महाड | वीर रेल्वे स्थानकावर सर्व एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यासह महाड- पोलादपूर परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा ७ सप्टेंबर २०२६ रोजी वीर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘मिशन वीर रेल्वे थांबा महाड-पोलादपूर कृती समिती’चे मुख्य प्रवर्तक तथा पत्रकार मनोज खांबे यांनी दिला.
कोलाड | रोहा तालुक्यातील आंबेवाडी (कोलाड) येथील आठवडा बाजार परिसरात बेशिस्तपणे कचरा टाकण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. कालव्यालगत साचलेल्या कचर्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून बाजारात खरेदीसाठी येणार्या नागरिकांना नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे.
दिघी | श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे येथील समुद्रकिनारी असलेल्या शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे, अवैध बांधकामे आणि अनधिकृत असेसमेंटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बुधवारी (२६ ऑगस्ट) झालेल्या ग्रामसभेत असेसमेंट उतारे देताना आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माणगाव | रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या राष्ट्रवादीविरोधातील वक्तव्याला राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अलिबाग | शिवसेना (ठाकरे गटाचे) युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (२६ ऑगस्ट) मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महामार्गावरील एका पुलाशेजारी लागलेल्या होर्डींगवरुन त्यांनी, पूल ‘स्पेस टेक्नॉलॉजी’चा आणि पालकमंत्र्यांचा बॅनर ए-वन क्वालिटीचा...असा टोला त्यांनी गोगावले यांना लगावला.राज्य सरकारसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली.
अलिबाग | गणेशोत्सवातील सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे.
स्मार्ट मीटरचा शॉक! सहा बाय आठच्या टपरीला ५ हजारांचे बिल!
कर्जत | खरीप हंगामातील पिकांना खताची गरज असतानाच कर्जत तालुक्यात युरिया खताच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, तालुक्यात आतापर्यंत १,१३२.५६ मेट्रिक टन युरियाची आवक झाली असून त्यापैकी १,०८२.२६ मेट्रिक टन युरियाची विक्री झाल्याची नोंद आहे. त्यामुळे सध्या केवळ ५०.३० मेट्रिक टन साठा शिल्लक आहे.
पनवेल | गणेशोत्सवाला अवघे तीन आठवडे शिल्लक असताना पनवेल शहरात उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. विविध गणेश मंडळांकडून सजावट, विद्युत रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनाला वेग आला आहे.
उरण | उरण शहरासह द्रोणागिरी परिसरात रस्त्यावर मोकाट फिरणार्या जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, मोकाट बैलाने स्कूटीला दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (२४ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास घडली.
अलिबाग | रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या नावाने अलिबाग येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचार्याने शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पाली | पाली बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्या तरुणाला पाली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या तब्बल ४१ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या बनावट नोटांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने पाली बाजारपेठेतील व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दिघी | श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या प्रस्तावित विस्तारीकरणाला पारंपरिक मच्छिमारांनी सोमवारी (१७ ऑगस्ट) करलास येथे झालेल्या जनसुनावणीत जोरदार विरोध केला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने आयोजित या जनसुनावणीसाठी दिघी, तुरुंबाडी, राजपुरी, आगरदांडा, एकदरा, आदगाव, नानवली, कुडगाव, साळवली यांसह मुरुड तालुक्यातील विविध भागांतून हजारो मच्छिमार उपस्थित होते.
माणगाव | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रखडण्यामागे कंत्राटदार कामाला कंटाळून निघून गेल्याचे सांगितले होते. केंद्रीय मंत्रीच जर कोकणातील रस्त्याबाबत असे म्हणत असतील त, हे ठेकेदार कोणामुळे कंटाळून गेले? असा प्रश्न नाही का निर्माण होत, असा सवाल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
रोहा | कुंडलिका नदीत राफ्टिंग करताना बोट पाण्यातील झाडाला अडकून उलटल्याने नदीत पडलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना रोहा तालुक्यातील धगडवाडी गावाच्या हद्दीत ११ जुलै रोजी घडली होती.
रोहा | रोहा-अष्टमी नगरपरिषदेत प्रशासन आणि नगरसेवक यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. घरकुल योजनेतील एका लाभार्थ्याला वापर परवाना देण्यास विलंबावरुन नगरसेवक महेश कोलाटकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारला. यावेळी झालेल्या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
श्रीवर्धन | श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सहाय्यकाला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. मंगळवारी (४ ऑगस्ट) अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. घनश्याम कोमटवार (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचार्याचे नाव आहे.
म्हसळा | म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.
पेण | पेण उपविभागीय समितीकडे गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेले वनहक्क दावे, दळीधारक व मयत दावेदारांच्या वारस नोंदी, ई-केवायसी आणि फार्मर आयडीअभावी शासकीय योजनांपासून वंचित राहणार्या आदिवासींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पेण तालुयातील बरडावाडी येथे आदिवासींचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.
पेण | भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह चौघांविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून फिर्यादी यांना जबर मारहाण करणे, धमकावणे आणि शस्त्र रोखल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पनवेल | पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्समधून अपहार झालेल्या ६६.२३ तोळे सोन्याचा अवघ्या ४८ तासांत शोध घेण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले. ६६६.२३ ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या लगडी पोलिसांनी हस्तगत केल्या असून, या प्रकरणातील फरार कामगार शुभम मनाजी खिलारे याला सोलापूर जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावातून ताब्यात घेण्यात आले.
सुधागड-पाली । पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिर परिसरात सोमवारी (3 ऑगस्ट) सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्यादरम्यान अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेमुळे सलग पाच विद्युत खांब जमिनीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
माथेरान | माथेरान नगरपालीकेने सुमारे ३८ लाख रुपये किमतीची आठ ते दहा शौचालये माथेरानमध्ये आणली होती. मात्र, त्यापैकी काही शौचालये अद्याप दस्तुरी नाक्यावर धूळ खात पडून असल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी या सुविधांची गरज आहे, तेथे शौचालये उपलब्ध नसताना इतर ठिकाणी महागडी शौचालये ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
खोपोली | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री भरधाव फॉर्च्युनर कारने मालवाहू पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तुषार भूमकर (रा. वाकड, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चारजण जखमी झाले आहेत.
खोपोली । खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध केपी वॉटरफॉल येथे वर्षासहलीसाठी आलेल्या ठाण्यातील चार मित्रांपैकी एका तरुणाचा निसरड्या ठिकाणी पाय घसरून सुमारे 40 ते 45 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी घडली.
पोलादपूर | सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य दरड दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पोलादपूर | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (३० मे) दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दापोली येथील माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालवत असलेले वडील गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
तळा । तळा नगरपंचायतीस 13 कोटी 81 लाख रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात आला असून शहरातील उर्वरित कामांसाठी आणखी 6 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही देणार असल्यो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
कोल्हापूर । कागल तालुक्यातील सुळकूड येथे टेरेसवर खेळत असताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने 9 वर्षीय शर्विल सागर महादेव याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नवी दिल्ली | सीबीएसईने नववी इयत्तेपासून तीन भाषा धोरण लागू करू नये. "नववी इयत्तेत शिकणे आधीच कठीण आहे, मग त्यात तिसर्या भाषेचा समावेश करण्याची काय गरज आहे?” अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली.
भंडारा | प्रशासकीय इमारत झाली पण,टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबीनला सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते कलेक्टरच्या चेंबरला सर्विलेन्सनं जोडा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
रत्नागिरी | स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणार्या कोकणातील जागेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत सहा जणांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. यात महायुतीकडून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, महाआघाडीकडून बाळ माने तर शेकापकडून अरविंद म्हात्रे यांचा समावेश आहे.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
कळंबोली | कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स, होल्डिंग चार्ज आणि जीएसटी चार्जच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणार्या आंतरराज्यीय टोळीचा पनवेल शहर पोलिसांनी भांडाफोड केला आहे.
पनवेल | खारघर येथील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा परिसरात बुडालेल्या २३ वर्षीय तरुणाला सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. आदित्य विश्वकर्मा असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे.
मुंबई | विकास प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देण्यास विलंब झाल्यास बाधित जमीनमालकांना मिळणार्या व्याजदरात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.