उरण दि. ३ (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील करंजा कोंढरीपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांचे सुपुत्र कु.मयंक दिनेश म्हात्रे (वय १० वर्ष) याने रविवार दि.३ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे ४ वाजून १४ मिनिटांनी पेण तालुक्यातील धरमतर खाडीत उडी घेतली व पोहत पोहत मयंक म्हात्रे हा सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी उरण तालुक्यातील करंजा जेट्टीवर पोहोचला.
माथेरान । देशात कुठे नाही एवढ्या वाढीव दराने माथेरान या पर्यटनस्थळ वरील नागरिकांना पाण्याचे दर असल्याने लहानमोठ्या दुकानदार, व्यावसायिक त्याचप्रमाणे घरगुती लॉज धारकांना आपले व्यवसाय करताना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
कर्जत । आमच्या वरिष्ठांनी आम्हाला गाफील ठेवलेहे सत्य असून आता टाहो फोडला जात आहे हे खरे नाही यांची सर्व हकीकत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत येथील अधिवेशन मध्ये सांगितली. तर राज्यात एकोपा ही आपली संस्कृती आहे आणि त्यासाठी राज्यात दंगली घडू देणार नाही असा ठाम विश्वास राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसीय वैचारिक शिबिरात बोलताना दिला.राज्यात सुरु असलेली चीतावणीखोर भाषणे थांबवा असे आवाहन करतानाच राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी केली.
कर्जत । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या पाठीशी 80 टक्के पक्षाचे लोकप्रतिनिधी असून तेच राज्यातील सर्वात जास्त विश्वासार्ह नेते आहेत प्रतिपादन खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. दादांच्या भूमिकेने नवीन पर्वाला सुरुवात झाली असून आता घड्याळ तेच पण वेळ नवी या घोषवाक्य घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पुढील वाटचाल करील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
कर्जत । मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असे कधीही आम्ही म्हणालो नाही. त्यांना आरक्षण द्याच, परंतू ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये इतकेच आपले म्हणणेे आहे. या भुमिकेपासून आपण कधीही मागे हटणार नाही, सरकारने राजीनामा देण्यास सांगितला तर एका मिनिटात राजीनामा देवून बाजूला होईन अशी स्पष्ट भुमिका राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे.
माणगाव (भारत गोरेगावकर) - मुलींचे शिक्षण आणि दैनंदिन जीवन जगताना झालेले कर्ज त्यातच नवरा लक्ष देत नाही कि कसलीही मदत करत नाही यामुळे जगणे असह्य झाल्याने आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन एका आईने स्वतःही कोकण रेल्वे खाली आत्महत्या केल्याची ह्रदय द्रावक घटना माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे घडली या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.
अलिबाग । बँक ऑफ बडोदाच्या कृषी पंधरवडयानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई विभागाच्या शेतकरी संपर्क अभियाना अंतर्गत अलिबाग येथे झालेल्या मेळाव्यात शेतकरी, महिला बचत गट, मत्स्य व्यावसायिक यांना 10 कोटी रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. या मेळाव्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
पेण । पेण तालुक्यातील पेण वाशी रस्त्यावर वाशी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ वॅगनर कार झाडावर आदळुन झलेल्या अपघातात वॅगनर कार मधील संतोष म्हात्रे (उर्फ दर्यासागर ) हे ठार झाले तर दोघेजण जखमी झाले.
कर्जत । 2017 साली मला आणि अजित पवार यांना सरकारमध्ये सत्तेत सहभागी होण्याबद्दल सांगण्यात आलं. पण, मी आणि अजित पवार सत्तेत सहभागी झालो नाही. काही कारणास्तव ते सरकार स्थापन झालं नाही. नाहीतर 2017 सालीच भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असते, असं विधान रायगडचे खासदार सुनील तटकरेंनी केले आहे. ते कर्जतमधील अजित पवार गटाच्या शिबीरामध्ये बोलत होते.
अलिबाग । रायगडचे जिल्ह्याधिकारी परवा अॅक्शनमोडमध्ये आल्याचे दिसले. त्यांनी जिल्हा क्रिडा संकूलासाठीचा निधी आणि जिल्हा रुग्णाालयाच्या विषयावरुन अधिकार्यांना फैलावर घेतले. तसेच या दोन्ही विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश संबधीत अधिकार्यांना दिले आहेत. अलिबागमध्ये मच्छर पैदास खुपच वाढली आणि त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना त्यांनी अलिबागच्या मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत.
रत्नागिरी । काही लोक प्रकल्पाला विरोध करत असतात मात्र कोकणचा विकास झाला तर इथल्या तरुणांना-तरुणींना कामासाठी कुटुंब सोडून मुंबई-ठाण्यात जावे लागणार नाही. त्यामुळे आम्ही कोकणच्या विकासाला प्राधान्य देत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते रत्नागिरी येथे बोलत होते.
कर्जत । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपली नवी टॅगलाईन तयार केली आहे. ‘घड्याळ तेच; पण वेळ नवी’ या टॅगलाईनखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत येथे अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार करणार आहे.
21.1k
अलिबाग : मांडवा जेट्टीजवळ उभ्या असलेल्या स्पीड बोटीला अचानक आग लागली. या दुर्घटनेत २ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोर्लई । गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सिकई खेळात वेदांत सुर्वेने महाराष्ट्राचे नेतृत्व करत - 62 किलो वजन गटात कांस्य पदक पटकावून रायगड जिल्ह्याचे नाव राखले. नेशनल गेम्स स्पर्धा -2023 दि. 26 आक्टोंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे संपन्न झाला.
बोर्ली-मांडला । मुरूड तालुक्यात बुधवारी दुपार नंतर आलेल्या अवकाळी पावसाने कापणी केलेल्या भात शेतीला धोका होण्याची दाट शक्यता असून शेतकरी राजा धास्तावला आहे.
माणगाव । माणगाव ते गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान कोकण रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
रोहा । रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली तर्फे आतोणे हद्दीतील बाल्हे- हंडेवाडी येथे जल जीवन मिशन योजने अंतर्गत काम मागील 11 महिन्यापासून ठप्प आहे. परिणामी स्थानिक नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. सदर योजनेचे काम तातडीने मार्गी न लागल्यास संतप्त ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयावर रिकामा हंडा मोर्चा काढणार असा इशारा वजा निवेदन भाजपाचे नेते रवींद्र काशिनाथ तारू यांनी दिला आहे.
रोहा । मुंबई गोवा महामार्गावर रोहा तालुक्यातील वैजनाथ गावाजवळ असलेल्या सुरगड किल्ल्यावर अडकलेल्या अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका करण्यात आली. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी कड्यावरून क्लायंबिंग च्या साह्याने त्यांना सुखरूप खाली उतरविले.
दिघी । श्रीवर्धन तालुक्यातील ’दिवेआगर’ हे जगप्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ. याच ठिकाणी श्रीसिद्धनाथ भैरव व श्रीकेदारनाथ भैरव ही दोन मंदिर आहेत. या मंदिरांच्या उभारणीसाठी तब्बल एक कोटी बत्तीस लाखाचा निधी असून, अद्याप मंदिर बांधकामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे भैरवनाथा तुझं मंदिर कधी होणार ? अशी विचारणा भक्तांकडून केली जात आहे.
श्रीवर्धन : आम्ही कधीही शरद पवारसाहेब यांच्या शब्दाच्या बाहेर गेलो नाही; परंतु पवार साहेब विनंती आहे, नको त्या लोकांच्या डोक्यावर हात ठेऊ नका. भलत्या सलत्या लोकांना, बेईमान लोकांना मोठे करु नका, असा टोला आ. जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांना नाव न घेता लगावला.
म्हसळा । गोवंशाची टेम्पोमधून बेकायदा गुरे चोरणार्या दोघांनी पोलीसांनाच धक्काबुकी केल्याची धक्कादायक घटना म्हसळा येथे घडली. यानंतर पोलीसांनी या दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. तसेच 12 गुरांची मुक्तता केली आहे.मोबीन अ हसन शेख (रा. कुर्ला) मिराज अहमद कुरेशी हे दोघे म्हसळा येथून 12 गुरे एका टेम्पोमधून कोंबून बेकायदा वाहतुक करत होते.
म्हसळा । शासन लोकांना सांगतो झाडे लावा, झाडे जगवा तुम्ही, वनविभाग सांगतो झाडे तोडण्यास परवाना देतो आम्ही म्हसळा वनविभाग क्षेत्रात झाडांची कत्तलीचे विदारक वास्तव दिसते आहे समोर.ग्लोबल वॉर्मिगच्या दुनियेत सर्वत्र मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना यावर एकमेव उपाय म्हणजे वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे.
पेण । इंटीग्रेटेड पॉवर डीस्ट्रीब्युशन स्कीम अंतर्गत पेण शहरासाठी भुमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र 8 वर्षानंतरही या योजनेची काम पुर्ण होऊ शकलेले नाही. पेण नगरपालिका प्रशासन आणि महावितरणयांच्यात समन्वय नसल्याने हे काम रखडले आहे. एकूण 33 किलोमीटर पैकी अजूनही 16 किलोमीटरचे काम बाकी आहे.
पनवेल । पेट्रोल पंपावर काम करणार्या पस्तीस वर्षीय महिलेला बोनस घेण्याकरता बोलवून तिला बोनस न देता शिवीगाळ व धमकी देऊन दोन्ही अंगावर हात उगारून धक्काबुक्की केल्याप्रकरणी मॅनेजर धनंजय देशमुख आणि चेतन याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पनवेल । कळंबोली वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे चोरीस गेलेल्या दुचाकींचा शोध लागला असून वर्षभरात एकूण चार चोरीचे वाहने शोधून काढण्यात आली आहेत. कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीभाऊ बानकर व पोहवा/1148 शिंदे हे स्टील मार्केट मधील रोडच्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करून गस्त करीत असताना केडब्ल्यूसीजवळ एक दुचाकी वाहन क्र. चक46उक4211 हे बेवारस स्थितीत लावल्याचे दिसून आले.
पाली /बेणसे । महाराष्ट्रात सर्वत्र कांद्याचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्य माणसाला कांदा रडवत आहे. आज प्रत्येक भाजीमध्ये कांदा वापरला जातो. पण आता कांद्याचे भाव 70 रुपये किलो झाल्यामुळे लोकांना कांदे खाणे परवडत नाही असेच चित्र दिसून येत आहे. या भाववाढीमुळे कांदे खाणे लोकांनी बंद केले आहे.
सुधागड । हळदी समारंभासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाच्या लोखंडी पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला. या पोलला स्पर्श झाल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. मंदार चोरगे असे त्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूने चोरगे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
खोपोली । जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व मुंबईची शान असलेल्या गेटवे ऑफ इंडिया येथे भारतातीलच नव्हे, तर देशविदेशातील पर्यटक दररोज हजारोंच्या संख्येने आवर्जून भेट देत असतात. मात्र याठिकाणी होणार्या विविध कार्यक्रमांचा सर्वांनाच फटका बसत असतो. मुख्यत: मांडवा-अलिबाग, जेएनपीटी, एलिफंटा आदी ठिकाणी येजा करणार्या हजारो प्रवाशांना या कार्यक्रमांचा अधिकतेने फटका बसत असतो.
खोपोली । रायगड हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य असून या ठिकाणी वळवळ करायची नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आम्हाला कोणाचेही विरोधात बोलायचे नाही असे सांगून 70 वर्षानंतर हा दिवस जवळ येत आहे.
उरण । उरणमधील रानसई धरणाचा पाणीसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे एमआयडीसीने येत्या 1 डिसेंबरपासून उरणमध्ये आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली आहे.
महाड । आगामी हिवाळी अधिवेशन हे विरोधी पक्ष म्हणून आपलं शेवटचे अधिवेशन आहे. 31 डिसेंबर ला खोके सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. सरकारला घेरण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषद ही दोन महत्त्वाची आयुधे आहेत. विधान परिषदेतील बहुमत देखील महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला कोकण पदवीधर मतदारसंघ जिंकायचा म्हणजे जिंकायचाच असे आवाहन शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
महाड औद्योगिक वसाहतच्या विस्तारीत क्षेत्रात असलेल्या ब्ल्यू जेट हेल्थकेअर या कारखान्यात ब्रॉयलरचा स्फोट होवून भीषण आग लागण्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलादपूर । मराठा समाजाने एकजूट ठेवल्यास आरक्षण द्यावेच लागेल. चार पिढयांपासून वंचित ठेवले; आता कुणबी नोंदी आढळून येऊ लागल्या आहेत. आपली लेकरं 95 टक्के मिळवूनही 45 टक्केवाले पुढे गेलेत. आता यापुढे असा अन्याय होऊ देणार नाही. आपलं आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे, असा आत्मविश्वास मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा जनसमुदायाला दिला.
पोलादपूरात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान
तळा/ अलिबाग । गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छांद मांडला आहे. तळा शहरात तिन महिन्यात 50 जणांना चावा घेतला आहे. तर अलिबागमध्ये एकाच दिवशी पंधरा जणांचा चावा घेतला. वारंवार घडणार्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
तळा । तळा तालुक्यात विशेषतः तळा शहरात कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली असून तळा नगरपंचायत डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे.
नवीदिल्ली । अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केलं आहे. बारामतीत दादा दादा दादा करत ज्यांचं आयुष्य गेलं. मग, अजित पवार यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचं सुचलं, असं म्हणत सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुणे । राज्यात आठवड्याचा शेवट आणि नव्या आठवड्याची सुरुवात कडाक्याच्या थंडीनं होणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसांसाठी हे चित्र कायम राहणार आहे. उत्तर भारतामध्ये पश्चिमि झंझावातामुळं हिमालयीन क्षेत्रामध्ये बर्फवृष्टी होत असल्यामुळे हवामानाचे परिणाम महाराष्ट्रापर्यंत दिसून येत आहेत.
सराटी । हा गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. धिंगाणा घालण्याचा नाही. जाळपोळीला माझं समर्थन नाही, अशा शब्दांत जरांगे-पाटलांनी आंदोलकांना खडसावलं आहे. हे कोण करतेय, ही शंका येत आहे. उद्यापर्यंत जाळपोळ केल्याची माहिती माझ्यापर्यंत येऊ नये. अन्यथा मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.
अलिबाग । बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष असून त्यांचं नाव वापरण्याचा अधिकार सर्वांना आहे. बाळासाहेबांचा छायाचित्र लावू नका म्हणणार्यांनी हिम्मत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून काढून निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
अलिबाग । आठवड्यात पैसे दुप्पट मिळण्याचे आमिष दाखवून कंपनीने अलिबाग तालुक्यातील शेकडो तरुणांना करोडोचा चुना लावला आहे. त्यामुळे या तरुणावर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. याबाबत सायबर पोलिसांकडे फसवणूक झालेल्या तरुणांनी धाव घेतली आहे.
मुंबई । पर्यटन विकासासह कोकणच्या सवारगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकणार्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामास गती देण्यात यावी, त्या अनुषंगाने धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे ‘नौकावहनासाठी गाळ्याची उंची व रुंदी’ साठीचे ना-हरकत प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रमेरिटाईम बोर्डाला बुधवारी (29 नोव्हेंबर) दिले.
नवी मुंबई । गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर प्रवास अवघ्या एख तासात होणार आहे. लवकरच या मार्गावर इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेमुळं चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबईहून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास सोप्पा होणार आहे. डिसेंबरपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
सरकारी कर्मचारी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ; राज्य शासनाचा निर्णय