उरण | सरकारने उरण, पनवेल आणि पेण तालुयातील १२४ गावांत एमएमआरडीएच्या माध्यमातून ‘केएससी नवनगर’ या नावाने तिसरी महामुंबई वसविण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत कोणत्याही प्रकारे स्थानिक शेतकर्यांना विेशासात न घेता सरकार या परिसरातील शेतकर्यांना देशोधडीला लावून तिसरी मुंबई हे विकसित शहर बसविण्याचा घाट घालत आहे.
पाली/बेणसे | रायगड जिल्ह्यातील कोणत्याही डोंगरमाथ्यावर, माळरानावर, रस्त्याच्या कडेला अथवा शहर व गावातही बारीक पांढरी फुलांनी बहरलेली दाट हिरवी झुडपे पाहायला मिळत आहेत. रानमोडी म्हणून परिचित असलेली ही वनस्पती तिच्या नावाप्रमाणे रान मोडत आहे.
कर्जत | तालुयातील रेल्वे पट्ट्यात बांधण्यात आलेले पाली भुतीवली येथील लघुपाटबंधारे धरणाच्या बांधाजवळ खोदकाम सुरु आहे. या खोदकामासाठी दररोज जेसीबी तसेच पोकलेन मशीन आणि बुलडोझर वापरले जात आहेत. मात्र ते खोदकाम करताना महसूल विभागाकडे गौणखनिज उत्खनन करण्यासाठी कोणत्याही स्वरूपातील स्वामित्व शुल्क म्हणजे रॉयल्टी भरलेली नाही. गेले काही महिने सातत्याने दिवसरात्र उत्खनन केले जात असून महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
अलिबाग | बौद्ध धर्माच्या अभ्यासकांना सुलभ पर्यटन करता यावे, यासाठी राज्यात २५ पर्यटनस्थळे निवडण्यात आली आहेत. बुद्धिस्ट सर्किट पर्यटन मार्ग तयार करण्यात येणार असून यामध्ये रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील कुडा लेणी, महाड तालुक्यातील गांधारपाले या लेण्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
कर्जत | कर्जत तालुक्यातील एका २३ वर्षीय तरुणाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. स्वप्निल सुरेश सावंत असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा सुधागड पाली येथील राहणारा आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ असणार्या डिकसळ परिसरातील डायमंड या सोसायटीत स्वप्नील सुरेश सावंत हा आपल्या आई आणि आजीसोबत गेल्या सहा महिन्यांपासून रहायला आला होता. वडिलांचे छत्र डोक्यावरून हरपल्यानंतर तो कर्जत येथे आपल्या मामाकडे आला.
पाली | शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती देसाई यांनी दिली आहे. पक्षासाठी आवश्यक वेळ देता येत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रकाश देसाई यांनी शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे, पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
अलिबाग | पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर रायगडात शिवसेना आमदारांसह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘पालकमंत्री नाही बालकमंत्री’ अशी टिका त्यांनी केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करताना ‘बाप तो बाप रहेगा’चे स्टेटस ठेवून शिवसेनेला आणखी डिवचले आहे. एकंदरीत राज्यात महायुतीतील घटक असलेल्या शिवसेनाराष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
मुंबई | प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियानांतर्गत राज्यातील ७५ ठिकाणी अंगणवाडी केंद्र सुरू करण्यााठी केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे.
नवी मुंबई | सिडकोच्या बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्ग क्र. १ वर २० जानेवारी २०२५ पासून मेट्रोच्या फेर्यांचे सुधारित वेळापत्रक लागू होणार असून सकाळी आणि सायंकाळी सर्वाधिक गर्दीच्या वेळी दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या फेर्यांमध्ये वाढ झाल्याने गर्दीच्या वेळी प्रवास करणार्या प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.
कर्जत | ‘आम्ही रायगडात केलेली मदत विसरु नका. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा’ असे राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी नाव न घेता सुनील तटकरे यांना सुनावले आहे. दोन दिवसांपूर्वी आम्हाला देशाचे पंतप्रधान यांनी कानमंत्र दिला असून महेंद्र थोरवे यांनी तो पाळल्याचे दिसून येत आल्याचे भरत गोगावले यांनी सांगितले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कर्जतमधील विरोधकांना दवा द्यावी आणि महेंद्र थोरवे यांना दया दाखवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
नवीन पनवेल | बारा वर्षांपासून घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून राहत असल्या प्रकरणी मोहसीन खोकोन मुल्ला याला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली. १२ जानेवारी रोजी पनवेल तालुका पोलिसांना बारवई पूल मांडे वडापाव सेंटर, खानावळे येथे एक बांगलादेशी नागरिक कामासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
उरण | जासई-दास्तान फाटा येथे १९८४ साली शेतकर्यांच्या न्यायहक्कासाठी झालेल्या व देशभरात गाजलेल्या आंदोलनात पाच शेतकर्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यानंतर ४१ वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जैसे थे आहेत.
21.1k
मुरुड जंजिरा | ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर जेट्टीची सुविधा नसल्याने पर्यटक वाहतूक सेवा संस्थेला अपेक्षित पर्यटकांची ने-आण करता येत नाही. किल्ल्यात जेट्टीअभावी महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना छोट्या बोटींची मदत घ्यावी लागते. पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी पद्मदुर्ग किल्ल्यावर जेट्टी उभारावी, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.जंजिरा आणि पद्मदुर्ग (कासा) हे दोन्ही किल्ले पुरातत्वखात्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ठेवा आहे.
दिघी | रायगड जिल्ह्यातील राजपुरी खाडीवर विकसित होत असलेल्या दिघी पोर्टला दिघी-पुणे महामार्ग म्हसळा तालुक्यातील सकलप आणि तोंडसुर या बायपास मार्गावरुन काढण्यात आला आहे. मात्र, रस्ता पूर्ण होऊन अद्याप मोबदला न मिळाल्याने बाधित शेतकर्यांनी आक्रमक पावित्रा घेत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उतेखोल/माणगांव | माणगांवची जीवनदायिनी असलेल्या काळ नदीचे पात्र कचर्यामुळे दूषित होत चालले आहे. पात्राला कचर्याचा विळखा पडत चालला असून, सर्वत्र पसरलेल्या कचर्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे नगरपंचायतीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
पनवेल | ठाणे वन विभागाचे कर्मचारी, वन्यजीव वॉर्डन आणि स्वयंसेवकांचा समावेश असलेल्या १५ सदस्यांच्या गटाने केलेल्या सर्वेक्षणात खारघर टेकडीवरील मोकळ्या भूखंडावर बिबट्याच्या हलया पायाच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे, खारघर टेकडीवर दोन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असल्याची वन विभागाकडून देण्यात आली आहे.
रोहा अष्टमी | आजारी असलेल्या आजीला बघण्यासाठी अष्टमी येथे आलेला २१ वर्षीय तरुण रोहे शहरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आजीने रोहा पोलीस ठाण्यात दिली आहे.
रोहा | रोहा तालुक्यातील अकरा वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचारामुळे जिल्हा हादरुन गेला आहे. या घटनेनंतर महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यानंतर हमी मंत्री भरत गोगावले यांनीही पिडीत मुलीच्याकुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चुकीला माफी नाही, असे म्हणत गोगावले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना फोन करुन सदर प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्याची मागणी केली.
श्रीवर्धन | नववर्षाच्या स्वागतासाठी हडपसर पुणे येथून आलेल्या चार तरुणांना श्रीवर्धन समुद्रकिनार्यावरील धुप प्रतिबंधक बंधार्यावर गांजाचे सेवन करताना श्रीवर्धन पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. श्रीवर्धन येथे नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटकांनी हजेरी लावली होती.
श्रीवर्धन | अलिबाग, मुरुडनंतर आता श्रीवर्धन समुद्र किनार्यावर ‘श्रीवर्धन बीच शो’ला शानदार सुरुवात झाली आहे. किनार्यावर रम्य संध्याकाळ घालवल्यानंतर परतीकडे असलेल्या पर्यटकांसाठी हा कार्यक्रम एक अनपेक्षित आनंद देणारा ठरला. त्यामुळे पर्यटकांसह श्रीवर्धनकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘रायगड टाइम्स’ या जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिकाकडून हा सामाजिक उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
म्हसळा | विजेच्या धक्क्याने देहन नर्सरी येथील कृषी पर्यवेक्षक राजेंद्र सुखदेव मांडवडे (वय ५७) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१५ जानेवारी) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. रोपांना वीजपंपाने पाणी सुरु करीत असताना त्यांना विजेचा धक्का लागला.
म्हसळा | बेकायदा गो हत्या, गोमांस वाहतुकीच प्रकार वाढीस लागले आहेत. जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे याबाबतची कारवाई पोलीस करीत असतात. मात्र परवा म्हसळा येथे गोमासांची स्कुल बसमधून वाहतूक होत असल्याची धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. म्हसळा पोलीसांनी याप्रकरणी एका डॉक्टरसह दोघांना अटक केली आहे.
पेण | पेणमध्ये १४ वर्षीय बालकाची हत्या करुन, त्याचा मृतदेह कासार तलावाजवळील झुडपात फेकून देण्यात आला होता. ही हत्या त्याच्या मित्रानेच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दारुच्या आहारी गेलेल्या या १५ वर्षीय मुलाने पैशांच्या किरकोळ मित्राच्या डोक्यात लाकडी राफ्टरने वार करत, त्याची निर्घृण केली.
पेण | पाली-खोपोली मार्गावर शनिवारी पहाटे अज्ञात वाहनाने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रात्रपाळी करुन चालक महेश खरात (रा.कळंब ता.सुधागड) हे रिक्षाने घरी जात होते. दुरशेतजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली.
पनवेल | संजय शिरसाट हे कॅबिनेट मंत्री झाल्याने त्यांचा सिडको अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्याची अधिसूचना गुरुवारी (१६ जानेवारी) राज्य सरकारने प्रसिद्ध केली. नगर विकास विभागाचे सहसचिव सुबराव शिंदे यांनी हा जीआर काढला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वांत श्रीमंत महामंडळाला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. या ठिकाणी भाजपच्याच पदाधिकार्याची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पनवेल | बँक ऑफ इंडियाचा अधिकारी असल्याचे भासवून सायबर टोळीने खारघर येथील बँकेच्या सेवानिवृत्त अधिकार्याच्या पत्नीला गंडा घातला. बँकेत ठेवलेल्या ५ लाख रुपयांच्या फिक्स डिपॉझिटची मुदत संपलेली नसतानाही बोलण्यात गुंतवून एफडीची रक्कम मुदतीपूर्वी परस्पर ऑनलाईन काढून घेण्यात आली.
खोपोली | शिवसेना, भाजपा, आरपीआय व मित्रपक्ष कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचीत कॅबिनेट मंत्री, खासदार व आमदारांचा सत्कार सोहळा आज (१७ जानेवारी) आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत येथे आयोजित केला आहे. या सत्कार सोहळ्याच्या बॅनरवर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचे फोटो नसल्यामुळे तटकरे आणि महेंद्र थोरवे वाद सुरुच असल्याची चर्चा आहे.
खोपोली | खोपोली बाजारपेठ समाज मंदीर रस्त्यावर मोटारसायकलवरुनच रस्त्यावर थुंकणार्या तरुणाला महिला दक्षता समितीच्या सदस्या शिल्पा मोदी यांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार करताच कर्जतवरुन बोलावून या तरुणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
महाड | महाड तालुक्यातील मोरांडेवाडी पिंपळदरी येथे गायीच्या वासरावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मानव जातीला काळीमा फासणार्या या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात असून, याप्रकरणी नराधमाला अटक करण्यात आली आहे. १२ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
महाड | विधान परिषदेचे विरोधी अंबादास दानवे यांनी सोमवारी (१३ जानेवारी) महाड तालुक्यातील तळीये दरडग्रस्त गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी तळीये दुर्घटनास्थळालादेखील भेट दिली. रखडलेल्या घरांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या.
पोलादपूर | ओंबळी-पोलादपूर एसटीचा ब्रेक फेल झाल्यामुळे बसमधील ४० प्रवाशांवर बाका प्रसंग ओढवला होता. चालक आणि काही प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर प्रवाशांनी संताप व्यक्त करत केला आहे. नादुरुस्त गाड्या पाठवून महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप केला आहे.
पोलादपूर | रायगड जिल्ह्यातील गेले कित्येक वर्ष प्रलंबित असणारे शाळांचे ऑडिट यासह भविष्य निर्वाह निधी स्लीपा बाबत शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. मात्र, लेखाधिकारी शिवदास पोटे यांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अलिबाग पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ जिल्ह्यातील शिक्षक सेवकांचे प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक तालुयात कॅम्प घेत शाळांची ऑडिट व भविष्य निर्वाह निधीचा हिशोब कर्मचार्यांना देण्यासाठी कॅम्पचे आयोजन केले.
तळा । तळा नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कर वाढीच्या नोटीसा बजावल्या असुन जाचक वाढीव कर विरोधात सर्व पक्षीय नागरिक आक्रमक झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कर परवडणारे नसुन रहीवासी सामुहिक हरकती नोंदवीण्यासाठी नगरपंचायत समोरआक्रमक पवित्रा घेणार आहेत. तालुका डोंगराळ दुर्गम असून शहरात नगरपंचायतीने मुलभूत सोयी सुविधा दिल्या नाहीत. पाणी एकदिवस आड येत आहे.
तळा | उरण आणि श्रीवर्धन मतदारसंघात महाआघाडीच्या उमेदवारांचे काम करण्याच्या सूचना काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या उमेदवारांच्या जीवात जीव आला आहे. दोन दिवसांपूर्वी श्रीवर्धन मतदारसंघातील काँगे्रसच्या पाचही तालुकाध्यक्षांनी अपक्ष उमेदवार राजा ठाकूर यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे येथे आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आलेहोते.
पुणे | राज्यामध्ये दहावी तसेच बारावीच्या परीक्षा केंद्रांवर प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश शिक्षण मंडळाकडून काढण्यात आले आहेत. मंडळाचा निर्णय योग्य असला तरी सीसीटीव्ही साठीचा खर्च कोणी करायचा यावरून पेच झाला आहे. राज्यात होऊ घातलेल्या दहावी तसेच बारावीच्या परीक्षेदरम्यान प्रत्येक परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गखोलीमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश मंडळाने काढले आहेत.
मुंबई | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणे राज्याच्या आणि जनतेच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने या महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी मंगळवारी, ३१ डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाचा पदभार स्वीकारला.
नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. प्रकृती खालावल्याने गुरुवारी (२६ डिसेंबर) त्यांना दिल्लीमधीलएम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत होती. पण त्यांना यश आले नाही.
रत्नागिरी | महायुती सरकारमध्ये खातेवाटप करण्यात आले. यानंतर आता महायुती सरकारमध्ये पालक मंत्रीपदावरू न रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत असतानाच, रत्नागिरीचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळावे अशी इच्छा योगश कदम यांनी व्यक्त केली आहे.
कोकणातील सवारचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे.
"लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार”, अशी घोषणा मुख्यमंत्रर एकनाथ शिंदे यांनी बीड येथे कृषी महोत्सवात केली आहे