मुरुड जंजिरा | पुण्याहून मुरुडमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांच्या लहान मुलीचा हॉटेलमधील स्विमींग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. माही चक्रधर ताकभाते (वय ५ वर्षे) असे या चिमुरडीचे नाव आहे. सध्या मुरुड येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे मुरुड समुद्र किनारा व आजुबाजूचा परिसर गजबजून गेला आहे.
कर्जत | मुंबई येथून पुण्याकडे निघालेल्या एलटीटी - चेन्नई एक्स्प्रेसमधून लहान बालकांची संशयास्पद वाहतूक उघडकीस आली आहे. बिहार येथून मुलांना कर्नाटकडे घेऊन निघालेल्या मदरसा शिक्षकाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्यामुळे गाडी कर्जत स्थानकात आल्यानंतर, कारवाई करत रेल्वे पोलिसांनी २९ बालकांची सुटका करत, त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
रोहा | समीर शेडगे यांनी अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रिक्त झालेल्या रोहा तालुका प्रमुखपदासाठी ५ जण इच्छुक असल्याने चुरस निर्माण झाली आहे. या अनुषंगाने बोलाविण्यात आलेल्या बैठकीत शिवसैनिकांची तुफान गर्दी जमली होती. यावेळी पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भावना उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली.
अलिबाग | माथाडी हमाल संघटनांच्या संपामुळे रेशन दुकानांवरील धान्य पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील रेशन दुकानातील धान्यसाठा संपल्याने दुकांनाना टाळे लागले आहे. महिना उलटला तरी रायगड जिल्ह्यातील हमाल संघटनांशी यशस्वी वाटाघाटी करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. मात्र जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था कोलमडली आहे. गोरगरीब लाभार्थींना रेशनवरील धान्याच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.
कर्जत | मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे मार्गावरील कर्जतपासून खंडाळा भागातील स्टेशन ठाकूर वाडी येथे रेल्वे मार्गाच्या बाजूला बॅगमध्ये मृतदेह आढळून आला होता. महिलेची हत्या करुन मृतदेह बॅगमध्ये भरुन याठिकाणी फेकण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याप्रकरणी खुनीचा शोध घेण्यासाठी रायगड पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
कर्जत | अतिशय धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात समोर आली आहे. कर्जत येथील एका शाळेत जाणार्या दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बसमध्ये क्लिनरने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी क्लिनरला अटक केली आहे. या घटनेनंतर पालकांच्या पायाखालची जमीन सरकली असून संतापाची लाट उसळली आहे.
अलिबाग | देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कणखर नेतृत्वात भाजपा एक बलाढ्य पक्ष म्हणून पुढे आगेकूच करीत आहे. समाजातील उपेक्षित घटकाला न्याय मिळावा यासाठी लढे पुकारुन झटत होते, असे शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले, त्यांचे मनापासून स्वागत.
अलिबाग | पेझारीच्या नाक्यावरुन लाल बावटा खाली उतरेल, अशी कल्पना कोणीही केली नव्हती. मात्र शेकाप नेते जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील व भाचे अॅड. आस्वाद पाटील यांच्या कुटुंबानेच बुधवारी (१६ एप्रिल) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शेकापच्या या बालेकिल्ल्यात पक्षालाच नाही तर पाटील कुटुंबातच उभी फूट पडली आहे.
उरण | उरण तालुक्यातील जेएनपीए पोर्ट ते पनवेल मार्गावरील फ्री गेट सिग्नलजवळ रस्ता ओलांडताना भरधाव ट्रेलर चालकाने एका आठ वर्षीय मुलीला चिरडल्याची घटना घडली आहे.
खोपोली | कर्जत खालापूर विभागात मनसेला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. उपजिल्हाप्रमुख सचिन कर्णूक यांनी मनसेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपजिल्हाप्रमुख सचिन कर्णूक यांनी मनसे पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात काम केले असताना त्यांनी मनसे पक्षाला का रामराम ठोकला? याबाबत अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.
अलिबाग | शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाचे अॅड. आस्वाद पाटील उद्या १६ एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपल्या सहकार्यांसमवेत मुंबईतील भाजप कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. अलिबाग विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरुन पाटील कुटुंबात वादाची ठिणगी पडली होती.
21.1k
नांदगाव | मुरूड तालुयातील नांदगावसह यशवंतनगर पंचक्रोशीतही आलेल्या मच्छरांच्या धाडीने येथे आलेल्या पर्यटकांना देखील सोडलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे आधीच नागरिक हैराण झाले असताना काळ्या रंगाच्या छोट्या मच्छरांची फार मोठी पैदास झाली असून हे मच्छर दिवसाढवळ्याही माणसांवर सरळ सरळ हल्ला करीत आहेत.
माणगाव | तालुयात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असतानाच माणगाव नगरपंचायत हद्दीत विविध कंपनीतील कामगार वर्ग व तंत्रज्ञ हि मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे कामगार तालुयाच्या ठिकाणी रहात असल्याने शहरीकरणावर अधिक ताण पडत आहे. याबरोबरच छोटे-मोठे व्यावसायिक, व्यापारी हि मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पर्यायाने माणगावचे शहरीकरण, नागरिकरण झपाटयाने वाढत असताना या शहरात दैनंदिन निर्माण होणार्या घनकचर्याचा प्रश्नही तितकाच बिकट बनत चालला आहे.
माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले माणगाव हे तालुयाचे महत्त्वाचे ठिकाण असून, येथे दररोज शेकडो प्रवासी एस.टी. बसचा वापर करतात. मात्र माणगाव एस.टी. आगारात आजही जुन्या, गंजलेल्या आणि वारंवार बिघडणार्या बसगाड्याच धावत आहेत. बसमधील वारंवार होणार्या बिघाडीच्या घटना घडत असल्याने याचा प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे.
रोहा | रोह्यामध्ये धाटाव एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीच्या गोदामाला मंगळवारी (१५ एप्रिल) दुपारी आग लागली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. उष्णतेमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीचे गोदाम आहे.
श्रीवर्धन | श्रीवर्धन येथील जीवना बंदर या ठिकाणी जेट्टीचे मोठ्या प्रमाणावरती काम सुरू आहे. त्याचप्रमाणे श्रीवर्धन दांडा या ठिकाणीदेखील जेट्टीचे काम सुरू आहे. या जेट्टीच्या कामासाठी दहा टायरच्या डंपरमधून खूप मोठ्या प्रमाणात दगडांची वाहतूक करण्यात येत आहे. मात्र डंपर चालकांच्या बेपर्वाईमुळे अनेक वेळा महावितरणच्या विजेच्या खांबांना धडक मारण्यात येऊन, श्रीवर्धन शहरातील वीजपुरवठा तासंतास खंडित होत आहे.
श्रीवर्धन | श्रीवर्धन शहरापासून जवळच असलेल्या श्रीवर्धन म्हसळा मार्गावरील बोडणी घाटातील उतारावर श्रीवर्धनकडे येणार्या ट्रेलरला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर अचानक ट्रेलरने पेट घेतला. सुदैवाने चालक व क्लीनर वेळीच बाहेर पडले. मात्र ट्रेलर जळून खाक झाला आहे. या ट्रेलरमध्ये कन्ट्रक्शनसाठी लागणारे लोखंडी स्टील होते.
म्हसळा | म्हसळा तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तालुक्यातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात याव, अशी मागणी तहसीलदार सचिन खाडे व पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्याकडे करण्यात आली. अवजड वाहतूक सुरू असल्याने भयंकर अपघात वाढत चालले आहेत. स्थानिक नागरिकांच्या व पर्यटकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
म्हसळा | म्हसळा सकलप फाटा येथे ओव्हरलोड मायनिंग वाहतूक करणार्या आयवा डंपरचा अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (२४ मार्च) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. श्रीवर्धन हरिहरेश्वर हद्दीतून रोज हजारो टन मायनींग (मिश्रीत माती) ट्रक ट्रेला, आयवा डंपरने श्रीवर्धन, म्हसळा राज्य मार्गाने आणि दिघी पुणे राष्ट्रीय मार्गाने वाहतूक करण्यात येत आहे.
पेण | घराच्या असेसमेंट उतार्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारताना मळेघर ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक परमेश्वर जाधव याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. वकिलाच्या तक्रारीनंतर शुक्रवारी (११ एप्रिल) सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
पेण | पेण शहरातील महात्मा गांधी वाचनालय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या स्वातंत्र्यसेनानी स्मारकाचे नुतनीकरण व्हावे, अशी मागणी ‘माझं पेण’ या सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी (९ एप्रिल) पोलीस प्रशासन, तहसीलदार व पेण नगरपरिषदेला देण्यात आले.
पनवेल | कळंबोलीत राहणार्या इंजिनिअरींगच्या तिसर्या वर्षात असलेल्या तरुणाने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आहे. मायग्रेनचा त्रास असह्य झाल्याने या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. कुणाल पोपट जाधव (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पनवेल | नवीन पनवेलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव (दि. १० ते १५ एप्रिल) भारतरत्न डॉ. आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, नवीन पनवेल. यांच्यावतीने प्रकाश बिनेदार, आम्रपाली बुध्द विहार, सेटर ०९, बिनेदार कॉर्नर जवळ, नवीन पनवेल व सिडको क्रिडांगण, बिनेदार मैदान, जय अंबेमाता मंदिरा शेजारी, शिवा काँम्पेस जवळ, सेटर ०२, नवीन पनवेल.
सुधागड-पाली | एकच मिशन तंत्रज्ञान मराठीमध्ये, मराठी मनासाठी या ध्येयाने प्रेरित होऊन पालीतील व सध्या लंडनमध्ये कार्यरत असलेले संगणक तज्ञ मिलिंद तुरे यांनी आता मराठीतून संवाद साधता येणारा इशोध हा एआय चॅटबॉट बनविला आहे. विशेष म्हणजे याला मराठी मधूनच बोललेले कळते आणि मराठी मधूनच तो उत्तरे देतो.
सुधागड-पाली | अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो. सध्या अंबा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ व दूषित झाले आहे. त्याबरोबरच येथील अनेक वाहिन्या आतून गंजल्या आहेत त्यामुळे काही दिवसांपासून पालीकरांना गढूळ व काळ्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे भाविक व नागरिकांचे आरोग्य धोयात आले आहे. येथील खडकआळी येथील नळांना मागील महिनाभरापासून काळेकुट्ट पाणी येत आहे.
कर्जत | कर्जतमध्ये उघडकीस आलेल्या लहान मुलींच्या लैंगिक छळवणुकीच्या घटनेनंतर, असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कर्जत शिक्षण विभागाकडून सर्व शाळांची समन्वय सभा आज, २१ एप्रिल रोजी आयोजित केली आहे. कर्जत शिक्षण विभागाने या सभेसाठी पुढाकार घेतला या सभेत स्कूल बसबद्दल अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
खोपोली | डोणवत येथील पोलाद उत्पादन करणार्या एम एन एस स्टील (जुन्या उत्तम स्टील) कारखान्यात अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी, ८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
उरण | जेएनपीएमुळे विस्थापित झालेल्या हनुमान कोळीवाडा गावाचे योग्य पुनर्वसन झाले नसल्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ १४ एप्रिल रोजी उरण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर हनुमान कोळीवाडा गावातील काही ग्रामस्थांनी या आंदोलनाशी गावाचा काहीही संबंध नसल्याचे प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यामुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे.
महाड | तालुक्यातील नांगलवाडी येथे जुन्या वादातून एकाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील शुभ लाभ सोसायटी येथे घडली असून घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले होते. नारायण रामचंद्र साळुंखे (रा.शिवथर ता.महाड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी व जखमी यांचा पिण्याच्या पाण्यावरुन जुना वाद आहे.
महाड | महाड परिवहन आगाराला देण्यात आलेल्या पाच नवीन बसेसचे सोमवारी (३१ मार्च) रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ना. गोगावले यांनी महाड आगाराला ४० नव्या बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातून एक वीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. अक्षरा शुभम पवार असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून ती सध्या गोकुळधाम सोसायटीच्या मागे राहत होती.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील कापडे विभागातील बाजिरे येथील एका शेतकर्याच्या गुरांच्या वाड्याला वणव्यामुळे अचानक आग लागली. या आगीत वाडा पूर्णतः भस्मसात झाला असून, वाड्यात असलेल्या काही छोटी वासरे व एक गाय होरपळून गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना. सोमवारी, १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
तळे | रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन खा.सुनील तटकरे आणि शिवसेना आमदारांमधील दुरी कमी होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिने तोंड न पाहणारे हे नेते आता हळूहळू एका व्यासपीठावर येऊ लागले आहे. आ. थोरवे, आ. दळवी यांच्यानंतर मंत्री भरत गोगावले हेदेखील तटकरेंसोबत एकत्र पहायला मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांमध्ये दिलजमाई झाली का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
तळा/अलिबाग | भैय्या एक पिशवी दो...ताई एक पिशवी द्या...घरातून हात हलवत बाजारात गेल्यानंतर, पिशवीसाठी दुकानदाराकडे हात पसरण्याची घाणेरडी सवय, मुक्या जनावरांसाठी किती घातक ठरते? याचे उदाहरण रायगड जिल्ह्यातील तळा शहरात पहायला मिळाले. पुसाटी येथील एका गायीच्या पोटातून तब्बल १८ किलो प्लास्टिक काढण्यात आले.
उरण | उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांची बदली होऊन तीन ते चार महिने झाले तरीही उरण पंचायत समितीला अद्याप कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे विकास कामांवर परिणाम होत असून, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे.
नागपूर | केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरु आहेत. शेतकर्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकर्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुणे | पुण्यातून सुरु झालेल्या गिया बार्रेचे रुग्ण आता राज्यभरात आढळत आहेत. दुषित पाण्यामुळे या आजाराचा धोका असल्याचे सांगितले जात होते. मात्र चिकनमुळेही ‘जीबीएस’चा आजार होऊ शकतो, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे चिकन पूर्ण शिजवून सोबतच चिकन घेताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
रत्नागिरी | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागून असणार्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी लागणार असेल तर, कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा. रत्नागिरीसह कोकणातील रेल्वे स्थानक जगातील चांगली रेल्वे स्थानके करु, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
रत्नागिरी | महायुती सरकारमध्ये खातेवाटप करण्यात आले. यानंतर आता महायुती सरकारमध्ये पालक मंत्रीपदावरू न रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत असतानाच, रत्नागिरीचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळावे अशी इच्छा योगश कदम यांनी व्यक्त केली आहे.
कोकणातील सवारचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे.
मुंबई | नगराध्यक्षांनी जर गैरवर्तन, भ्रष्टाचार केला तर त्यांना बहुमताने हटवण्याचा अधिकार पुन्हा एकदा सदस्यांना देण्यात आला असल्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी दोन तृतीयांश सदस्यांची तक्रार किंवा एकमत असणे आवश्यक आहे.
मुंबई | एसटी कर्मचार्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल,याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल असे नि:संदिग्ध आश्वासन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचार्यांना दिले आहे. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते.
वसई | बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील दोषी बडतर्फ पोलीस अभय कुरुंदकर याच्या शिक्षेचा अंतिम निर्णय आता सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी होणार आहे. कुरुंदकरला दोषी ठरविल्यानंतर शुक्रवारी पनवलेच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तीवाद आणि बिद्रे कुटुंबियांचे मत ऐकल्यानंतर न्यायाधीश पालदेवार यांनी अंतिम निकाल राखून ठेवला.