अलिबाग | पोल्ट्रीतील पक्ष्यांना पुरवल्या जाणार्या खाद्याच्या बॅगांवर त्यातील अन्नघटक नमूद केले जात नाहीत. तसेच पोल्ट्री कंपन्या करार नाम्यासंदर्भातील अटी शर्ती पाळत नाहीत. वर्षभरापूर्वी याबाबत शासन निर्णय होऊनदेखील कुठलीच कार्यवाही होत नसल्याच्या कारणावरून रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे यांची भेट घेतली. यावेळी चर्चा करून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
रोहा | रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यात इको सेन्सेटीव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आला असून रायगड जिल्ह्यातील तब्बल ४३७ गावे ही इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये येत असल्याचे केंद्र शासनाच्या मसुद्यामध्ये आहे.
पनवेल | ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट आपणा सर्वांनाच माहिती आहे. अशीच एक महत्वाची म्हणजे जीवन मरणाची शर्यत आज कासवाने पुन्हा जिंकली असून कासव पुन्हा वडाळे तलावात आपल्या मुक्कामी सुखरूप पोहचले.... वडाळे तलाव परिसरात एका कासवाच्या तोंडात गळ अडकल्याची माहिती मुकुंद कोळी यांनी अग्निशमन केंद्राला दिली.
उरण | द्रोणागिरी मंदिर परिसर पवित्रतेचा आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. परंतु काही विघातक, बेशरम आणि नशेखोर प्रवृत्तींच्या लोकांनी हा पवित्र परिसर गांजाच्या धुरात बुडवण्याचा धाडस केले आहे. हे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या सभामंडपात आणि पाण्याच्या टाकीच्या परिसरात काही व्यक्ती अंमली पदार्थ म्हणजेच गांजाचे सेवन करत असल्याचे उघडपणे निदर्शनास आले आहे.
अलिबाग | श्रीवर्धन तालुक्यातील गेले चार दिवस मोठ्याप्रमाणात पाऊस पडल्यामुळे धबधबा, धरण व तलाव तुडूंब भरुन वाहत आहेत. या ठिकणी कुठलही दुर्घना घडू नये यासाठी मान्सून कालावधीमध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. कारविणे येथील धबधब्यात एकाचा मृत्यू झाला होता.
पेण | गावाकडे जाणारा रस्ता व अन्य मागण्यांसाठी दुरशेत गावातील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात शेकडोच्या संख्येने महिला, पुरुष, शाळेतील विद्यार्थी सहभागी झाली होती. ग्रामस्थांनी नदी पात्रात उतरून जलआंदोलन केले. पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलनाला भेट देऊन येत्या २२ तारखेला बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढण्यात येईल, असे सांगितले.
खोपोली | खालापूर तालुक्यातील कुंभिवली गावात केमिकल्सयुक्त कापूर उत्पादन करणार्या मंगलम ऑरगॅनिक्स कंपनीतील जुन्या प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना बुधवारी, १६ जुलै रोजी रात्री घडली आहे. कंपनीतील अग्निशमन दलाची गाडी बंद पडल्यामुळे बाहेरून अग्निशमन दलाची वाहने पोहचेपर्यंत कंपनीत अग्नितांडव सुरु होता.
मुंबई | विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. गुरुवारी (१७ जुलै) सभागृहात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा सुरु होती आणि बाहेर विधिमंडळाच्या लॉबीत जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत विधानभवनातच तुफान राडा पहायला मिळाला. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. गल्लीबोळातील गावगुंडांनी वागावे, असे वर्तन विधानभवनात पहायला मिळाले.
खोपोली | पेण-खोपोली मार्गावरील नव्याने होणार्या वडवळ टोल नाक्याजवळ दुचाकीस्वाराची स्कुटी स्लीप होऊन रस्त्याच्या मधोमध पडल्याने भरधाव येणार्या ट्रेलरखाली चिरडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी, १६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
उरण | उरण तालुक्यातील मैथिली पाटील हिचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्या काळजाला चिरणार्या घटनेला महिना उलटून गेला आहे. अपघाताच्या दुसर्याच दिवशी मोठ्या थाटात विविध मंत्र्यांकडून व प्रशासनाकडून मदतीच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र शनिवारी, १२ जुलैला या घटनेला एक महिना उलटूनही त्या मदतीचा एक रुपयाही पोहोचलेला नाही.
21.1k
नागोठणे | नागोठणेजवळील चिकणी येथील आदिवासी वाडीतील अलका लहू जाधव (वय-३५ वर्षे) या महिलेने अंबा नदीवरील पुलावरून नदी पात्रात उडी घेतली आहे. बुधवारी, १६ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. लका जाधव ही महिला पती लहू जाधव यांच्यासोबत नागोठणे बाजूकडून वरवठणे बाजूकडे कामधंदा शोधण्यासाठी जात होते.
रेवदंडा /कार्लई | मुरूड तालुक्यातील बारशिव गावाजवळ एका दुचाकीला कार चालकाने जोरदार ठोकर दिली. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता, रेवदंडा पोलिसांनी त्याला रोहा चेक पोस्टजवळ अटक केली.
रेवदंडा | मुरूड तालुक्यातील प्रसिध्द फणसाड धरणामध्ये वर्षासहलीसाठी आलेल्या अंधेरी - मुंबई येथील एका पर्यटकाचा बुडून मुत्यू झाल्याची घटना घडली. मुंबई अंधेरी येथून अकरा जणांचा ग्रुप बोर्ली येथे पर्यटनासाठी आला होता. बोर्ली येथून रविवारी (दि. १३ जून) दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण फणसाड धरण येथे पोहचले.
माणगाव | शासनाच्या वतीने कायाकल्प पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात रायगड जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने वेगळी छाप उमटवत. ‘कायाकल्प’योजनेत भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्र व २९ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अशा सुमारे ४४ शासकीय आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २९ आरोग्य वर्धिनी उपकेंद्रांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झालेले आहेत.
माणगाव | स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये उच्चतम कामगिरी करणार्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र शासनाकडून प्रोत्साहनात्मक निधी दिला जातो. त्या अंतर्गत माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये आकांक्षी शौचालय उभारणीच्या कामासाठी रु. ६४ लाख ८ हजार २९९ इतका निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन शिवसेना प्रवक्ते अॅड. राजीव साबळे यांच्या हस्ते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, मोर्बा रोड नायासमोर माणगाव येथे उत्साही वातावरणात पार पडला.
तळा | तळा तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी (१५ जुलै) तहसीलदार स्वाती पाटील यांनी जाहीर केली. पंचायत समिती डॉ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात पार पडलेल्या सोडतीला नायब तहसीलदार पालांडे, निवडणूक नायब तहसीलदार टेंबे, महसूल नायब तहसीलदार पाटील, विविध ग्रामपंचायतींमधील राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीवर्धन | शेतकरी असल्याची पडताळणी करुन तशी सातबार्यावर नोंद करण्यासाठी १५ हजारांच्या लाचेची मागणी करणार्या श्रीवर्धन येथील महसूल सहाय्यकाविरोधात नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
म्हसळा | तालुयातील कुडतुडी गौळवाडी येथील शेतकरी अिेशनी अशोक कासार यांच्या मालकीचा बैल, गाय आणि दुसरे शेतकरी शंकर लक्ष्मण मिरगल यांची गाय अशी तीन गुरे गावाशेजारील जंगलात चरायला गेली असता वीजवाहिनीची तार तुटून पडल्याने दगावली.
म्हसळा | तालुयांत वारळ गावच्या महिला सरपंच यांनी स्थानिक ग्रामस्थाविरुध्द म्हसळा पोलिसांत अब्रु नुकसानीची तक्रार केली आहे. या ग्रामस्थावर म्हसळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७, ८, ७९, ३५२, ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण | महावितरणच्या उच्चदाबाच्या वीज वाहिन्या एका जागेवरुन दुसर्या जागेवर स्थलांतरित करण्यासाठी कामाचा तांत्रिक परवाना देण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या पेण मंडळ कार्यालयातील उपअभियंता संजय प्रदीप जाधव याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
पनवेल | डॉक्टर तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या तसेच तिचे अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणार्या तरुणाला खारघर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आनंद दादाभाऊ गते असे त्याचे नाव असून, खारघर पोलिसांनी पीडित तरुणीचा अश्लिल व्हिडीओ असलेला त्याचा मोबाईल जप्त केला आहे.
पाली/बेणसे | सुधागड तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, कामगार व शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रमोद मोरे यांनी असंख्य समर्थकांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. आ.महेंद्र दळवी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी विधानसभा संघटक लहू पाटील व प्रमोद मोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संतोष कदम, भूषण शेलार, बाबू शिंदे, धीरज शेलार या प्रमुख कार्यकर्त्यांनीही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
सुधागड-पाली | पाली नगरपंचायतीकडून काही दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांवर खड्डे भरण्याचे काम करण्यात आले होते. मात्र काही काळाच्या विश्रांतीनंतर हेच खड्डे पुन्हा शहराच्या रस्त्यांवर उघडपणे दिसू लागले आहेत, ज्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांचा संताप वाढला आहे.
कर्जत | कर्जत तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींकरिता २०२५ ते २०३० या कालावधीसाठी थेट सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. ५५ पैकी २८ ग्रामपंचायती या महिला वर्गासाठी राखीव असून पोशीर आणि अंजप या ग्रामपंचायतींचे प्रश्न नवीन आरक्षणानंतरही कायम आहेत.
कर्जत | कर्जत तालुक्यातील हालीवली गावातील स्मशानभूमीत जादूटोणा करताना काही इसम आढळून आले आहेत. हा प्रकार शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. पैशांच्या हव्यासासाठी हा प्रकार सुरु असताना कर्जत पोलिसांनी धाड टाकली आणि त्यावेळी काही तरुणांची धरपकड करण्यात आली.
महाड | महाड- विन्हेरे मार्गावरील करंजाडी तांबडीकोंड या गावानजिक दोन बिबटे मुक्त संचार करताना आढळून आले. वन विभागाला याची माहिती देण्यात आल्यानंतर महाडचे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील यांनी आपल्या सहकार्यांसह या ठिकाणी जाऊन फटाके फोडून या बिबट्यांना पळवून लावले.
महाड | गेल्या २४ तासांपासून रायगड जिल्ह्यासह महाबळेश्वर विभागात मुसळधार पाऊस पडत असल्याने महाड तालुक्यातील काळ आणि सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे पुराचे पाणी महाड शहराच्या सखल भागात शिरले होते. पाणी शिरल्यामुळे शहरातील नागरिक काहीकाळ धास्तावले होते.
पोलादपूर | ओंबळी धनगरवाडीतील महिलेला १०८ ऐवजी १०२ रूग्णवाहिकेतून पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात आणताना महिलेची रूग्णवाहिकेमध्येच प्रसुती होऊन तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे पोलादपूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची रूग्णांप्रती अनास्था पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.
पोलादपूर | जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव हद्दीत रस्त्यावर भेगा पडल्याची बातमी एप्रिल महिन्याअखेरीस ‘रायगड टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आता स्थानिक ग्रामस्थवर्ग रूंदावणार्या भेगांमुळे खडबडून जागा झाला आहे. पावसाळ्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी हा प्रकार गांभीर्याने विचारात घेत तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या लक्षात आणून दिला.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएससीने दहावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २०२६ पासून लागू होईल. याचाच अर्थ पुढच्या वर्षी सीबीएसई बोर्डाकडून दहावी बोर्डाच्या दोन वेळा परीक्षा आयोजित करण्यात येतील. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर सीबीएसईने दहावी बोर्डाची दोन वेळा परीक्षा घेण्याच्या मॉडेलला मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता एक महिना पूर्ण होऊन गेला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
पुणे | भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेस घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नुकतंच एसटी प्रशासनाने नव्या ३ हजार बसची खरेदी केली.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
मुंबई | राज्यातील नद्यांच्या किनारी असलेल्या पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत महसूल आणि जलसंपदा विभागामार्फत पुन्हा सर्वेक्षण केले जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य अॅड. अनिल परब यांनी बदलापूर जवळील उल्हास नदी पात्रात होत असलेल्या अतिक्रमणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
मुंबई | राज्य सरकारने महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे बंदी हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता याबाबत सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, अधिनियमातील तरतुदींविरुद्ध झालेल्या जमिनींच्या तुकड्यांचे नियमितीकरण व प्रक्रिया सुलभ करण्यावर ही समिती लक्ष केंद्रीत करणार आहे.