म्हसळा | समाजकारण आणि राजकारण हे सामाजिक विकासाची दोन चाके आहेत. सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात जनेतला अपेक्षीत विकासकामे करताना पक्ष संघटनेतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी लोकाभिमुख काम करीत असताना केलेल्या कामांसाठी प्रसार माध्यमांचा वापर करणे गरजेचे असल्याचे मत माजी पालकमंत्री आमदार आदिती तटकरे यांनी म्हसळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी संघटनेच्या पदाधिाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमात व्यक्त केले.
मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष या दोन्ही पदांवर नव्याने नियुक्ता होणार हे निश्चित होते.
अलिबाग । आरसीएफच्या प्रस्तावीत विस्तारीकरणाला बे्रक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जो 141 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याची हमी आरसीएफ देत नाही तोपर्यंत जनसुनावणी होऊ देणार नाही असा इशारा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिला.
अलिबाग | खारेपाठ विभागातील ग्रुप ग्रामपंचायत पेंढाबेच्या उपसरपंच पदी पत्रकार, अॅड.रत्नाकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खारेपाठातील 35 वर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाने आपल्या ताब्यात घेऊन निर्विवाद वर्चस्व ठेवले आहे.
अलिबाग | अलिबाग येथील नवगाव समुद्राच्या खडकात फिलिपाइन्स देशातील बोट तांत्रिक बिघाड झाल्याने अडकली होती. त्या बोटीत पाच जण अडकले होते. भारतीय तटरक्षक दलाचे जवान आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बोटीतील पाच जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
माथेरान | कर्जत तालुक्यातील माथेरान हे सर्वांचे आवडते पर्यटनस्थळ असून या स्थळाकडे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांचे विशेष लक्ष असल्याने माथेरान मधील समस्त नागरिकांना सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी 4 जुलै रोजी इथल्या महत्वपूर्ण विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी महेंद्र थोरवे यांना निवेदन सादर केले होते.
पनवेल | गणेशाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असून शहरवासीय उत्सवाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत. बाजारपेठाही फुलल्या आहेत. आपल्या घराचा गणेशा सर्वात वेगळा दिसावा यासाठी लोकांची, बाजारपेठेत गर्दी दिसू लागली आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सजावटीचे साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाशी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत फुट पडली. राज्यात सत्तापालट झाले, शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद सुरु झाला आणि तो वाद अजूनही कायम आहे.
उतेखोल/माणगाव | केवळ इच्छा शक्तीच्या जोरावर माणगाव नगरपंचायतीचे कर्तव्यतत्पर स्वच्छता व आरोग्य सभापती अजित तार्लेकर यांनी सामाजिक स्वच्छता विषयक बातमीची दखल घेत, उतेखोल आश्रमशाळेजवळी लहानग्या आदिवासी विद्यार्थ्यांची कचरा आणि घाणीमुळे बिकट झालेली वाट सुकर केली आहे.
पुणे | कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष सर्व सण घरातल्या घरात मोजक्याच माणसात साजले केले गेले. मात्र, यंदा राज्यात कोरोनाचे संकट मागे टाकून पुन्हा जोषात सण साजरे करण्यात येणार आहेत. तसेच दहीहंडीच्या दिवशी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने अधिकच उत्साह आहे. पण पिंपरी चिंचवडमध्ये दहीहंडीच्या सणाला अधिच गालबोट लागल्याची घटना घडली आहे.
कोलाड | मुंबई-गोवा हायवेवरील वरसगाव पेट्रोल पंपासमोर पहिल्याच पावसापासून अनेक खड्ड्यांनी रिंगण केल्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याच खड्ड्यातून प्रवास करतांना एक तरुण कामावरून घरी परतत असतांना टूव्हीलर वरून पडून मरण पावला तर काही दिवसापूर्वी गोवे येथील एक तरुण याच खड्ड्यातून प्रवास करतांना गंभीर जखमी झाला होता.
21.1k
अलिबाग | डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने बुधवार 20 जुलै रोजी रेवदंडा येथे रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधी करीता पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. दत्तात्रेय नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते तब्बल ७ लाखांचा धनादेश रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
अलिबाग | रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 14.81 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1 जून 2022 पासून आज अखेर एकूण सरासरी 1 हजार 678.38 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
मुरुड । मुरुड बाजारपेठ मधील डॉ.दिलिप बागडे यांच्या मालकीच्या जागेत १०२ वर्षे जुनी असलेली इमारत सद्यस्थितीत मोडकळीस आलेल्या अवस्थेत असल्याने या जागेत असलेल्या परस्पर पतपेढीला मुरुड नगरपरिषदेने इमारत खाली करण्याचे आदेश देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने डॉ.दिलिप बागडे यांनी रायगड जिल्हाधिकारी, मुरुड तहसीलदार आणि नगरपषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून मागणी केली आहे.
कोर्लई । पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मुरुड तालुक्यातील काशिद बीच पावसाळ्यात दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आला असून सुरक्षेचा उपाय रस्त्यालगत सुचना फलक आणि प्लॅस्टिक दोऱ्या लावण्यात आल्या आहेत. पर्यटकांनी सुचनांचे पालन करुन समुद्रात जाऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायत, ग्रामस्थ, स्टॉलधारक, मुरुड पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
माणगाव | अश्लील शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघा आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना मुंबई-गोवा महामार्गावर मच्छी मार्केट माणगाव येथे घडली. याबाबतची तक्रार रोहिणी उदय नांदे (वय-३७) रा.होडगाव कोंड ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
माणगाव । आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणाऱ्या माणगाव-ताम्हिणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाची संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत. तसेच या मार्गालगत उंच डोंगर असल्याने दरडी कोसळण्याची भीती प्रवासी वर्गातून होत असून प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दुर्लक्ष केले आहे.
रोहा । रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून रोह्याची कुंडलिका नदीने गेल्या चार दिवसांत पाचवेळा इशारा पातळी ओलांडली आहे. रोहा तालुक्यात १९७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. कुंडलिका नदिने रौद्र रूप धारण केले असून जुन्या पुलावरून पाणि वाहू लागले आहे.
श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्यासाठी गतवर्षी फिरता पशू वैद्यकीय दवाखाना सुरु करण्यात आला होता. या फिरत्या दवाखान्यामूळे असंख्य शेतकऱ्यांच्या दारात आजारी पशू रुग्णांवर उपचाराची सुविधा मिळाली. मात्र, सद्या डॉक्टरविना फिरता दवाखाना बंद आहे. शिवाय बोर्लीपंचतन परिसरात मागील तीन वर्षांपासून पशुवैद्यकीय चिकित्सालयात एकही पशुधन विकास अधिकारी नसल्याने पशुधनाचा आता धोक्यात आले आहे.
श्रीवर्धन । राज्याच्या आणि जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये महसूल विभाग हा प्रमुख विभाग असून त्यास प्रशासकीय यंत्रणेचा कणा म्हणून संबोधण्यात येते. राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सक्षम आणि बळकटीकरण करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
म्हसळा । म्हसळा तालुक्यात आज पर्यंत १०९४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चालू खरीपाच्या हंगामात पाऊस उशीरा सुरू झाला आसला तरी त्यानी मागील वर्षाची सरासरी गाठली आहे. गेल्या आठवड्यात ६११ मि.मि.पावसामुळे खरीप पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. नद्या, ओढे, नाले पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाऊस आधूम-मधून उघाडी देत असल्यामुळे बळीराजा लावणीच्या, तालुक्यातील फळबागायतदार आंबा-काजूच्या आणि अन्य बागायतींच्या मशागतीच्या कामात गुंतला आहे.
म्हसळा । ऑनलाइन वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्या समद कौचाली रा.तोराडी बंडवाडी या ग्राहकाने कस्टमर केअरच्या माध्यमांतून डीलेव्हरी ट्रॅक करताना कुरीअरचा शोध घेता घेता फोन केला असता कौचाली यांना तब्बल ५४ हजार ९९७ रुपयांचा गंडा बसल्याची घटना घडली आहे.
पेण | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांचे सुपुत्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी पेण येथील कासार आळी येथील महाकाली सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पेणचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला.
पेण । जेएसडब्ल्यू कंपनीत नोकरी लावते तसेच या कंपनीत ठेका मिळवून देण्याचा बहाणा करुन ३१ लाख ७९ हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी पेण येथील राजकीय पक्षाची महिला नेता प्रविणा सावंत आणि तिचा पेणचा साथीदार अतुल मांडवकर याला पेण पोलिसांनी अटक केली आहे.
पनवेल | सिडको आणि महानगरपालिका या दोन्ही आस्थापनामध्ये सिडको वसाहतीतील जनता भरडली जात आहे. कळंबोली सेक्टर 2 आणि सेक्टर 6 मधील उद्याने डंपिंग ग्राउंड बनली आहेत. मागिल काही दिवसापासून कचरा उचलला गेल्या नसल्याने नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तेव्हा तो कचरा ताबडतोब उचलण्यात यावा आणि मद्यपीची बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पनवेल | इंग्रजांच्या काळातील सोन्याची नाणी विकत देण्याच्या बहाण्याने एका टोळीने कस्टम विभागातील अधीक्षकाकडून तब्बल १३ लाख ५० हजार रुपये उकळून त्याला ५०० खोटी आणि बनावट नाणी देऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. न्हावा शेवा पोलिसांनी या टोळीतील त्रिकुटाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पाली/बेणसे | रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण पाली आहे. मात्र येथील सब पोस्ट ऑफिसमध्ये (उप डाक घर) 1 पोस्ट मास्टर आणि 4 क्लार्क अशा पाच जागा रिक्त आहेत. परिणामी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. तसेच लवकर काम न झाल्याने आणि अपुऱ्या सोयी सुविधांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
कर्जत | कर्जत तालुक्यातील मुरबाड रस्त्यावरील आरवंद गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाची दक्षता आणि गुण नियंत्रक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या भागातील वरई ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, शेतकरी कामगार पक्षाचे दीपक धुळे यांनी केली आहे.
रायगड | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवरांनी या संधीचा लाभ घ्यावा.
वावोशी । खालापूर तालुक्यातील बीड खुर्द गाव हे डोंगराळ भागात वसले असून हा भाग दरडग्रस्त प्रवण म्हणून ओळखला जातो. या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे दरड कोसळून कोणतीही जीवितहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून बीड गावातील लोकांची पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांना समाज मंदीर अथवा रायगड जिल्हा परिषद शाळेत वास्तव्यास स्थलांतरित होण्याची नोटीस खालापूर तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
खालापूर । खालापुरातील कलोते धरणावर काही पर्यटक १९ जून ला वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. यातील आकाश नाईक आणि त्याचे सहकारी पोहण्यासाठी धरणात उतरले पण पाणी खोल असल्याने मधूनच परत येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, परतताना आकाश किनारी पोहचलाच नाही. रविवारी त्याचा धरणात शोध घेतला पण तो सापडला नाही. तर आज (२० जून) आकाशचा मृतदेह खोल पाण्यातून शोधून बाहेर काढण्यात आला.
उरण | उरण तालुक्यातील बोकडविरा गावाजवळ असलेल्या इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल ऐवजी पाणी भरले जात असल्याचे वाहनचालकांच्या दक्षतेमुळे उघड झाले आहे. याबाबत वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर जाब विचारला असता पंप मॅनेजर काही बोलण्यास तयार नसल्याचे दिसले. याबाबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हाट्सअॅपच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. त्यामुळे सदर पेट्रोल पंपावर काय कारवाई होते याकडे वाहन चालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
उरण । उरण मधील पिरवाडी समुद्र किनारी दर्गाच्या पाठीमागे ७ जुलै रोजी एक मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाअंती पोलीस कर्मचाऱ्यांना आढळले की, सदर मृतदेह करंजा येथील हितेंद्र राजेंद्र म्हात्रे वय ३१ यांचे आहे.
मुंबई । रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर भागातील परिस्थिती जलमय झाली होती. तेथे जाऊन प्रत्यक्ष तेथील परिस्थितीची आढावा घेतल्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी आवश्यक असलेले शोध व बचाव साहित्य उपलब्ध होण्याची आवश्यकता असून भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना यांसदर्भात आज निवेदन दिले आहे.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील चोळई गावातील अपघातांची मालिका चौपदरीकरणानंतरही अद्याप थांबलेली दिसून येत नाही.
तळा | तळा तालुक्यातील तारणे येथील बस स्टँडवर उभ्या असलेल्या २२ वर्षीय मुलीचा अज्ञात इसमाने विनयभंग केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
अलिबाग : महाराष्ट्र शासनाने पर्यावरण पूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण- 2021 लागू केले असून ई-बाईक्स व ई-वाहने यांना मोटार वाहन करातून धोरण कालावधीसाठी 100 टक्के सूट देण्यात आली आहे.
अलिबाग । अलिबाग पंचायत समितीचे सदस्य उमेश वर्तक यांचे मंगळवारी (२२ मार्च) सायंकाळी निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. बैलगाडी स्पर्धा पाहत असताना उमेश यांचा अपघात झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे वरसोली परिसरात दु:खाचे सावट पसरले आहे.
औरंगाबाद | युद्धाच्या नावाने व्यापाऱ्यांकडून लूट सुरू असल्याचा आरोप किराणा दुकानांमध्ये ग्राहक करत आहेत. कारण, गहू, तेलाबरोबरच मसाल्याचे पदार्थच्या किंमती अचानक महाग झाल्यानं लोक हैराण झाले आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिसून येत असताना महाराष्ट्रात मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने लोकांना हैराण केलं आहे. देशभरात तेल आणि गव्हाची भाववाढ सुरू झाली आहे. त्यात साखर, तेल, गहू, आटा, रवा, मैदा, लाल मिरची आणि मसाल्याचे दर अचानक वर गेले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या न
पाली/बेणसे (धम्मशील सावंत) अष्टविनायक तीर्थक्षेत्र व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकीत शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने बाजी मारली आहे. 17 पैकी 10 जागांवर शेकाप-राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत.
मुंबई । मुंबई शहराला नवी मुंबई शहर आणि रायगड जिल्ह्याशी जोडणार्या शिवडी-न्हावा शेवा पारबंदर प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा सोमवारी (3 जानेवारी) पार पडला. या प्रकल्पात ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची यशस्वीरित्या उभारणी करण्यात आली. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पीड बोटीतून या कामाची पाहणी केली.
अलिबाग । तमाम भाविकांची श्रद्धा वाढीस लागो आणि महाराष्ट्राची वाटचाल सर्वांगीण विकासाकडे होवो, अशी प्रार्थना श्रीगणराया चरणी आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांनी आज (12 डिसेंबर) जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र महड येथे केले. यावेळी त्यांनी खोपोली-पाली मार्गाच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
नवी मुंबई : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील 67 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून 5 जून 2022 पर्यंत व त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्याकरीता जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://indiapostgdsonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावेत.
पनवेल । बंदी असलेला सुगंधित तंबाखू व गुटख्याच्या साठ्यासह चार टेम्पो जप्त करण्यात नवी मुंबई पोलीस कक्ष-3 गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत एकूण 60 लाख 72 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर गुटखा विक्रीचा व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
सुकेळी | वार्ताहर | मुंबई-गोवा महामार्गावर कानसई गावाच्या हद्दीमध्ये हॉटेल बिजलीच्या समोरच ईरटीगा गाडीमधून रस्त्याच्या बाजूला लघुशंखेसाठी उतरलेल्या तिघांना ट्रेलरची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार, तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवार (दि.13) रोजी सकाळी 7.05 च्या सुमारास घडला.