कर्जत | तालुयातील दरडप्रवण क्षेत्र मध्ये पाच गावांचा समावेश भूगर्भ शास्त्राच्या अहवालाने करण्यात आला आहे. गेली तीन वर्षे सातत्याने कर्जत तालुयातील त्या दरडग्रस्त प्रवणक्षेत्र असलेल्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र त्यातील केवळ सांगवी या गावाच्या मागे १०० मीटर लांबीची संरक्षण भिंत बांधण्यासाठी ५७ कोटी निधी मंजूर झाला आहे.
खोपोली | नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नगरविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने देण्यात आले आहेत. ही रचना झाल्यानंतर लवकरच निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर होण्याची शयता असल्याने खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
वावोशी | रायगड जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, रसायनी, चौक आणि वावोशी भागात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीविरोधात आता रिपब्लिकन सेना आणि पँथर आर्मीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सात दिवसांत जर गुटखा विक्री थांबवली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे.
नवी मुंबई | "मुंबई रायजिंग-क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे अधिकृतपणे प्रदान केली जाणार आहेत.
पेण | मुंबई-गोवा महामार्गावर मोटारसायकलला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागलेली मोटारसायकल ही इलेक्ट्रीक बाईक असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलादपूर | महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत होतील असे चित्र आता दिसू लागले आहे. निवडणूकांपूर्वी ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १४ जुलै २०२५ रोजी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना जिल्हाधिकार्यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महाड | जावयाने सासर्यावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री महाड तालुक्यातील कोळसे आदिवासीवाडी येथे निदर्शनास आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार संतोष किसन जाधव (वय ४५, राहणार कोळोसे आदिवासीवाडी, तालुका महाड) यांनी आपल्या जावयाला मुलीला का मारले? असा जाब विचारल्यामुळे चिडलेल्या जावयाने सासर्यांना शिवीगाळ करून त्यांच्या छातीत चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
मुरुड जंजिरा | करंजा-रेवस रेड्डी या समुद्री महामार्गावरील नियोजित पुलांचे बांधकाम सुरू झाल्याने याठिकाणी कोळी मच्छिमारांना उद्भवणार्या समस्या व त्यामुळे होणार्या आर्थिक नुकसानीमुळे कोळी बांधव हैराण झाले आहेत. यासंदर्भात अधिकारी व मच्छिमार प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक लावून तोडगा काढावा; अन्यथा हे काम बंद करावे, असे निवेदन रायगड जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
कोर्लई | अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी नुकतीच मुरुड तालुयातील नांदगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य पथक उपकेंद्राची पाहणी करुन समस्या जाणून घेतल्या. आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची दूरवस्था पाहून त्यांनी नवीन इमारत बांधकाम होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात ओशासन दिले.
अलिबाग | १६ जूनपासून नवीण शैक्षणिक वर्ष सुरु होत असून, शिक्षण विभागाची जय्यत तयारी सुरु आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून, शाळांचा परिसर सजविण्यासोबत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी पुस्तके तसेच गणवेश वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
उरण | दिवगंत लोकनेत दि.बा. पाटील याचें शिष्य तथा जऐ नपीटीचे माजी विेशस्त, कामगार नते म्हणनू सवार्नां सपु रिचित असलले भषूण पाटील हे नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसचूना (नोटीफिकेशन) ताबडताबे काढून सदर विमानतळाचे लोकनेत े दि.बा. पाटील असे नामकरण करावे या प्रमखु मागणीसाठी दि. २४ जनू (लोकनेते दि.बा. पाटील याचां १२ वा स्मृंती दिन) पासनू जासई यथे आमरण उपोषण करणार आहते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
21.1k
अलिबाग | आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवा मानली जाते. परंतु काही खाजगी रुग्णवाहिका चालक आणि संस्था याच सेवेचा बिनधास्त गैरफायदा घेत असून, रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट सुरु केली आहे. संकटाच्या क्षणी हतबल झालेल्या कुटुंबियांची मजबुरी ओळखून मनमानी दर आकारले जात आहेत.
अलिबाग | शहापूर, ता.अलिबाग येथील भूखंड धारक मे.एपीपीसिनारमस कंपनी लि. यांना सध्याच्या रस्त्यावरून तात्पुरता पोहच रस्ता देण्याकरिता संपादन होणार्या क्षेत्राचे मोबदला देण्याचे काम उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयात सुरू असून सर्व बाधित खातेदारांनी २० जूनपर्यंत संमती करारपत्र दाखल करावे असे, आवाहन उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी केले आहे.
माणगांव | माणगाव तालुयातील भाले ग्रामपंचायत हद्दीत येणार्या चांदेवाडी व बोंडशेत गावच्या मध्यात २१ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह झालेल्या वादळं पावसामुळे कांदळगाव ते कोलाड अशी जाणारी महावितरणची हायटेन्शन लाईन कंडटर तुटून विद्युत प्रवाहित लाईन खाली माळरानावर पडल्याने चरणार्या चार गुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
माणगाव | तालुयातील बोरघर आदिवासीवाडी येथे मानेवर कोयत्याने वार करून वृद्धाची हत्या केल्याची घटना १८ मे रोजी रात्री ८.४० वाजताच्या सुमारास राहत्या घरासमोर घडली. या घटनेची फिर्याद नातू चंद्रकांत दौलत मुकणे (वय १९, रा. बोरघर आदिवासीवाडी ता.माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने तालुयात एकच खळबळ उडाली आहे.
धाटाव | रोहा शहरात रोहा पोलिसांकडून दि. ११ जून रोजी रोहा येथील मुख्य रस्त्यावर पायी पेट्रोलियम करण्यात आली. यावेळी उभे असणार्या नो पार्किंगमध्ये उभ्या असणार्या २१ वाहनांवर कारवाई करत सुमारे १४ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करत दररोज पाईप पेट्रोलियम करण्यात येणार आहे.
रोहा | रोहा तालुक्यातील रोहा बस स्थानक ते चणेरा मार्गावर भरदिवसा एका शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. या धाडसी मुलीने प्रसंगावधान दाखवत, चालत्या गाडीवरुन उडी मारली आणि थेट रोहा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी अलीम आयुब कर्जीकर (वय ६०, रा.मोर्बा) याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या घटनेने रोहा तालुक्यात खळबळ उडाली आहे.चणेरा येथील एक शाळकरी मुलगी शाळेतून घरी जाण्यासाठी रोहा बस स्थानकात उभी होती.
श्रीवर्धन/दिघी | पर्यटनासाठी मामाच्या गावी आलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (७ जून) सायंकाळी श्रीवर्धन तालुक्यातील खानलोशी येथील दगड खाणीतील खोल पाण्यात घडली. तेजस सुनील निगुडकर (वय २४, मूळगाव काळींजे, श्रीवर्धन) सध्या वास्तव्यास दिवा, ठाणे) असे मृत युवकाचे नाव आहे.
श्रीवर्धन | सतत बदलत असलेले हवामान, कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. वास्तविक पाहता श्रीवर्धन मधील तापमान ३२ किंवा ३३ अंश सेल्सिअस इतकेच असते. परंतु हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढल्यामुळे हे तापमान ३८ ते ४० सेल्सिअस असल्याचे जाणवते. प्रचंड उष्म्यामुळे या ठिकाणचे स्थानिक नागरिक हैराण झाले असून, घामाने अक्षरशः अंघोळ होत आहे.
म्हसळा | रायगड जिल्ह्यात होत आहे कौतुक. न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज म्हसळा चा एक प्रामाणिक शिपाई देवा घावट यांचा मुलगा स्वप्नील देवा घावट याने नेव्ही मध्ये रँक वन, बेस्ट शिप मेट, बेस्ट कॅडेट इन मराईन प्रात्यक्षिक हे तीनही मानाचे सन्मान पटकावत न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा, आपले कुटुंबीय आणि आपल्या संपूर्ण रायगड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
म्हसळा | म्हसळा शहरातील पाणी पुरवठा योजनेसाठी आणलेले २३० पाईप चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या जलवाहिन्यांची किंमत २५ लाख आहे. याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हसळा शहरात ४२ कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम सुरु आहे.
पेण | पेण नगरपालिका प्रशासन व कर्मचारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात व यंत्रसामुग्रीसह विक्रम स्टँडवर कारवाई करण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र खासदार धैर्यशील पाटील व आमदार रविंद्र पाटील यांच्या मध्यस्तीमुळे पेण विक्रम मिनीडोअरचा स्टॅँड हलविण्यास तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
पनवेल | एसीला शॉर्ट सर्किट मुळे आग लागून सेल्स ऑफिस आगीच्या भक्षस्थानी गेल्याची घटना पळस्पे फाटा येथील साई वर्ल्ड सिटी इमारतीच्या आवारात घडली आहे. पळस्पे फाटा येथे साई वर्ल्ड सिटी ही मोठी इमारत आहे. या इमारतीच्या आवारात सेल्स ऑफिस आहे.
पनवेल | उलवे परिसरातील असलेल्या तलावातील पाण्यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिच्या नातेवाईकांचा शोध उलवा पोलीस करीत आहेत.
पाली/बेणसे | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात २०२५ या वर्षी अतिशय महत्वपूर्ण असा वेतनवाढ करार झाला. या करारात कामगारांना पुरेपूर न्याय देताना त्यांचे चहूबाजुनी हित जोपासले असून कामगारांच्या हितार्थ कामगारांना भरीव पगारवाढ तसेच सर्वाधिक सेवा सुविधा मिळवून देणारा आजवरच्या इतिहासातील २०२५ वर्षीचा सर्वोत्तम वेतनवाढ करार असल्याचा दावा व स्पष्ट मत रिलायन्स नागोठणे कंपनीतील कामगार नेते व विविध कामगार संघटनांच्या पदाधिकार्यांनी रिलायन्स टाऊनशीप वृंदावन येथे बुधवार, ४ जू
पाली/ वाघोशी | येथील रामआळीजवळ ब्रिटीशकालीन ऐतिहासिक वास्तू आहे. सध्या या वास्तूची पूर्णपणे वाताहत झाली आहे. पावसामुळे या वास्तूच्या रस्त्याच्या बाजूकडील भिंत ढासळली आहे. छत कोसळले आहे. तसेच येथील सर्व भिंती व छत कमकुवत झाले आहे. काही ठिकाणच्या दगड व विटा निखळलेदेखील आहेत.
कर्जत | तालुयात उन्हाळी भात शेती केली जाते आणि त्या भात शेतीचे उत्पन्न मिळण्याची वेळ आणि मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे दुबार शेती वाया गेली आहे. दुबार शेती करणार्या शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान भात पीक पाण्यात भिजल्याने झाले असून शेतकर्यांच्या या पिकाची नुकसान भरपाई बाबत शासनांकडून पंचनामे करण्याचे धोरण आहे, मात्र कर्जत तालुयात पंचनामे होताना दिसत नाहीत.
उरण | कोकण समुद्र किनारी वसलेल्या उरण, रायगड, मुंबई समुद्र परिसरातील ठिकठिकाणी पावसाळी बंदी काळातही मागील सात दिवसांत अवैधरित्या मासेमारी करणार्या पाच मच्छीमार बोटी ताब्यात घेऊन काही बोटींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
धाटाव | रायगड जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करुन लैगिंक अत्याचार करणार्या दोघांना पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. रोहा आणि महाड या तालुक्यात या दोन वेगवेगळ्या घटना पुढे आल्या आहेत. महाड येथील प्रकरणात अश्लिल व्हिडीओ पसरवण्याची तर रोह्यात अश्लील मेसेज व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती.
पोलादपूर | पोलादपूर शहरातील आनंदनगर येथे राहणार्या वैभव पालकर यांचा ४ मे रोजी कामावरून घरी येत असताना सकाळी पावणेआठच्या सुमारास लोहारे गावच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. अज्ञात आयशर ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मात्र या अपघातानंतर आयशर चालक हा पसार झाला होता. त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता एक महिना पूर्ण होऊन गेला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
पुणे | भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेस घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नुकतंच एसटी प्रशासनाने नव्या ३ हजार बसची खरेदी केली.
नवी दिल्ली। न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपला. त्यांच्यानंतर न्यायमर्ती गवई यांचे नाव ज्येष्ठता यादीत होते. न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यामुळे त्यांचे नाव पुढे केले.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
मुंबई | रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन या महत्त्वाच्या पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठीचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ (तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियान) योजनेत समाविष्ट करण्यासाठी तातडीने केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (१२ जून) दिले.
मुंबई | इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासाठी आवश्यक असणारा १५ कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.