नवीन पनवेल | बौद्धिक दिव्यांग तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर ती गर्भवती राहिली आणि तिने एका मुलीला जन्म दिल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात जून महिन्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आठ संशयितांचे डीएनए नमुने घेत ते तपासणीसाठी कलिना येथील प्रयोगशाळेत पाठविले होते.
श्रीवर्धन | शहरातील बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. काही व्यापारी पर्यावरणाची काळजी घेत ग्राहकांना कापडी किंवा कागदी पिशव्या देत असले, तरी काही दुकानदारांकडून ग्राहकांना खुलेआम प्लास्टिकच्या कॅरीबॅग दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
महाड | रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेल्या महाड एमआयडीसीच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याचे काम जवळपास पूर्णत्वास आले असतानाही प्रवेशद्वाराजवळील सुमारे १०० ते २०० मीटरचा रस्ता मात्र मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापलेला आहे.
मुंबई | नेपाळमधील पूरस्थिती आणि काही मार्ग बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी राज्य प्रशासनाने केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.
पनवेल | अमेरिकेतून पर्यटनासाठी भारतात आलेल्या ४२ वर्षीय परदेशी पर्यटकाची सुमारे ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली बॅग पनवेल तालुक्यातील नावडे गावाजवळ चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत | तालुक्यातील बारणे गावातील २३ वर्षीय तरुणाचा दुचाकीला गाय धडकल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना २६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास तिवरे मराठी शाळेजवळ घडली. या घटनेने बारणे गावावर शोककळा पसरली आहे. बारणे गावातील २३ वर्षीय तरुण हा मित्रासोबत दुचाकीवरून तिवरेकडून कर्जतच्या दिशेने येत होता.
महाड | महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे विधानसभा समन्वयक तथा शिरगावचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी विधानसभा समन्वयकपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
अलिबाग | पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील, तब्बल ३ हजार ४०० गणना प्रपत्रे खारघर येथील एका झेरॉक्स सेंटरमध्ये आढळल्यामुळे रायगडात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांना (बीएलओ) जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई | गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पोर्शभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्नसुरक्षेबाबत कडक भूमिका घेतली आहे. पंचतारांकित हॉटेल असो, रस्त्यावरील खाद्यविक्रेता असो किंवा गणेशोत्सवातील महाप्रसाद व भंडारा असो, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.
महाड | वीर रेल्वे स्थानकावर सर्व एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यासह महाड- पोलादपूर परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा ७ सप्टेंबर २०२६ रोजी वीर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘मिशन वीर रेल्वे थांबा महाड-पोलादपूर कृती समिती’चे मुख्य प्रवर्तक तथा पत्रकार मनोज खांबे यांनी दिला.
पाली | पाली बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्या तरुणाला पाली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या तब्बल ४१ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या बनावट नोटांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने पाली बाजारपेठेतील व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अलिबाग | नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील ३७ नागरिक सुरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. नेपाळमधील पूरस्थितीमुळे अनेक भागांतील संपर्क आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असताना रायगडमधील नागरिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिघी | श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे येथील समुद्रकिनारी असलेल्या शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे, अवैध बांधकामे आणि अनधिकृत असेसमेंटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बुधवारी (२६ ऑगस्ट) झालेल्या ग्रामसभेत असेसमेंट उतारे देताना आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिघी | श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या प्रस्तावित विस्तारीकरणाला पारंपरिक मच्छिमारांनी सोमवारी (१७ ऑगस्ट) करलास येथे झालेल्या जनसुनावणीत जोरदार विरोध केला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने आयोजित या जनसुनावणीसाठी दिघी, तुरुंबाडी, राजपुरी, आगरदांडा, एकदरा, आदगाव, नानवली, कुडगाव, साळवली यांसह मुरुड तालुक्यातील विविध भागांतून हजारो मच्छिमार उपस्थित होते.
माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बायपासची एक बाजू गणेशोत्सवापासून सुरु करण्याची मंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत विरण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला असून, चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरु केली आहे.
माणगाव | रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या राष्ट्रवादीविरोधातील वक्तव्याला राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
तळा | महागाव पंचक्रोशीतील विनवली फाटा ते कोरखंडा फाटा या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थी, प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
रोहा | कुंडलिका नदीत राफ्टिंग करताना बोट पाण्यातील झाडाला अडकून उलटल्याने नदीत पडलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना रोहा तालुक्यातील धगडवाडी गावाच्या हद्दीत ११ जुलै रोजी घडली होती.
स्मार्ट मीटरचा शॉक! सहा बाय आठच्या टपरीला ५ हजारांचे बिल!
म्हसळा | म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.
उरण | उरण शहरासह द्रोणागिरी परिसरात रस्त्यावर मोकाट फिरणार्या जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, मोकाट बैलाने स्कूटीला दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (२४ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास घडली.
पेण | पेण उपविभागीय समितीकडे गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेले वनहक्क दावे, दळीधारक व मयत दावेदारांच्या वारस नोंदी, ई-केवायसी आणि फार्मर आयडीअभावी शासकीय योजनांपासून वंचित राहणार्या आदिवासींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पेण तालुयातील बरडावाडी येथे आदिवासींचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.
पेण | भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह चौघांविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून फिर्यादी यांना जबर मारहाण करणे, धमकावणे आणि शस्त्र रोखल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पनवेल | गणेशोत्सवाला अवघे तीन आठवडे शिल्लक असताना पनवेल शहरात उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. विविध गणेश मंडळांकडून सजावट, विद्युत रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनाला वेग आला आहे.
सुधागड-पाली । पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिर परिसरात सोमवारी (3 ऑगस्ट) सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्यादरम्यान अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेमुळे सलग पाच विद्युत खांब जमिनीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
कर्जत | कर्जत नगरपरिषद हद्दीला लागून असलेल्या हालिवली गावातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची तस्करी केल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी नार्कोटीक्स पथक आणि रायगड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नायजेरियन जोडप्याला ताब्यात घेतले आहे.
खोपोली | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री भरधाव फॉर्च्युनर कारने मालवाहू पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तुषार भूमकर (रा. वाकड, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चारजण जखमी झाले आहेत.
खोपोली । खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध केपी वॉटरफॉल येथे वर्षासहलीसाठी आलेल्या ठाण्यातील चार मित्रांपैकी एका तरुणाचा निसरड्या ठिकाणी पाय घसरून सुमारे 40 ते 45 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी घडली.
उरण | भारताच्या सागरी व्यापार क्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी करत जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) जागतिक कंटेनर बंदरांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. अल्फालायनरच्या २०२६च्या पहिल्या सहामाहीतील जगातील प्रमुख ३० कंटेनर बंदरांच्या क्रमवारीत जेएनपीएने तब्बल सात स्थानांची सुधारणा करत २८ व्या स्थानावरून थेट २१ वे स्थान पटकावले आहे.
पोलादपूर | सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य दरड दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पोलादपूर | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (३० मे) दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दापोली येथील माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालवत असलेले वडील गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
तळा । तळा नगरपंचायतीस 13 कोटी 81 लाख रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात आला असून शहरातील उर्वरित कामांसाठी आणखी 6 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही देणार असल्यो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
कोल्हापूर । कागल तालुक्यातील सुळकूड येथे टेरेसवर खेळत असताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने 9 वर्षीय शर्विल सागर महादेव याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नवी दिल्ली | सीबीएसईने नववी इयत्तेपासून तीन भाषा धोरण लागू करू नये. "नववी इयत्तेत शिकणे आधीच कठीण आहे, मग त्यात तिसर्या भाषेचा समावेश करण्याची काय गरज आहे?” अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली.
भंडारा | प्रशासकीय इमारत झाली पण,टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबीनला सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते कलेक्टरच्या चेंबरला सर्विलेन्सनं जोडा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
रत्नागिरी | स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणार्या कोकणातील जागेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत सहा जणांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. यात महायुतीकडून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, महाआघाडीकडून बाळ माने तर शेकापकडून अरविंद म्हात्रे यांचा समावेश आहे.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.