अलिबाग । जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका सुरु झाल्या आहेत. अर्ज भरण्याचा सोमवारी (10 नोव्हेंबर) पहिला दिवस होता. मात्र पहिल्याच दिवशी जिल्ह्यात एकाही नगरपालिकेमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. नगरपालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या आघाडीवर अजूनही म्हणावी तशी गडबड दिसत नाही.
रोहा । तटकरेंचे होमग्राऊंड असलेल्या कोलाड नाक्यावर शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर अक्षरशः हल्लाबोल केला. 20 वर्षे उपभोगले तरी सर्व मलाच...मुंबई- गोवा महामार्ग त्यांच्यामुळेच रखडला, असा आरोप मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.
बेणसे । केंद्रात आणि राज्य भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची गट्टी असली तरी रायगडात मात्र कट्टीचे चित्र कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मंत्री भरत गोगावले यांनी दिलेला युतीचा फॉर्म्युला खासदार सुनील तटकरे यांनी फेटाळून लावल्यानंतर मंत्री गोगावले यांनी तटकरेंना आमनेसामने लढण्याचे आव्हानच देऊन टाकले आहे.
मुरुड । जिल्ह्यातील मुरूड काशीद समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या शिक्षक व विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (8 नोव्हेंबर) सायंकाळी घडली. अकोल्यातील शुअरवीन क्लासेसमधील 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक शैक्षणिक सहलीसाठी काशीद बीचवर आले होते.
अलिबाग । आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून अधिकृतरित्या सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित नगरपरिषदांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रांचा स्वीकार करण्यात येत आहे.
कर्जत । साधी कच्ची घरे, मजुरी आणि शेतीवर चालणारं आयुष्य...नयन वाघ हा तरुणदेखील हेच आयुष्य जगत होता....दहावीत तो सलग तीन वेळा नापास झाला...अपघातामुळे पोलीस भरतीत उतरण्याची संधी हुकली होती.
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. अवघ्या दोन दिवसांनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा रणसंग्राम सुरु होणार असला तरी पक्षांतर्गत असंतोष, स्थानिक स्तरावरील मतभेद आणि बदललेले आरक्षण यामुळे निवडणूक स्वबळावर लढवायची की युती-आघाडीच्या स्वरुपात ? याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कर्जत | पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन गुरुवारी, ६ नोव्हेंबरपासून पर्यटक प्रवासी यांच्या दिमतीस आली. नेरळ-माथेरान-नेरळ या पहिल्या गाडीला पर्यटकांनी हाऊसफुल प्रतिसाद दिला; मात्र वातानुकूलित गारेगार प्रवास करण्यासाठी जोडण्यात आलेला विस्टाडोम डब्बा मात्र पूर्णपणे रिकामा राहिला.
नवी मुंबई | नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणारी मोठी टोळी उद्ध्वस्त केली आहे. याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली असून त्यांनी देशभरातील विविध बँकांच्या ८८६ खात्यांचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे.
नवी मुंबई । बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. याच कार्यक्रमात मुंबईतील मेट्रो-3 आणि मेट्रो-2 बी या मार्गांचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
उरण । उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्रकल्पात सोमवारी (8 सप्टेंबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या प्रचंड स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला. स्फोटानंतर क्षणार्धात आगीचे तांडव पसरले, तर नागावसह आसपासच्या वस्त्यांमध्ये घरांच्या काचा फुटल्या व नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.
21.1k
मुरुड-जंजिरा | प्रत्येक व्यक्तीकडे स्वाभिमान आहे. परंतु काही लोक आपली तत्त्वे लादण्यासाठी दुसर्यांवर जबरदस्ती करतात. मात्र मुरुड तालुका हा सुसंस्कृत असून या तालुक्यातील व्यक्ती अपमान सहन करु शकत नाहीत. त्यामुळे भाई सुर्वे यांचा राष्ट्रवादीमधील प्रवेश हा विरोधकांसाठी चपराक आहे असे सांगतानाच प्रत्येकाच्या दिव्याखाली अंधार आहे.
ताम्हणी | माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात गुरुवारी (३० ऑक्टोबर) दुपारी झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना माणगाव तालुक्यातील कोंडेथर गावाजवळ घडली असून, कारच्या सनरुफवर दगड कोसळल्याने हा दुर्दैवी अपघात झाला.
गोरेगाव | राज्यभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच रायगड जिल्ह्यातील गोरेगावात राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विकास दादा गायकवाड यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
धाटाव । मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक जिल्ह्यांतील गावांचा संपर्क तुटला आहे. सोलापूर, माडा तालुक्यातील लहूगाव व धाराशिव या भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेकडो नागरिक पूरात अडकले आहेत.
श्रीवर्धन । यावर्षी कोकणातील पावसाळ्याने विक्रमी सुरुवात केली. साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होत असते, मात्र यावर्षी 20 मे रोजीच पावसाने हजेरी लावल्याने पर्यटन हंगामावर मोठा परिणाम झाला असून हॉटेल, कॉटेज व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.
श्रीवर्धन । तालुक्यातील नानवली समुद्र किनार्यावर तब्बल 11 किलो 966 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ आढळून आला असून दिघी सागरी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थ मासेमारीसाठी गेले असता किनार्यावर एक संशयास्पद गोणी आढळून आली.
म्हसळा | म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड येथील वृध्द दाम्पत्याची त्यांच्या दोन मुलांनीच गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. म्हसळा पोलिसांनी या खूनाचा उलगडा पोलिसांना केला असून दोघांना अटक केली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
म्हसळा | तालुक्यातील खरसई गावातील भावेश जनार्दन म्हसकर यांनी शिक्षण क्षेत्रात एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास आता देशातील सर्वोच्च व्यवस्थापन संस्थांपैकी एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) उदयपूर येथे पोहोचला आहे.
पेण । पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पाचे काम 2009 साली सुरु झाले. सध्या धरणाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु 17 वर्षे होऊनही बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत.
पनवेल | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे आदेश केंद्र सरकार किंवा नागरी उड्डाण मंत्रालयाला देता येणार नाहीत, असे बॉम्बे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. तसेच, या मागणीसंदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.
सहकारी महिलेला घरी बोलावून विमा कंपनी मॅनेजरने केला बलात्कार , विमा कंपनीच्या मॅनेजरची काळी करतूत
सुधागड-पाली । सुधागड तालुक्यातील खेमवाडी येथील भगवान खताळ यांचे वारस झोरे कुटुंबियांनी आपल्या पूर्वजांचे घर खेमजाई नवतरुण मित्रमंडळ, खेमवाडी या सार्वजनिक मंडळाला दान करून अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. या उपक्रमामुळे गावकर्यांना विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे.
वाघोशी । सुधागड तालुक्यातील पाली पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत मेढ्यांच्या झुंजीच्या नावाखाली चालणारा अवैध सट्टा उधळून लावला. या प्रकरणात पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 75 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेजण फरार झाले आहेत.
वावोशी | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) पहाटे खालापूर टोल नाका परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मोहपाडा | खालापूर तालुक्यातील मोहापाडा परिसरात ‘भीशी’ व उच्च व्याजदराच्या स्कीमच्या नावाखाली एका महिलेने १०० हून अधिक खातेदारांची सुमारे १.६८ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये बहुसंख्य खातेदार महिला आहेत. तक्रारीनुसार, संशयित महिला महिन्याला ५ टक्के व्याज दराचे आमिष दाखवून पैसे उकळत होती.
उरण । जिल्ह्यातील उरण किनारपट्टीला वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. खोल समुद्रात गेलेल्या सहा मच्छिमार बोटी भरकटल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बोटी मासेमारी करून करंजा आणि आसपासच्या बंदरांच्या दिशेने परतत असताना वार्याच्या जोरदार तडाख्यामुळे त्यांचा संपर्क तुटला असल्याची चर्चा आहे.
उरण । आयएएस अधिकारी गौरव दयाळ यांची केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण (जेएनपीए) अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पुढील पाच वर्षांसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत प्रभावी राहणार आहे. संजय सेठी यांच्या कार्यकाळानंतर हे पद दीड-दोन वर्ष रिक्त राहिले होते, त्याऐवजी उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
महाड | एका दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिला जीवे ठार मारण्याची धमकी देणार्या ३७ वर्षीय नराधमाला एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. १ ऑक्टोबरच्या दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्यादरम्यान हा प्रकार घडला. पीडित आणि तिचे आईवडील मूळ भोर तालुक्यातील आहेत.
महाड । भोर-महाड मार्गावरील शिरगाव हद्दीत रविवारी मध्यरात्री साडेदोनच्या सुमारास भीषण अपघात घडला. मोरीसाठी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे रस्त्याच्या अपूर्ण कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलादपूर । पोलादपूर तालुक्यातील सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक ज्ञानू हजारे (वय 66, रा. अंकलखोप, ता. पलुस, जि. सांगली) यांच्याविरोधात आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा 2003-06 या कालावधीत झालेल्या ठेव व्यवहारांसंदर्भात 2018- 2023 च्या लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे येथे २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ निष्पाप जीवांचा बळी गेला. यामध्ये साखर सुतारवाडी येथे भूस्खलन होऊन सुतारवाडीतील घरेही जमीनदोस्त झाली होती. तेव्हापासून या दरडग्रस्तांची घरासाठी वणण सुरु आहे.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोलापूर | राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री बनवा या मागणी चक्क सोलापूर जिल्ह्यातून मागणी करण्यात आली. एवढेच नाही तर त्यासाठी एका पदाधिकार्याने चक्क रक्ताने पत्र लिहिले आहे. रायगडमधील पालकमंत्री भरत गोगावले यांनाच मिळावे, यासाठी शिवसेना जोर लावून आहे.
नवी दिल्ली | रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पेच दिल्ली दरबारी पोहचला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजप नेते अमित शहा यांच्यातील चर्चेनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली | स्वच्छ भारत मिशन, शहरी श्रेणीअंतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’च्या सुपर लीगमध्येमध्य नवी मुंबई तिसर्या स्थानी आहे. इंदूर शहराने सलग आठव्यांदा देशातील सर्वांत स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला. सुरत दुसर्या स्थानी आहे. मुंबईच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली असून शहराचा ३३ वा क्रमांक आला.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
नवी मुंबई | फळांच्या राजाची अर्थात हापूस आंब्याची वाशी येथील मुंबई एपीएमसी बाजारात झोकात एन्ट्री झाली आहे. कोकणातून आलेल्या या हापूस आंब्याच्या सहा डझनच्या पेटीला तब्बल २५ हजार रुपये विक्रमी दर मिळाला. आतापर्यंत हापूसला मिळालेल्या दरांपैकी हा सर्वाधिक दर ठरला आहे.
नवीन पनवेल | चिकनच्या हड्डीवरून लाकडी बांबूने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी अप्पू वंडाल उर्फ बाब्या (रा.नौपाडा, कामोठे) याच्याविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात त्रगुन्हा दाखल करण्यात आला आहे.