रेवदंडा | रेवदंडा बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या ऐरणीवर आली आहे.पार्कींग सुविधा नसल्याने खरेदीसाठी येणारे नागरिक रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करतात, त्यामुळे आधीच अरुंद असलेला हा रस्ता आणखीनच अरुंद होतो. त्यामुळे ही समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे.
सोगाव | अलिबाग तालुयातील आगरसुरे फाटा ते सातीर्जेकडे जाणार्या रस्त्यावरील पुलावरुन पाण्याने भरलेला टँकर खाली कोसळून झालेल्या अपघातात टँकरचालकाचा मृत्यू झाला असून, टँकर मालक गंभीर जखमी झाला आहे.याबाबत मांडवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२६ एप्रिल) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पाण्याने भरलेला टँकर घेऊन चालक मंगेश दत्तात्रेय करळकर (वय ६१, रा.मुशेत) हे आगरसुरे फाटा ते सातीर्जे ह्या मार्गावरून जात होते.
नवीन पनवेल | बैलांची तस्करी करणार्या संशयित टेंपोचा पाठलाग करुन टेंपो पकडण्यात आला आहे.टेंपो चालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे. गोरक्षकांनी टेंपोची पाहणी केली असता कारमध्ये चार बैल आढळून आले. त्यापैकी एक गंभीर अवस्थेत आढळून आला.घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी टेंपो आणि चार बैल ताब्यात घेतले असून संशयिताविरोधात पशू अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोर्लई| सातत्याने हवामानात होणारे चढ उतार, ग्लोबल वॉर्मिगचा फटका सर्वांनाच जाणवत आहे.प्रचंड उष्णतेमुळे समुद्राचे पाणी देखील तापत असल्याने समुद्रातील मासे समुद्राच्या तळाशी पळाले आहेत. परिणामी मच्छिचा दुष्काळ पडला असून मच्छिमारांवर संकट ओढवले आहे.
कर्जत | सध्या उन्हाळा महिना कडक सुरू झाला आहे. कर्जत तालुयातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून पाणीटंचाई निवारणासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. पाण्याची समस्या गंभीर असलेल्या २५ गावे आणि २८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
रोहा | शिवसेना (शिंदे गट) रोहा तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष उस्मान रोहेकर यांनी आपल्याापदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव त्यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. वेळ आल्यावर धमाका करू असेही रोहेकर यांनी म्हटले आहे.
माणगाव | शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी शेकापला रामराम ठोकला आहे. ते सोमवारी (२९ एप्रिल) रोजी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. शेकापचे दक्षिण रायगडचे युवा नेते म्हणून मोरे यांच्याकडे पाहिले जात होते.
अलिबाग | अलिबाग तालुयातील गोंधळपाडा येथील एका महिलेची हत्या केल्याची घटना घडली. मजुरीचे राहिलेले पैसे मागितल्यामुळे ठेकेदाराने ही हत्या केल्याची तक्रार तिच्या मुलाने पोलीसात दिली आहे.कमलीबाई किसन पवार (५०) असे या मृत महिलेचे नाव आहे. किहीम येथील मयेकर यांच्या घराचे बांधकाम सुरु होते. त्याठिकाणी ही महिला काम करीत होती.
मुंबई | उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली(प) बाभई व वझिरा येथे प्रचार करताना माशांचा वास सहन न झाल्याने नाकाला रूमाल लावला होता. पत्रकार नेहा पुरव यांनी यासंदर्भातील बातमी आपल्या दैनिकात प्रसिध्द केल्याने चिडून पियुष गोयल यांच्या गुंडांनी नेहा पुरव याच्या राहत्या घरी जाऊन त्यांना धमकावले.
पाली/बेणसे | मावळ लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.उमेदवारी अर्ज दाखल करताना रॅली काढून त्यांनी शक्तिप्रदर्शन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा निरीक्षक प्रियदर्शी तेलंग, रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ, जिल्हा महासचिव वैभव केदारी, जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शारदा ताई बनसोडे, रामदास भगत, पँथर सुशील भाई जाधव यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली.
अलिबाग | देशातील विरोधक संपवून एकहाती सत्ता निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजप संविधान विरोधी भूमिकेतून काम करीत आहेत. आता देशातील लोकशाही वाचविण्याची गरज निर्माण झाली असून, संविधान वाचविण्यासाठी शिवसेना महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना निवडून द्या, असे आवाहन आमदार संजय पोतनीस यांनी केले आहे.
पेण | ही निवडणूक साधी नाही, देशाची निवडणूक आहे. हा देश कुणाच्या हाती द्यायचा, याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. मोदीजींमुळे प्रचंड काम झाले आहेच; परंतू कोविड काळात देशाला जिवंत ठेवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे कोविड लसीसाठी तरी मोंंदींना मतदान झाले पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
21.1k
कोर्लई | गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये अनंत गीतेेना मत म्हणजे मोदीना मत सांगत फिरणारे तेच आता मोदींच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यामुळे आता कोणासाठी मत लोकांकडे मागणार? असा सवाल शिवसेना इडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी केली आहे. गेल्यावेळी शेकाप-कॉगे्रसमुळे वाचले यावेळी तटकरेंची हद्दपार करा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
माणगाव | माणगाव येथील एक महिलेने तिच्या पती विरोधात बलात्कार केल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरू आहे.
धाटाव/ रोहा | रोहे तालुयातील धाटाव एमआयडीसीतील सामुदायिक जलशुद्धीकेंद्राजवळ रविवारी (२१ एप्रिल) भीषण आग लागली. आगीत जलशुद्धीकरण केंद्र निकामी झाले आहे. त्यामुळे सर्वच कंपन्यांचे उत्पादन व अन्य कामकाज ठप्प झाले असून, या कंपन्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
रायगड प्रेस क्लबचा श्रीवर्धन येथे पुरस्कार वितरण सोहळा
श्रीवर्धन । दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणार्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी 18 दिवस बंद राहणार आहेत. याच काळात भाविकांना दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
म्हसळा | शेकापक्षाला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे काम शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनीच केल्याचा आरोप रायगड लोकसभेचे राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केला आहे. वेळोवेळी भूमिका बदलल्यामुळे शेकापचे लोकसभा निवडणुकीतून नामोनिशाण संपुष्टात आले.
म्हसळा | १२ वर्षांपूर्वी म्हसळा तालुका टँकरमुक्त झाला. सद्यस्थितीत मात्र म्हसळा शहरातील जनतेच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र आहे. गेल्या ३० वर्षांत जिल्हा परिषद ग्रामीण पााणीपुरवठा योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन मिशन अशा सर्व सुमारे १०० कोटींच्या योजना होऊनही म्हसळा शहरवासियांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने, महिलांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पेण | उन्हाळाचा पारा वाढत आहे.रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ४० ते ४३ दरम्यान जात आहे. घराबाहेर पडताच घामाच्या धारा लागत आहेत. यामुळे आपसूकच पावले रस्त्याच्याकडेला असलेल्या रसवंती गृह,ज्यूस सेंटर तसेच लिंबू सरबतच्या हात गाड्या आणि टपर्यांकडे वळतात.
पनवेल | बाप निघाला हैवान, अल्पवयीन सावत्र मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची घटना खारघर येथे घडली. वकिल असलेल्या या नराधमाची काळेकृत्ये मुलीच्या शिक्षिकेने समोर आणली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पाली /बेणसे | लोकशाहीत मतदान हा सर्वश्रेष्ठ आणि मौलिक अधिकार आहे. त्यामुळे मत विकू नका, आता काहीजण पैशांच्या जोरावर मते विकत घेण्याचा प्रयत्न करतील, असे सांगत ‘गाढवाची किंमत ६० हजार, माणसाची किंमत किती, तर फक्त २००० रुपये का? असा सवाल उपस्थित करत, इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंनी गाढवाची भन्नाट गोष्ट सांगितली.
कर्जत | देशात लोकसभा निवडणुका सुरू असून सर्वच अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. याचाच गैरफायदा घेत, कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरु आहे. जमिनी सपाटीकरण करण्याच्या नावाखाली हे सर्व सुरु आहे.कर्जत तालुका मोठ्या प्रमाणात जंगल असलेला तालुका म्हणून ओळखला जायचा.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सत्ता पाहिली! श्रीरंग बारणे यांची उद्धव ठाकरेंवर टिका
खोपोली | मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (२३ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे,काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे,शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे,आमदार रोहित पवार, शिवसेना उप- नेते सचिन अहिर या प्रमुख नेत्यांची उपस्थित होती.
उरण | एमटीएचएल (अटल सेतू) प्रभाव क्षेत्राजवळचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएला न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऍथॉरिटी (एनटीडीए) नेमण्याच्या शासनाच्या अधिसूचनेला रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १२४ गावांतून २५ हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांनी हरकती नोंदविल्या आहेत.
उरण | लोकसभा निवडणुक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु या आचारसंहिता काळात उरण नगरपालिकेमधील भंगार साहित्यांची विक्री करण्यात आली आहे.
महाड | संजय राऊत यांनी आजवर कधी कुणाला मदत करण्यासाठी स्वतःच्या खिशात हात घातला आहे का? असा सवाल शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर केलेले भ्रष्टाचार व अनियमिततेचे आरोप बिनबुडाचे असून त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते असा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे.
रोहा | सरक्षतेच्या बाबतीत नेहमीच हलगर्जीपणा करणाऱ्या धाटाव एमआयडीसी तील कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीत शनिवारी दुपारी इलेक्ट्रिक प्लांट मध्ये कमकुवत इमारतीचा स्लॅब पडून घडलेल्या घटनेत ४ कामगार जखमी झाले असून त्यात एका कामगार गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी तातडीने पनवेल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलादपूर | तालुयातील माताबाल पोषण आहार गेल्या चार महिन्यांपासून रखडला असून लोकसभा निवडणुकीनंतरच पोषण आहाराचे वाटप होईल, अशी माहिती पोलादपूर शहरातील तसेच तालुयातील अंगणवाडयांतून देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांची नांवे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी दोन वेबसाईटसच्या नादुरूस्तीची चर्चा झाली आहे.
पोलादपूर | तालुक्यातील पळचिल जवळील उंबरकरवाडी येथील एका शेतकर्याच्या गोठ्याला भिषण आग लागली. या आगीत गुरांचा गोठा भस्मसात झाला असून, सहा गुरे आणि १५ कोंबडया दगावल्या आहेत. ६ मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
तळा । श्रीवर्धन म्हसळा माणगांव तळा इंदापूर या ठिकाणी मतदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत असून इंडिया आघाडीचे अनंत गीते हे सुनील तटकरेंचा पराभव करतील व विजयी होतील असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी व्यक्त केला.
तळा । विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्या प्रकरणी तळा तालुक्यातील निगुडशेत येथील दोघांना अटक केली आहे. पांडुरंग बाळाजी मंचेकर आणि प्रतिक देवजी सरफळे अशी त्यांची नावं आहेत. गुरांचे गोठ्यात त्यांनी ही बंदुक लपवून ठेवण्यात आली होती.
पिंपरी- चिंचवड | बारणेंचा अभ्यास कमी आहे. असं वाटतंय. त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि मग बोलावं. अस प्रतिउत्तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना दिले आहे. बारणे यांनी विरोधी उमेदवाराला ओळखत नाही, असं विधान केलं होतं.
नवीदिल्ली । काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत असे पत्र ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्यासह देशातील 600 वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना दिले आहे. त्यांनी पत्राद्वारे चिंता व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पडलेल्या या लेटरबॉम्बमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
नवीदिल्ली । निवडणूक प्रचारात शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करु नका अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले आहे. तसेच यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आले आहे. शरद पवार गटाकडूनच यासंबंधी तक्रार करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
रत्नागिरी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा जाहिर केल्यानंतर कोकणातील मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांनी गेली २० वर्ष मनसे पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न केले. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना जेलमध्ये टाकलं.
रत्नागिरी | लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गट-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर रामदास कदमांना गांभीर्याने घेऊ नका, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दरम्यान आता भाजपचे मंत्री नारायण राणेंनी कदमांवर जोरदार प्रहार केलाय.
रत्नागिरी । माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी )ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च रोजी होत आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) ची परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधित होत आहे. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धल ठाकरे गटाचा वचननामा गुरुवारी जाहीर करण्यात आला. या वचननाम्यात महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ असे वचन देण्यात शिवसेनेने दिले आहे. तसेच तरुणांना रोजगार, इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर लूट थांबवू, शेतकर्यांना कर्जमुक्त करणार, जिल्हा रुग्णालयं अद्ययावत करणार अशी आश्वासनं देण्यात आली आहेत.
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात २६ एप्रिलला होणार्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होईल. यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघाचा समावेश आहे.