पनवेल | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑटोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी मैदानावर गुरुवारी या अभियानाचा शुभारंभ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते झाला.
अलिबाग | ‘उदया महिला उद्योजिका असोसिएशन’च्या माध्यमातून अलिबाग येथे ‘उदया बाजार’ आऊटलेट स्टोअर सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री भरत गोगावले यांनी या स्टोअरला सदिच्छा भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
महाड | महाड तालुक्यातील कुर्ला धरणाच्या पायथ्याशी असलेल्या डोहात पोहण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे कोल परिसरात शोककळा पसरली आहे. राहुल दिलीप घाणेकर (वय २२, रा. कोल-विठ्ठलवाडी, ता. महाड) असे मृत तरुणाचे आहे.
अलिबाग | आज रायगड जिल्ह्यात १७ हजारांहून अधिक ठिकाणी गौरी पूजनाचा मंगलसोहळा रंगणार आहे. गौरीच्या स्वागतासाठी घराघरांत जय्यत तयारी करण्यात आली असून, पारंपरिक पद्धतीने गौरीची प्रतिष्ठापना करून पूजा- अर्चा, आरती आणि नैवेद्य केला जाणार आहे.
नवी मुंबई | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने (एअरपोर्ट्स इकॉनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया - एअर) सुधारित शुल्क सवलत योजनेला मंजुरी दिली आहे.
अलिबाग | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या महिनाभराच्या कालावधीत "सेवा संकल्प अभियान" राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
पनवेल | पनवेलजवळील गव्हाण फाटा येथे एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह परिसरातील नाल्यात पुरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पनवेल शहर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
नागोठणे | सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करून त्याचे पैसे चेकद्वारे देतो, असे सांगत दोन व्यापार्याची ३ लाख ७९ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नागोठणे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
खोपोली | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे निघालेल्या मोर्चाचा चौथा मुक्काम शुक्रवारी, दि. १८ सप्टेंबर रोजी खोपोलीत होणार आहे. यासाठी ताकई येथील धाकटी पंढरीच्या मैदानात हजारो आंदोलकांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.
उरण | ओएनजीसीच्या न्हावा सप्लाय बेसमधील पाईप व अन्य साहित्य गुजरातमधील पिपावाव येथे हलविले जात असून, ४०० हून अधिक ट्रेलर गुजरातकडे गेल्याचा दावा कामगारांनी केला आहे. त्यातच सप्लाय बेसवर काम करणार्या कंत्राटी कामगारांना कमी केल्याने बुधवार (१६ सप्टेंबर) पासून या कंत्राटी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले
पनवेल | मुंबईतून कॅबने पनवेलला परतणार्या महिलेबरोबर कॅबचालकाने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाने कॅब थांबवून चालकाने महिलेचा हात पकडून तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने प्रसंगावधान राखत कॅबमधून बाहेर पडून आपली सुटका करून घेतली.
अलिबाग | रायगड जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणताही वाद किंवा विसंवाद नसून, आगामी तीन वर्षे केवळ विकासाला प्राधान्य देऊन काम करण्याची आहेत, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मांडली.
कोर्लई | राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळातर्फे साळाव-मुरुड रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, नांदगाव येथील नागेेशर नगर ते आयुष हॉस्पिटलदरम्यान साईडपट्टी भराव करताना रस्त्यावर आलेली खडी-माती वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
दिघी | श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे येथील समुद्रकिनारी असलेल्या शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे, अवैध बांधकामे आणि अनधिकृत असेसमेंटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बुधवारी (२६ ऑगस्ट) झालेल्या ग्रामसभेत असेसमेंट उतारे देताना आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बायपासची एक बाजू गणेशोत्सवापासून सुरु करण्याची मंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत विरण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला असून, चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरु केली आहे.
माणगाव | रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या राष्ट्रवादीविरोधातील वक्तव्याला राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
तळा | महागाव पंचक्रोशीतील विनवली फाटा ते कोरखंडा फाटा या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थी, प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
रोहा | कुंडलिका नदीत राफ्टिंग करताना बोट पाण्यातील झाडाला अडकून उलटल्याने नदीत पडलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना रोहा तालुक्यातील धगडवाडी गावाच्या हद्दीत ११ जुलै रोजी घडली होती.
श्रीवर्धन | शहरातील बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. काही व्यापारी पर्यावरणाची काळजी घेत ग्राहकांना कापडी किंवा कागदी पिशव्या देत असले, तरी काही दुकानदारांकडून ग्राहकांना खुलेआम प्लास्टिकच्या कॅरीबॅग दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
स्मार्ट मीटरचा शॉक! सहा बाय आठच्या टपरीला ५ हजारांचे बिल!
म्हसळा | म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.
उरण | उरण शहरासह द्रोणागिरी परिसरात रस्त्यावर मोकाट फिरणार्या जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, मोकाट बैलाने स्कूटीला दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (२४ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास घडली.
पेण | गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस उरले आहेत. मूर्ती कारखान्यांमध्ये अंतिम टप्प्यातील कामाला वेग आला आहे. गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून देशभरात लौकिक असलेल्या पेणमधून सुमारे ३० लाख गणेशमूर्तींची विक्री झाली असून यातून साधारण १०० कोटी रुपयांच्या उलाढालीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पेण | पेण उपविभागीय समितीकडे गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेले वनहक्क दावे, दळीधारक व मयत दावेदारांच्या वारस नोंदी, ई-केवायसी आणि फार्मर आयडीअभावी शासकीय योजनांपासून वंचित राहणार्या आदिवासींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पेण तालुयातील बरडावाडी येथे आदिवासींचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सुधागड-पाली | पाली-खोपोली महामार्गावरील रासळ आणि कानसळ परिसरात मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, या गुरांनी महामार्गावर अक्षरशः ठाण मांडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. रस्त्याच्या मधोमध कळपाने गुरे उभी राहत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
पाली | पाली बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्या तरुणाला पाली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या तब्बल ४१ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या बनावट नोटांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने पाली बाजारपेठेतील व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कर्जत | खालापूरातील कामगारांच्या प्रश्नावरुन काढण्यात येणारा महाएल्गार मोर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याने स्थगित केला. मात्र आमच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यास ११ सप्टेंबर रोजी एक लाखांचा मोर्चा धडकणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिला.
खालापूर | खालापूर येथील स्वामी समर्थ मठात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून लाकडी पादुका आणि चांदीचे आवरण असा एकूण १ लाख ६० हजार ५२२ रुपये किमतीचा ऐवज चोरी करून पोबारा केल्याची २ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
खोपोली | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री भरधाव फॉर्च्युनर कारने मालवाहू पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तुषार भूमकर (रा. वाकड, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चारजण जखमी झाले आहेत.
श्रीवर्धन | बेरोजगारी आणि आरोग्यसेवेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ गाव आगरी युवा संघाच्या वतीने खारगाव बुद्रुक ते दिघी पोर्टदरम्यान बाईक रॅली काढण्यात आली. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधींपासून डावलले जात असल्याचा आरोप करत संघटनेने ‘आम्हाला आमच्या हक्काचा रोजगार द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा’ असा नारा देत सरकारचे लक्ष वेधले.
महाड | सगळे झाले, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेही येऊन गेले; पण मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (३ सप्टेंबर) त्यांनी महामार्गाची पाहणी केली. यानंतर त्यांनी महामार्ग पूर्ण करण्यासाठी जानेवारी २०२७ ही नवी डेडलाईन जाहीर केली आहे.
पोलादपूर | सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य दरड दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पोलादपूर | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (३० मे) दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दापोली येथील माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालवत असलेले वडील गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
तळा । तळा नगरपंचायतीस 13 कोटी 81 लाख रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात आला असून शहरातील उर्वरित कामांसाठी आणखी 6 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही देणार असल्यो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
कोल्हापूर । कागल तालुक्यातील सुळकूड येथे टेरेसवर खेळत असताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने 9 वर्षीय शर्विल सागर महादेव याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नवी दिल्ली | सीबीएसईने नववी इयत्तेपासून तीन भाषा धोरण लागू करू नये. "नववी इयत्तेत शिकणे आधीच कठीण आहे, मग त्यात तिसर्या भाषेचा समावेश करण्याची काय गरज आहे?” अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली.
भंडारा | प्रशासकीय इमारत झाली पण,टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबीनला सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते कलेक्टरच्या चेंबरला सर्विलेन्सनं जोडा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
रत्नागिरी | स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणार्या कोकणातील जागेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत सहा जणांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. यात महायुतीकडून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, महाआघाडीकडून बाळ माने तर शेकापकडून अरविंद म्हात्रे यांचा समावेश आहे.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
कळंबोली | गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच कळंबोली शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहराची दैनंदिन पाण्याची गरज सुमारे ३० दशलक्ष लिटर असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून गेल्या काही दिवसांपासून केवळ १७ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत आहे.
कळंबोली | कामोठे येथे शाळेतून घरी परतणार्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर खासगी स्कूल बसच्या चालकाने बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी बसचालक इस्का आरगुम यादव (रा. सेक्टर-३, कळंबोली) याला अटक केली आहे. या घटनेमुळे पनवेल-कामोठे परिसरात संताप व्यक्त होत आहे.