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नागोठणे - रोहा मार्गावरील भिसे खिंडीमध्ये आज (२० जुलै) पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली
दिघी येथे किरकोळ वादातून एकाची हत्या करणार्या खुनीला माणगांव सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ४ नोव्हेंबर २०२१ रोजी दिघी कोळीवाडा येथे होडीवर झालेल्या किरकोळ वादातून तुकाराम कमळाकर कावळे यांच्यावर त्यांचा सहकारी कृष्णा माया खेळोजी याने हल्ला केला
खोपोली । पावसाळी पर्यटनासाठी खालापूर येथे आलेल्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या चारहीजणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे सर्वजण मुंबईतील रिझवी कॉलेजचे विद्यार्थी होते. या घटनेनंतर विद्यार्थ्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
कर्जत । कर्जत तालुक्यातील बेडीसगाव येथे राहणार्या एका अल्पवयीन मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. वंदना पारधी असे या मुलीचे नाव असून नुकतीच ती दहावीला गेली होती. हुशार अशा या मुलीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.बेडीस गाव येथील वंदना बाळू पारधी ही विद्यार्थिनी मागील वर्षापासून नेरळ येथील आदिवासी वसतिगृह येथे राहून शिक्षण घेत होती.
म्हसळा तालुका वारळ गावातील चारजणांविरोधात गो हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात गो हत्या कायदा लागु असतानाही या कायद्याचा मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याने रायगड जिल्हयात अनेक ठिकणी अशा घटना घडत आहेत.
पेण | पेण तालुयातील दादर गावातून ४० वर्षीय महिला बेपत्ता होण्याची घटना घडली आहे. सदर महिलाचा गावातील तरुणांनी व दादर सागरी पोलिसांना शोध सुरू केला आहे. सदर विवाहितेचे नाव सुनंदा जगदीश पेरवी वय ४० वर्षे, रंग सावळा, उंच-५ फुट अंदाजे अगांने मध्यम केस लांब, अंगात नेसुस वांगी जांभला रंगाची साडी व अंगात हीरवा रंगाचा ब्लाउज गळयात सोन्याची डवळी, हातात हीरव्या रंगाच्या बांगडया व गळयात पांढ-या रंगाची ओढणी कपाळयावर चंद्र कोर व डाव्या हाताचे अंगठयावर नाव गोदविणे परंतु ते खोडलेले, असे वर्णन आहे.
पेण | पेणमध्ये पुन्हा चोरटयांनी आपले करामत दाखवून तालुयातील काश्मिरे गावातील बंद घरातून २ लाख ५५ हजार ऐवज दिवसाढवळ्या लांबविल्याची घटना घडली आहे. यामुळे चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहेत.फिर्यादी लक्ष्मण कमळ म्हात्रे (४९, रा. काश्मिरे,पो. कांदळे पाडा, पेण) यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक २४ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ च्या दरम्यान ते पाटणेेशर येथे त्यांच्या मोठा भाऊ चंद्रकांत म्हात्रे याने शंकराच्या मंदिरात ठेवलेल्या.
जुना मुंबई पुणे महामार्गावर बारवई गाव येथे कार उलटून झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. अजय विष्णू गिरे (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे
पाली/बेणसे । शिहू बेणसे विभागात वर्षाचे बारा महिने...उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणताही ऋतूत असो विजेचा लपंडाव सुरु असतो. वर्षानुवर्षे वीज वितरण विभागाकडून जनतेला वेठीस धरले जातेय. मात्र आता संयमाचा बांध फुटत चालला असून, शिहू, बेणसे विभागातील जनता आक्रमक झाली आहे. वीज वितरणने दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर पेण वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढून अधिकार्यांना कोंडून ठेवू, असा इशारा संतप्त महिला, तरुणांनी दिला आहे.
सुधागड । मोकाट गुरांमुळे रस्त्यावर अनेकदा खोळंबा होता. नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागता. खरे तर, गुरं म्हणजे मुकं जनावर. त्याला मानसासारखी अक्कल थोडीच? मात्र या गुरांचा वापर करुन, त्यांची काळजी घेण्याऐवजी रस्त्यावर सोडून, मोकाट तर त्यांचे मालक होत असतात.
कर्जत शहरातील भिसेगाव येथील वेताळ मंदिरासमोरील वडाच्या झाडाला गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. हा तरुण नाशिक येथील रहिवासी असल्याचे समजते.
अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर भरकटलेल्या जहाजासाठी शुक्रवारी सकाळी रेस्कू ऑपरेशन राबवण्यात आले. त्यानंतर ८ कर्मचाऱ्यांनाची सुखरुप सुटका करण्यात आली. त्यांना कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरने अलिबाग किनाऱ्यावर सोडण्यात आले. या जहाजावर १४ कर्मचारी असून इतर कर्मचारी सुरक्षित आहे.
खालापूर तालुक्यातील हाळ फाटा येथे भयंकार अपघात झाला आहे. या अपघातात स्कूटी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे
उरण । उरण तालुक्यातील खोपटा कोप्रोली, गव्हाण फाटा, चिर्ले आणि दिघोडे या महत्त्वाच्या रस्त्यावर रात्री अपरात्री होणार्या वाहतूक कोंडीचा सामना हा नाहक सर्वसामान्य प्रवाशांना तसेच नवीमुंबई परिसरात जाणार्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा वाहतूक कोंडी पासून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरुवार 11 जुलै रोजी खोपटा कोप्रोली रस्त्यावर तर दिघोडे येथे 12 जुलै रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उरण | उरण तालुक्यातील पुनाडे धरणात ठणठणाट झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीपातळी कमालीची खालावत चालल्याने, धरण कोरडे पडत असल्याचे भयानक चित्र समोर येत आहे. त्यामुळे तालुयातील २५ हजार रहिवाशांना गेल्या आठ दिवसांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
गेल्या 24 तासापासून महाड परिसरात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नगर परिषदेने धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजून नागरिकांना सतर्क केले आहे
महाड तालुयात गेल्या तीन चार दिवस अतिवृष्टी होत असून मंगळवारी (२३ जुलै) सकाळी दरडग्रस्त दासगांव मोहोल्यातील फकीरवाडी या ठिकाणी एका घरावर भला मोठा दगड धडकल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. याघटनेनंतर परिसातील ९ घरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून महाड तालुयाला पावसाने झोडपून काढले आहे. संपूर्ण तालुयात दरडग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
तळा-किशोर पितळे-तळा तालुक्यातील दाहिवली बौद्धवाडी येथे मालती सीताराम शिर्के वय ५०या नावाच्या महिलेचा चाकूने वार करून दगडाने ठेचून हत्या केली असल्याची दुर्दैवीघटना घडलीआहे.
पंढरपुरात आषाढ वारी नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत १७ जुलै रोजी आषाढवारी सोहळा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ७ जुलैपासून भाविकांना पांडुरंगाचे २४ तास दर्शन घेता येणार आहे. या बैठकीत मानाच्या दहा पालखी प्रमुकांच्या शासकीय पूजेत बसवण्याबाबत चर्चा झाली नाही.
अलिबाग । रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना पराभूत करत, मतांनी दणदणीत विजय मिळवला. 27 व्या फेरीत ते 80 हजार मतांनी आघाडीवर होते. त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.
रत्नागिरी | लोकसभा निवडणूकीपुर्वी वाद शमतोय असे दिसत असताना,रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यात पुन्हा एकदा भाऊबंदकीचा वाद पहायला मिळत आहे. या दोघा भावांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.या वादामुळे कोकणातील राजकारण चांगले तापले आहे.
रत्नागिरी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा जाहिर केल्यानंतर कोकणातील मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांनी गेली २० वर्ष मनसे पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न केले. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना जेलमध्ये टाकलं.
शेकापचे यावर्षीचे अधिवेशन पंढरपूर येथे होणार असून येथेच मंदिरातून विधानसभा निवडणूकीचा नारळ फोडण्यात येणार आहे. २ ऑगस्टपासून दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात रायगड जिल्ह्यातील शेकाप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन शेकापनेते जयंत पाटील यांनी केले आहे.